शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : तहसीलदारांच्या निलंबनाचे समर्थन

By admin | Updated: May 22, 2015 22:49 IST

घोटाळ्यांची जबाबदारी घ्यावीच लागेल

 नाशिक : सकृतदर्शनी जे तहसीलदार दोषी आढळले त्यांच्यावर शासनाने कारवाई केली आहे. कुणाला दोषी ठरविण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनातील अधिकारी या कारवाईला चुकीचे म्हणत असतील तर दोनदा शासनस्तरावर चौकशी करण्यात आली, तिसऱ्यांदाही चौकशी केली जाईल. शेवटी घोटाळा तर होतोय, मग कुणाला तरी जबाबदारी घ्यावीच लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी नाशिकमध्ये आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी तहसीलदार निलंबन प्रकरणी शासनाची भूमिका स्पष्ट केली. कोणावरही आकसाने कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या तहसीलदारांनी क्लिन चिट दिली असली तरी आमची चौकशी सुरूच आहे. या चौकशीत दोष आढळले नाही तर निलंबन मागेही घेतले जाईल. परंतु घोटाळा होत असताना कारवाई मात्र करायची नाही हे योग्य होणार नाही. प्रशासनाने या तहसीलदारांची कोणतीही चूक नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे, हे खरे असले तरी या अहवालाचे अवलोकन शासनस्तरावर केले जाईल प्रसंगी शासन आपली चौकशी यंत्रणा उभारून या प्रकरणाची चौकशी करेल. यात कुणी दोषी आढळले नाही, तर निलंबन मागेही घेतले जाऊ शकते. मात्र घोटाळा होत असेल तर कुणाला तरी जबाबदारी घ्यावीच लागेल, जबाबदारी झटकून कसे चालेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शासनाने अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार शासनाचे व्हिजन आणि अधिकाऱ्यांचे मूल्यमापन यात काहीतरी समन्वय असला पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांच्या कामाचे आॅडिट केले जाणार आहे. शासनाचे व्हिजन काय आहे आणि कोणत्याप्रकारे शासनाला कामकाज कारायचे आहे ही शासनाची भूमिका असते, परंतु शासनाच्या व्हिजन योग्य प्रकारे राबविण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. म्हणून अधिकाऱ्यांना ‘केआरए’ देण्यात आलेला आहे. शासनाचे व्हिजन राबविण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी केआरए ही एक चांगली संकल्पना असल्याचे आम्हाला भेटून सांगितले आहे. काही बदल आणि काही सूचनादेखील त्यांनी केल्या आहेत. अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या कमी आहेत, त्या वाढवून द्याव्यात, असे सांगितल्याने त्यात काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे शासन आणि प्रशासन यांच्यात चांगले चाललेले आहे. शेवटी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम अधिकारी करीत असतात. त्यांच्या कामांचे आणि शासनाच्या भूमिकेचे योग्य समन्वय ‘केआरए’च्या माध्यमातून होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.