शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

छगन भुजबळ यांना हवी ‘झेड’ सुरक्षा व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 15:37 IST

महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना मार्च २०१६ मध्ये अटक करण्यात आली, तेव्हापासून गेली २६ महिने भुजबळ आॅर्थररोड कारागृहात बंदीस्त होते. उच्च न्यायालयाने भुजबळ यांचा जामीन गेल्या आठवड्यात मंजूर केला त्यानंतर रूग्णालयात दाखल असलेले भुजबळ गुरूवारी निवासस्थानी परतले आहेत.

ठळक मुद्देफडणवीस यांना साकडे : राज ठाकरे यांचीही सदिच्छा भेट

नाशिक : तुरूंगातून जामिनावर सुटून सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोकळे झालेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची गेल्या २६ महिन्यांपासून काढून घेण्यात आलेली विशेष सुरक्षा व्यवस्था त्यांच्या जिवीताचा धोका पाहता पुन्हा बहाल करण्यात यावी यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्यात आले आहे. दोन दिवसांपुर्वी भुजबळ यांचे पूत्र आमदार पंकज भुजबळ व जयंत जाधव यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी फडणवीस यांची भेट घेवून तशी विनंती केली असून, त्यांनीही त्यास सकारात्मता दर्शविल्याचे वृत्त आहे.महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना मार्च २०१६ मध्ये अटक करण्यात आली, तेव्हापासून गेली २६ महिने भुजबळ आॅर्थररोड कारागृहात बंदीस्त होते. उच्च न्यायालयाने भुजबळ यांचा जामीन गेल्या आठवड्यात मंजूर केला त्यानंतर रूग्णालयात दाखल असलेले भुजबळ गुरूवारी निवासस्थानी परतले आहेत. तत्पुर्वी बुधवारी भुजबळ यांचे पूत्र पंकज यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचा राजकीय अर्थ काढला जावून राज्यात उलट सुलट चर्चा पसरली असली तरी, ज्या प्रमाणे पंकज यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्याच प्रमाणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही सदिच्छा भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भुजबळ यांच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नाबाबत ऋण व्यक्त करण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे भुजबळांचा जामीन अर्ज नामंजूर करून केला जात असलेल्या अन्यायाच्या विरोधात भुजबळ समर्थकांनी चालविलेल्या ‘अन्याय पे चर्चा’ या उपक्रमांतर्गंत नाशिक जिल्ह्यातील भुजबळ समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेवून त्यांच्याकडे गाºहाणे मांडले होते. या साऱ्या घटनेच्या पार्श्वभुमीवर पंकज भुजबळ यांनी राज ठाकरे यांची भेट घेवून आभार मानले. या भेटीबाबत कमालिची गुप्तता पाळण्यात आली, त्याच प्रमाणे मंगळवारी रात्री देखील पंकज व आमदार जयंत जाधव यांनी ‘वर्षा’ येथे जावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीतच जाधव यांनी फडणवीस यांना पत्र देवून भुजबळ यांना ‘झेड सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी केली. भुजबळ हे गृहमंत्री असताना त्यांनी गुन्हेगारी टोळ्याविरूद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता, ते पाहता त्यांच्या जिवीताला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी अशी विनंती केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक