शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : तहसीलदारांच्या निलंबनाचे समर्थन

By admin | Updated: May 22, 2015 22:49 IST

घोटाळ्यांची जबाबदारी घ्यावीच लागेल

 नाशिक : सकृतदर्शनी जे तहसीलदार दोषी आढळले त्यांच्यावर शासनाने कारवाई केली आहे. कुणाला दोषी ठरविण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनातील अधिकारी या कारवाईला चुकीचे म्हणत असतील तर दोनदा शासनस्तरावर चौकशी करण्यात आली, तिसऱ्यांदाही चौकशी केली जाईल. शेवटी घोटाळा तर होतोय, मग कुणाला तरी जबाबदारी घ्यावीच लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी नाशिकमध्ये आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी तहसीलदार निलंबन प्रकरणी शासनाची भूमिका स्पष्ट केली. कोणावरही आकसाने कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या तहसीलदारांनी क्लिन चिट दिली असली तरी आमची चौकशी सुरूच आहे. या चौकशीत दोष आढळले नाही तर निलंबन मागेही घेतले जाईल. परंतु घोटाळा होत असताना कारवाई मात्र करायची नाही हे योग्य होणार नाही. प्रशासनाने या तहसीलदारांची कोणतीही चूक नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे, हे खरे असले तरी या अहवालाचे अवलोकन शासनस्तरावर केले जाईल प्रसंगी शासन आपली चौकशी यंत्रणा उभारून या प्रकरणाची चौकशी करेल. यात कुणी दोषी आढळले नाही, तर निलंबन मागेही घेतले जाऊ शकते. मात्र घोटाळा होत असेल तर कुणाला तरी जबाबदारी घ्यावीच लागेल, जबाबदारी झटकून कसे चालेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शासनाने अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार शासनाचे व्हिजन आणि अधिकाऱ्यांचे मूल्यमापन यात काहीतरी समन्वय असला पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांच्या कामाचे आॅडिट केले जाणार आहे. शासनाचे व्हिजन काय आहे आणि कोणत्याप्रकारे शासनाला कामकाज कारायचे आहे ही शासनाची भूमिका असते, परंतु शासनाच्या व्हिजन योग्य प्रकारे राबविण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. म्हणून अधिकाऱ्यांना ‘केआरए’ देण्यात आलेला आहे. शासनाचे व्हिजन राबविण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी केआरए ही एक चांगली संकल्पना असल्याचे आम्हाला भेटून सांगितले आहे. काही बदल आणि काही सूचनादेखील त्यांनी केल्या आहेत. अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या कमी आहेत, त्या वाढवून द्याव्यात, असे सांगितल्याने त्यात काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे शासन आणि प्रशासन यांच्यात चांगले चाललेले आहे. शेवटी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम अधिकारी करीत असतात. त्यांच्या कामांचे आणि शासनाच्या भूमिकेचे योग्य समन्वय ‘केआरए’च्या माध्यमातून होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.