शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Nashik: अग्नीवीर भरती प्रक्रियेत बदल; लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करा १५मार्चपर्यंत! सैन्यात करिअरची उज्ज्वल संधी

By अझहर शेख | Updated: March 2, 2023 15:32 IST

Nashik: भारतीय सैन्याच्या भूदलात सैनिकांच्या भरतीसाठी २०२३-२४सालापासून अग्नीवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या सेना भरती कार्यालयाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला कळविली आहे.

- अझहर शेखनाशिक : भारतीय सैन्याच्या भूदलात सैनिकांच्या भरतीसाठी २०२३-२४सालापासून अग्नीवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या सेना भरती कार्यालयाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला कळविली आहे. त्यानुसार अग्नीवीर तांत्रिक, लिपिक, जनरल ड्यूटी, ट्रेड्समन अशा विविध पदांच्या भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी येत्या १५मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कार्यालयाने केले आहे.

अग्नीवीर भरती प्रक्रियेत भारत सरकारकडून बदल करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर येत्या १५मार्च मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. लिपिक जनरल ड्यूटी पदासाठी १०वी उत्तीर्ण तर ट्रेडसमन पदासाठी आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अग्निवीर तांत्रिक, लिपिक, जनरल ड्युटी व ट्रेडसमन या पदांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, धुळे व नंदूरबार या जिल्ह्यांच्या उमेदवारांची भरती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी कळविले आहे. यापुर्वी अगोदर शारिरिक चाचणी होऊन लेखी परीक्षा द्यावयाची होती; मात्र आता अगोदर उमेदवारांना लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले जात आहे. परिक्षेनंतर उमेदवारांचा मैदानात शारिरिक चाचणीमध्ये कस लागणार आहे.

जिल्ह्यातील उमेदवारांना संधीभारतीय भूदलात चांगल्या नोकरी बजावण्याची संधी अग्नीवीर म्हणून जिल्ह्यातील युवकांकडे आहे. आठवी, दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थीदेखील वरील पदांकरिता भरती केली जात आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील युवकांना संधी आहे. कारण महाराष्ट्रातील काही ठराविक जिल्ह्यातील युवकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने उइच्छुकांनी ऑनलाइन अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

असा आहे भरतीचा टप्पाअग्निवीर भरती पद्धतीत बदल केल्यानुसार पहिल्या टप्प्यात संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यानंतर भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होईल. यामध्ये लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवकांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे कापले यांनी यांनी सांगितले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिक