शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

ना-ना करते भुजबळ !

By किरण अग्रवाल | Updated: June 21, 2018 08:20 IST

निवडणुकीच्या राजकारणासाठी लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याचे कितीही बोलले जात असले तरी तसे कधीच होत नसते, कारण त्यापेक्षा ‘इलेक्टिव्ह मेरिट’ पाहणे महत्त्वाचे असते.

निवडणुकीच्या राजकारणासाठी लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याचे कितीही बोलले जात असले तरी तसे कधीच होत नसते, कारण त्यापेक्षा ‘इलेक्टिव्ह मेरिट’ पाहणे महत्त्वाचे असते. मातब्बर नेत्यांच्या नकारघंटेकडे दुर्लक्ष करीत त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास भाग पाडले जाते ते त्यामुळेच. कारण, कोणत्याही पक्षाला निवडून येऊ शकणाराच उमेदवार हवा असतो. अर्थात, असे नेतेही पक्ष घेईल तो निर्णय शिरसावंद्य असल्याचे सांगत आपले मार्ग खुले ठेवत असतात. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक लढण्याबाबत उत्सुक नसल्याचे जे म्हटले आहे, त्याकडेही याच संदर्भाने बघता येणारे आहे.

सुमारे अडीच वर्षे कारागृहात राहून जामिनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांची यापुढील राजकीय वाटचाल कशी राहील, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जातील यासंबंधीच्या चर्चा खुद्द भुजबळ यांनीच फेटाळल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे येथे झालेल्या हल्लाबोल मोर्चाच्या समारोपप्रसंगीच त्यांनी त्याबाबतची स्पष्टता केली. त्यानंतर आता ते गेल्या वेळेप्रमाणे नाशकातून लोकसभेची निवडणूक लढवणार का, याची उत्सुकता लागून राहिली असताना, ‘आपला अद्याप तसा विचार नाही, नाशिककरांनी गेल्यावेळी आपली हौस फेडली आहे’ असे भुजबळांनी बोलून दाखविले आहे. मात्र असे बोलतानाच पुन्हा पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य असेल, असेही सांगितले. त्यामुळे त्यांच्या नकाराला तसा फारसा अर्थ उरत नाही. गेल्यावेळी तरी भुजबळ कुठे इच्छुक होते लोकसभेची निवडणूक लढायला? त्यांचे पुतणे माजी खासदार समीर यांचे तिकीट कापून पक्षाने छगन भुजबळ यांना रिंगणात उतरविले होते. पण, त्यावेळी राजकीय परिस्थिती अशी काही आकारास आली की त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळेच ‘हौस फिटली’ असे भुजबळांनी म्हटले. परंतु राजकीय हौस कुणाचीच व कधीच फिटत नसते, हे काय वेगळे सांगायला हवे?

महत्त्वाचे म्हणजे, निवडणूक ही कोणतीही असो; ती प्रत्येकवेळी निकरानेच लढली जात असते आणि दरवेळी निकराची लढत अधिकाधिक काट्याची होत असते. यंदा तर देशात एकपक्षीय साम्राज्य निर्माण करावयास निघालेल्या भाजपाला शह देण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी ‘आघाडी’ करण्याची तयारी चालविली आहे. तशी सुरुवातही होऊन गेली असून, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे या आघाडीच्या समन्वयाची सूत्रे जाताना दिसत आहेत. अशा स्थितीत गेल्यावेळेपेक्षा यंदा अधिक टोकाने लोकसभेची निवडणूक लढली जाण्याची चिन्हे आहेत. स्वाभाविकच, पक्षदेखील हुकमी उमेदवाराच्याच शोधात आहेत. नाशकात राष्ट्रवादी काँग्रेसचा हा शोध छगन भुजबळ यांच्यापाशीच येऊन थांबणारा आहे. निवडणूक लढवायला इच्छुक भलेही अन्य अनेकजण असतील, परंतु त्यातल्या त्यात क्षमता असलेला व खात्री बाळगता यावी असा उमेदवार राष्ट्रवादीकडे अन्य कुणी आजच्या घडीला तरी नजरेसमोर येत नाही. म्हणूनच, भुजबळ स्वत: कितीही ना-ना करोत; परंतु राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवारी यादीत त्यांचे नाव असण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.

भुजबळ यांची इच्छा नसली तरी तो झाला त्यांच्या राजकीय मानभावीपणाचा भाग. पक्षाने निर्णय घेतल्यावर तो भुजबळांकडून नाकारला जाणार असेल तर या आजच्या नकाराला अर्थ उरणार नाही. दुसरे म्हणजे, यात पक्षाची जोखीम तर कमी होणारी असेलच, शिवाय भुजबळांना गेल्यावेळी हौस फिटल्याचे जे शल्य आहे त्याची यंदा परतफेड करण्याची संधी असेल. यात त्यांची अटक व कारागृहातील मुक्कामामुळे अपेक्षित असलेल्या सहानुभूतीचा लाभदायी मुद्दा जसा असेल, तसा त्यांनी त्यांच्या सत्ताकाळात हाती घेतलेली कामे वा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठीच्या संधीचा विषयदेखील असेल. बरे, भुजबळ यांच्या या कोर्ट-कचेरीतील अडकलेपणाच्या काळात स्थानिक पातळीवर पक्षात त्यांची उणीव भरून काढेल असे कुणी नेतृत्वही पुढे येऊ शकलेले नाही. त्यामुळेही अशा तिहेरी दृष्टीने त्यांच्याच उमेदवारीच्या संभावनेची चर्चा होणे क्रमप्राप्त ठरले आहे. तेव्हा, भुजबळ नाही म्हणतात म्हणून उमेदवारीसाठी बाशिंग बांधून फिरणाऱ्या इतरेजनांकडेही फारसे गांभीर्याने बघता येऊ नये.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक