शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारीसाठी आदिवासींना ‘चटके’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:30 IST

वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील आदिवासी भागात रोजगाराचा प्रश्न बिकट झाला असून, शेती व शेतीपूरक जोडधंदेही मंदावल्याने आदिवासींची शहरी भागासह जवळील खेड्यांच्या दिशेने भटकंती वाढत आहे. नाशिकपासून अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरावर असलेल्या गिरणारे गावातील मजुरांच्या नाक्यावर आदिवासींचा वाढता ठिय्या त्याचे बोलके उदाहरण ठरत आहे.

गिरणारे : वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील आदिवासी भागात रोजगाराचा प्रश्न बिकट झाला असून, शेती व शेतीपूरक जोडधंदेही मंदावल्याने आदिवासींची शहरी भागासह जवळील खेड्यांच्या दिशेने भटकंती वाढत आहे. नाशिकपासून अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरावर असलेल्या गिरणारे गावातील मजुरांच्या नाक्यावर आदिवासींचा वाढता ठिय्या त्याचे बोलके उदाहरण ठरत आहे. पावसाळ्याची चार महिनेजिल्ह्यातील आदिवासी भाग जणू नंदनवनासारखाच भासतो. सर्वत्र भात, नागली, खुरसणी, भुईमूग यांसारख्या पिकांचे उत्पादन जोरात घेतले जाते. त्यामुळे स्थलांतराचा प्रश्न निर्माण होत नाही. आदिवासींच्या हाताला कामही मिळते आणि उत्पादनाचे प्रमाणही वाढलेले असते. पाणी टंचाईची समस्याही सुटलेली असते. त्यामुळे आदिवासी लोक पावसाळ्यात उंबरा ओलांडत नाही; मात्र उन्हाळ्यात परिस्थिती याउलट होते. पोटापाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्यामुळे आदिवासींना नाईलाजास्तव रोजगाराच्या शोधासाठी शहराजवळची खेडीची वाट धरावी लागते. परिणामी गिरणारेसारख्या भागात आदिवासींचे स्थलांतर होऊ लागले आहे. गिरणारे गाव शहर व आदिवासी भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काश्यपी धरणाचा परिसर असलेल्या गिरणारे गाव तसे कृषिसमृद्ध आहे. गिरणारे गाव आदिवासी गाव, पाड्यांपासून जसे तासाभराच्या अंतरावर आहे, तसे या गावातून नाशिक शहरात येण्यासाठी महामंडळाची बससेवेसह खासगी वाहतूक सेवाही उपलब्ध असल्यामुळे शहरासोबत हे गाव जोडलेले आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही. गिरणारे शिवाराला द्राक्ष बागायती शेती लाभलेली आहे. यामुळे या भागात द्राक्ष उत्पादकांची संख्या आहे. तसेच द्राक्ष काढणीनंतर मणुका तयार करणारे विविध व्यावसायिकांचाही येथे मुक्का दिसून येतो. यामुळे या भागात मजुरांची नेहमीच गरज भासते. काबाडकष्टाची कामे करण्यासाठी आदिवासी भागातील लोकांची मोठी मदत होते. एकूणच मजुरीसाठी गिरणारे भागात सध्या आदिवासींचा राबता दिसून येत आहे.उदासीनतेची ‘मनरेगा’आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे. दुर्गम आदिवासी गाव, पाड्यांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) विविध विकासकामे राबविली जातात; मात्र तरीदेखील तुटपुंजे मजुरी, अल्प विकासकामांमुळे ‘मनरेगा’मध्ये आदिवासींचे फारसे ‘मन’ रमत नाही. नाईलाजास्तव भटकंतीची वेळ ओढावते. त्यातच सरकारी अनास्थेचेही भर पडते. कारण अनास्थेमुळे विकासकामांना प्रत्यक्ष ‘मुहूर्त’ मिळण्यास विलंब होतो. परिणामी आदिवासींना ‘मनरेगा’मध्ये हाताला काम कमी प्रतीक्षा अधिक करावी लागते.

टॅग्स :Employeeकर्मचारी