शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडील सक्तीची वसुली थांबवा छगन भुजबळ : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा ठराव

By admin | Updated: July 19, 2014 01:09 IST

शेतकऱ्यांकडील सक्तीची वसुली थांबवा छगन भुजबळ : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा ठराव

नाशिक : लांबणीवर पडलेला पाऊस, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य, चाऱ्याचा प्रश्न व विजेचे भारनियमन अशा चौफेर संकटात शेतकरी असताना जिल्हा बॅँकेकडून केली जात असलेली सक्तीची वसुली थांबवा, अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्यास सरकार काहीच मदत करणार नाही, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. धरणांमध्ये जेमतेम सात टक्के पाणी साठा व वाया गेलेल्या पेरण्या पाहता जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा ठरावही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आला. जिल्ह्यातील पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीचा भुजबळ यांनी आढावा घेतला. त्यात जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी वस्तुस्थिती कथन केली. जवळपास ६६१ गावांना १९७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, धरणांमध्ये जेमतेम सात टक्के इतका पाणी साठा शिल्लक असल्याचे, तर पाच टक्के पेरण्या झाल्याचे त्यांनी सांगितले. (पान ७ वर)त्यावर भुजबळ यांनी, अनेक गावांना टॅँकर मंजूर असूनही प्रत्यक्षात टॅँकर जात नसल्याच्या तक्रारी असल्याने टॅँकरची संख्या वाढविण्याची सूचना केली. जिल्ह्णातील नगरपालिका व महानगरपालिकांना आॅगस्टअखेर पाणी पुरू शकेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्णात मुबलक चारा असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आल्यावर लोकप्रतिनिधींनी धारेवर धरले. चारा कोठे आहे अशी विचारणा करून आमदार शिरीष कोतवाल यांनी, चांदवड तालुक्यातील शेतकरी पाच-पाच हजार रुपये मोजून चारा खरेदी करीत आहेत, जर शासनाकडे चारा आहे तर तो शेतकऱ्यांसाठी खुला करावा, अशी मागणी केली. पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले व प्रत्यक्ष चारा आहे किंवा नाही याची पाहणी करून सप्टेंबरपर्यंत पाऊस आलाच नाही तर काय नियोजन करता येईल याचाही अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चाऱ्याचा आढावा घेऊन प्रसंगी छावण्या उघडण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. आमदार ढिकले यांनीही या विषयाला अनुसरून एकंदर परिस्थिती पाहता, जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून ठराव करा व सरकारकडे पाठवा जेणेकरून, शासन काही तरी उपाययोजना करू शकेल असे सांगितले. आमदार ए. टी. पवार यांनी त्यास अनुमोदन दिले, तर अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट असल्याचे सांगितले.