शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

भुजबळांच्या सुटकेने विधान परिषदेचे गणित बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 19:33 IST

दोन वर्षापुर्वी छगन भुजबळ हे महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी तुरूंगात गेल्याने तेव्हापासून नाशिकच्या राजकारणावरील त्यांची पकड सैल झाली होती परंतु तरिही पक्षपातळीवरील कोणतेही मोठे निर्णय घेताना भुजबळ यांचे मत विचारात घेतले जात होते. मात्र प्रत्येक वेळी जामीन नामंजूर झाल्यामुळे भुजबळ यांचा तुरूंगातील मुक्काम वाढत

ठळक मुद्देसहाणे यांना दिलासा : दराडे, कोकणी समर्थकांमध्ये नाराजी

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवणारे राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर झाल्याने त्याचे परिणाम विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना मोठा दिलासा मिळाला तर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, विकास आघाडीचे परवेज कोकणी यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.दोन वर्षापुर्वी छगन भुजबळ हे महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी तुरूंगात गेल्याने तेव्हापासून नाशिकच्या राजकारणावरील त्यांची पकड सैल झाली होती परंतु तरिही पक्षपातळीवरील कोणतेही मोठे निर्णय घेताना भुजबळ यांचे मत विचारात घेतले जात होते. मात्र प्रत्येक वेळी जामीन नामंजूर झाल्यामुळे भुजबळ यांचा तुरूंगातील मुक्काम वाढत गेल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये व विशेषत: राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये मरगळ निर्माण झाली होती. भुजबळ तुरूंगात असतानाच्या काळातच नाशिक महापालिकेची व जिल्हा परिषद अशा दोन मोठ्या निवडणुका त्यांच्या गैरहजेरीत पार पडल्या त्यात प्रामुख्याने त्यांची उणिव सर्वांनाच भासली, परिणामी या दोन्ही निवडणुकीत राष्टÑवादीची कामगिरी जेमतेम राहीली. राज्यात विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू असतानाच शुक्रवारी छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जमीन मंजूर केल्याने आता या निवडणुकीतील गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात राष्टÑवादीने शिवाजी सहाणे यांना उमेदवारी दिली असून, शिवसेनेकडून नरेंंद्र दराडे रिंगणात आहेत. दराडे हे येवल्यातील असून, एकेकाळी त्यांनी येवला मतदार संघ जागा वाटपात राष्टÑवादी कॉँग्रेसला सोडल्याच्या निषेधार्थ जिल्हा कॉँग्रेस कमिटीसमोर उपोषण केले होते. परंतु तरिही भुजबळ यांनाच येवल्यातून उमेदवारी मिळाली व काही काळानंतर दराडे यांनी भुजबळ यांच्याशी जुळवूनही घेतले होते. गेल्या दोन वर्षापासून भुजबळ तुरूंगात गेल्याचे पाहून दराडे यांनी येवल्यातून विधान सभेची निवडणूक लढविण्याची तयारीही सुरू केली होती. राज्यातील सत्तांतरानंतर दराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निमित्ताने दराडे यांचे येवल्यातील वर्चस्व वाढणे भुजबळ यांना राजकीय दृष्ट्या धोकेदायक ठरू शकत असल्याने कोणत्याही परिस्थितीत दराडे यांना रोखण्यासाठी भुजबळ यांच्याकडून प्रयत्न केला जाणे साहजिकच आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीचे समिकरणे भुजबळ यांच्यामुळे बदलण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक