शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

छगन भुजबळ यांना हवी ‘झेड’ सुरक्षा व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 15:37 IST

महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना मार्च २०१६ मध्ये अटक करण्यात आली, तेव्हापासून गेली २६ महिने भुजबळ आॅर्थररोड कारागृहात बंदीस्त होते. उच्च न्यायालयाने भुजबळ यांचा जामीन गेल्या आठवड्यात मंजूर केला त्यानंतर रूग्णालयात दाखल असलेले भुजबळ गुरूवारी निवासस्थानी परतले आहेत.

ठळक मुद्देफडणवीस यांना साकडे : राज ठाकरे यांचीही सदिच्छा भेट

नाशिक : तुरूंगातून जामिनावर सुटून सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोकळे झालेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची गेल्या २६ महिन्यांपासून काढून घेण्यात आलेली विशेष सुरक्षा व्यवस्था त्यांच्या जिवीताचा धोका पाहता पुन्हा बहाल करण्यात यावी यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्यात आले आहे. दोन दिवसांपुर्वी भुजबळ यांचे पूत्र आमदार पंकज भुजबळ व जयंत जाधव यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी फडणवीस यांची भेट घेवून तशी विनंती केली असून, त्यांनीही त्यास सकारात्मता दर्शविल्याचे वृत्त आहे.महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना मार्च २०१६ मध्ये अटक करण्यात आली, तेव्हापासून गेली २६ महिने भुजबळ आॅर्थररोड कारागृहात बंदीस्त होते. उच्च न्यायालयाने भुजबळ यांचा जामीन गेल्या आठवड्यात मंजूर केला त्यानंतर रूग्णालयात दाखल असलेले भुजबळ गुरूवारी निवासस्थानी परतले आहेत. तत्पुर्वी बुधवारी भुजबळ यांचे पूत्र पंकज यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचा राजकीय अर्थ काढला जावून राज्यात उलट सुलट चर्चा पसरली असली तरी, ज्या प्रमाणे पंकज यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्याच प्रमाणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही सदिच्छा भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भुजबळ यांच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नाबाबत ऋण व्यक्त करण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे भुजबळांचा जामीन अर्ज नामंजूर करून केला जात असलेल्या अन्यायाच्या विरोधात भुजबळ समर्थकांनी चालविलेल्या ‘अन्याय पे चर्चा’ या उपक्रमांतर्गंत नाशिक जिल्ह्यातील भुजबळ समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेवून त्यांच्याकडे गाºहाणे मांडले होते. या साऱ्या घटनेच्या पार्श्वभुमीवर पंकज भुजबळ यांनी राज ठाकरे यांची भेट घेवून आभार मानले. या भेटीबाबत कमालिची गुप्तता पाळण्यात आली, त्याच प्रमाणे मंगळवारी रात्री देखील पंकज व आमदार जयंत जाधव यांनी ‘वर्षा’ येथे जावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीतच जाधव यांनी फडणवीस यांना पत्र देवून भुजबळ यांना ‘झेड सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी केली. भुजबळ हे गृहमंत्री असताना त्यांनी गुन्हेगारी टोळ्याविरूद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता, ते पाहता त्यांच्या जिवीताला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी अशी विनंती केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक