शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

ना-ना करते भुजबळ !

By किरण अग्रवाल | Updated: June 21, 2018 08:20 IST

निवडणुकीच्या राजकारणासाठी लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याचे कितीही बोलले जात असले तरी तसे कधीच होत नसते, कारण त्यापेक्षा ‘इलेक्टिव्ह मेरिट’ पाहणे महत्त्वाचे असते.

निवडणुकीच्या राजकारणासाठी लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याचे कितीही बोलले जात असले तरी तसे कधीच होत नसते, कारण त्यापेक्षा ‘इलेक्टिव्ह मेरिट’ पाहणे महत्त्वाचे असते. मातब्बर नेत्यांच्या नकारघंटेकडे दुर्लक्ष करीत त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास भाग पाडले जाते ते त्यामुळेच. कारण, कोणत्याही पक्षाला निवडून येऊ शकणाराच उमेदवार हवा असतो. अर्थात, असे नेतेही पक्ष घेईल तो निर्णय शिरसावंद्य असल्याचे सांगत आपले मार्ग खुले ठेवत असतात. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक लढण्याबाबत उत्सुक नसल्याचे जे म्हटले आहे, त्याकडेही याच संदर्भाने बघता येणारे आहे.

सुमारे अडीच वर्षे कारागृहात राहून जामिनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांची यापुढील राजकीय वाटचाल कशी राहील, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जातील यासंबंधीच्या चर्चा खुद्द भुजबळ यांनीच फेटाळल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे येथे झालेल्या हल्लाबोल मोर्चाच्या समारोपप्रसंगीच त्यांनी त्याबाबतची स्पष्टता केली. त्यानंतर आता ते गेल्या वेळेप्रमाणे नाशकातून लोकसभेची निवडणूक लढवणार का, याची उत्सुकता लागून राहिली असताना, ‘आपला अद्याप तसा विचार नाही, नाशिककरांनी गेल्यावेळी आपली हौस फेडली आहे’ असे भुजबळांनी बोलून दाखविले आहे. मात्र असे बोलतानाच पुन्हा पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य असेल, असेही सांगितले. त्यामुळे त्यांच्या नकाराला तसा फारसा अर्थ उरत नाही. गेल्यावेळी तरी भुजबळ कुठे इच्छुक होते लोकसभेची निवडणूक लढायला? त्यांचे पुतणे माजी खासदार समीर यांचे तिकीट कापून पक्षाने छगन भुजबळ यांना रिंगणात उतरविले होते. पण, त्यावेळी राजकीय परिस्थिती अशी काही आकारास आली की त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळेच ‘हौस फिटली’ असे भुजबळांनी म्हटले. परंतु राजकीय हौस कुणाचीच व कधीच फिटत नसते, हे काय वेगळे सांगायला हवे?

महत्त्वाचे म्हणजे, निवडणूक ही कोणतीही असो; ती प्रत्येकवेळी निकरानेच लढली जात असते आणि दरवेळी निकराची लढत अधिकाधिक काट्याची होत असते. यंदा तर देशात एकपक्षीय साम्राज्य निर्माण करावयास निघालेल्या भाजपाला शह देण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी ‘आघाडी’ करण्याची तयारी चालविली आहे. तशी सुरुवातही होऊन गेली असून, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे या आघाडीच्या समन्वयाची सूत्रे जाताना दिसत आहेत. अशा स्थितीत गेल्यावेळेपेक्षा यंदा अधिक टोकाने लोकसभेची निवडणूक लढली जाण्याची चिन्हे आहेत. स्वाभाविकच, पक्षदेखील हुकमी उमेदवाराच्याच शोधात आहेत. नाशकात राष्ट्रवादी काँग्रेसचा हा शोध छगन भुजबळ यांच्यापाशीच येऊन थांबणारा आहे. निवडणूक लढवायला इच्छुक भलेही अन्य अनेकजण असतील, परंतु त्यातल्या त्यात क्षमता असलेला व खात्री बाळगता यावी असा उमेदवार राष्ट्रवादीकडे अन्य कुणी आजच्या घडीला तरी नजरेसमोर येत नाही. म्हणूनच, भुजबळ स्वत: कितीही ना-ना करोत; परंतु राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवारी यादीत त्यांचे नाव असण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.

भुजबळ यांची इच्छा नसली तरी तो झाला त्यांच्या राजकीय मानभावीपणाचा भाग. पक्षाने निर्णय घेतल्यावर तो भुजबळांकडून नाकारला जाणार असेल तर या आजच्या नकाराला अर्थ उरणार नाही. दुसरे म्हणजे, यात पक्षाची जोखीम तर कमी होणारी असेलच, शिवाय भुजबळांना गेल्यावेळी हौस फिटल्याचे जे शल्य आहे त्याची यंदा परतफेड करण्याची संधी असेल. यात त्यांची अटक व कारागृहातील मुक्कामामुळे अपेक्षित असलेल्या सहानुभूतीचा लाभदायी मुद्दा जसा असेल, तसा त्यांनी त्यांच्या सत्ताकाळात हाती घेतलेली कामे वा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठीच्या संधीचा विषयदेखील असेल. बरे, भुजबळ यांच्या या कोर्ट-कचेरीतील अडकलेपणाच्या काळात स्थानिक पातळीवर पक्षात त्यांची उणीव भरून काढेल असे कुणी नेतृत्वही पुढे येऊ शकलेले नाही. त्यामुळेही अशा तिहेरी दृष्टीने त्यांच्याच उमेदवारीच्या संभावनेची चर्चा होणे क्रमप्राप्त ठरले आहे. तेव्हा, भुजबळ नाही म्हणतात म्हणून उमेदवारीसाठी बाशिंग बांधून फिरणाऱ्या इतरेजनांकडेही फारसे गांभीर्याने बघता येऊ नये.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक