शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

उत्तम व्यावसायिक शिक्षणानेच चारित्र्य, राष्ट्रनिर्माण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:55 IST

शिक्षणाने समाजाला नवदृष्टी मिळते. शिक्षणाचा प्रचंड विस्तार झाला आहे. विद्यापीठे, महाविद्यालांची संख्या वाढली. मात्र काळानुरूप शिक्षणामध्ये बदलही अपेक्षित आहेत.

नाशिक : शिक्षणाने समाजाला नवदृष्टी मिळते. शिक्षणाचा प्रचंड विस्तार झाला आहे. विद्यापीठे, महाविद्यालांची संख्या वाढली. मात्र काळानुरूप शिक्षणामध्ये बदलही अपेक्षित आहेत. शिक्षणाने सुसंस्कृत समाजाची निर्मिती व्हावी, व्यक्तीचे चारित्र्य निर्माण आणि त्यातून चांगल्या राष्ट्राची निर्मिती करणाऱ्या शिक्षणानेच देशाचा विकास, प्रगती शक्य असल्याचा सूर परिसंवादत उमटला.  कॉलेजरोेड, गंगापूररोड वाणी मित्रमंडळातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात ‘शिक्षणविश्व-२०१८’ शैक्षणिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाच्या सुरुवातीला शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसवी यांनी शिक्षणाने उद्योजकता वाढल्याचे सांगत शिक्षणातील स्थित्यंतरे आणि शैक्षणिक संस्थांचा विकास यावर प्रकाश टाकला. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मळलेल्या वाटा सोडून आपला कल, आवड ओळखून शिक्षण घ्यावे, असे सांगत सवयीतून कार्य संस्कृती आणि चरित्र निर्माण होते, असे सांगितले. त्यासाठी तरु णाईने चांगल्या सवयी जीवनशैली कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. जीएसटी आयुक्त उन्मेष वाघ यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यापूर्वी चांगला सल्ला घ्यावा. त्यासाठी शिक्षणतज्ज्ञ, गुगल आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. यश हमखास मिळते, असे सांगितले.  दरम्यान, वेदांत देव याने शालांत परीक्षेत आणि अनुजा टिपरे हिने १२ वीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवराच्या हस्ते सत्कार त्यांचा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने चर्चासत्राला प्रारंभ झाला. सूत्रसंचलन मधुरा क्षेमकल्याणी यांनी केले. प्रशांत मोराणकर यांनी आभार मानले. याप्रसंगी योगेश मालपुरे, नितीन दहिवेलकर, सरचिटणीस संजय दुसे, उपाध्यक्ष योगेश राणे, संजय बागड, चिटणीस राजेंद्र कोठावदे, खजिनदार हर्षद चिंचोरे, हितेश देव, अ‍ॅड. देवदत्त जायखेडकर, महेश पितृभक्त, प्रवीण अमृतकर, पवन बागड, अमोल शेंडे, भगवंत येवला आदी उपस्थित होते.ऊर्जेचा विकास तरु णाईने केला पाहिजेशिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स गोसावी, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, बडोदा विभागाचे जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आय.आर.एस. उन्मेश वाघ व प्रेरणादायी व्याख्याते दिलीपकुमार औटी यांनी शिक्षणाची सद्यस्थिती त्यातील स्थित्यंतरे यावर मत मांडले.‘लाइफ कोच’ दिलीप औटी यांनी विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध करायचे तर शिक्षणाला पर्याय नाही, असे सांगत त्यासाठी सर्जनशीलता, ऊर्जेचा विकास तरु णाईने केला पाहिजे, असा सल्ला दिला.

टॅग्स :Nashikनाशिक