शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा,

By admin | Updated: March 9, 2015 00:52 IST

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा,

नाशिक : ‘जय भवानी..जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा, गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर जोडीला डिजेचा दणदणाट, आकर्षक विद्युत रोषणाई आणि यामध्ये बेभान होऊन नाचणारी तरुणाई अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात शिवजयंती मिरवणूक पार पडली.पारंपरिक मार्ग वाकडी बारव येथून महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. अकरा शिव मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यातील तीन मंडळांनी जिवंत देखावा सादर केला, तर जवळपास सर्वच मंडळांनी डिजेच्या तालावर तरुणाईला थिरकण्यास भाग पाडले. या मिरवणुकीच्या प्रारंभी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चित्ररथ होता़ त्यापाठोपाठ शिवसाई फ्रेंड सर्कल, लष्कर-ए-शिवबा ग्रुप, स्वराज्य प्रतिष्ठान, हिंदू एकता आंदोलन पक्ष, शहीद भगतसिंग क्रांती दल, नगरसेवक विनायक पांडे यांचे शिवसेवा मित्र मंडळ, माजी आमदार वसंत गिते यांचे मुंबई नाका युवक मित्रमंडळ, नगरसेवक सचिन मराठे यांचे अर्जुन क्रीडा मंडळ, जुने नाशिक फ्रेंड सर्कल, आत्मविश्वास व्यायामशाळा, असे अकरा चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी झाले होते़ दुपारी साडेचारपासून सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, न्यायालयाच्या नियमाप्रमाणे रात्री १० वाजता पोलिसांनी सर्व वाद्ये बंद करण्यात केली़ यानंतर मिरवणूक शांततेत मार्गस्थ झाली. वाकडी बारव, भद्रकाली, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजामार्गे पंचवटी असा मिरवणुकीचा मार्ग होता. पोलीस उपआयुक्त वारगळ, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली व पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, रात्री १० वाजता वाद्य बंद केल्यानंतर कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. तर काही मंडळांचे चित्ररथ हे माघारी फिरले. (प्रतिनिधी)