शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

जिल्ह्यातील मतदार याद्यांची होणार तपासणी

By admin | Updated: February 23, 2017 00:00 IST

त्रुटींचा शोध : निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना

नाशिक : नाशिक महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळामुळे मतदारांना वंचित राहावे लागल्याने जिल्हा निवडणूक यंत्रणेने सर्व तालुक्यांतील निवडणूक नायब तहसीलदारांकडून मतदार यादीचा अहवाल मागविला असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली यादी राज्य निवडणूक आयोगाच्या यादीशी जोडून पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, जाणकारांच्या मते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याद्या फोडताना मोठ्या प्रमाणावर कुचराई झाल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाने ५ जानेवारी २०१७ रोजी विधानसभा मतदार संघनिहाय मतदार याद्या जारी करण्यात आल्या होत्या. याच याद्यांच्या आधारे महापालिकेने केलेल्या प्रभाग रचनेनिहाय मतदारांची संख्या तर जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितीच्या गणातील मतदारांची संख्या ठरविण्यात आली होती. आयोगाने प्रभाग, गट व गणासाठी मतदार संख्या ठरवून दिलेली असल्याने त्याच आधारे निवडणूक यंत्रणेने मतदार यादीची फोड केली असली तरी, अशी फोड करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा जो काही डाटा मागविला, त्या डाटाच्या लेण-देण मध्येच बहुतेक तांत्रिक दोषामुळेच अनेक मतदारांची नावे गहाळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  महापालिका हद्दीत प्रभागनिहाय मतदारांची संख्या निश्चित करताना ज्या भागांचा समावेश करण्यात आला, त्याच भागातील मतदान केंद्रनिहाय मतदारांची विभागणी होणे अपेक्षित होते, तथापि, मतदान केंद्रनिहाय मतदार यादीची निश्चिती करताना ती योग्य न झाल्याने नागरिकांच्या मतदान केंद्रात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याचे व त्यातूनच एकाच कुटुंबातील व्यक्तींची वेगवेगळ्या ठिकाणी विभागणी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातही बहुधा हाच प्रकार घडला असावा, असाही अंदाज व्यक्त करून प्रामुख्याने केंद्राकडून मतदारांचा डाटा घेताना व तो पुन्हा वापरताना ‘कट पेस्ट’चा गोंधळ झाला असावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे.