शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: अग्नीवीर भरती प्रक्रियेत बदल; लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करा १५मार्चपर्यंत! सैन्यात करिअरची उज्ज्वल संधी

By अझहर शेख | Updated: March 2, 2023 15:32 IST

Nashik: भारतीय सैन्याच्या भूदलात सैनिकांच्या भरतीसाठी २०२३-२४सालापासून अग्नीवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या सेना भरती कार्यालयाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला कळविली आहे.

- अझहर शेखनाशिक : भारतीय सैन्याच्या भूदलात सैनिकांच्या भरतीसाठी २०२३-२४सालापासून अग्नीवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या सेना भरती कार्यालयाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला कळविली आहे. त्यानुसार अग्नीवीर तांत्रिक, लिपिक, जनरल ड्यूटी, ट्रेड्समन अशा विविध पदांच्या भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी येत्या १५मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कार्यालयाने केले आहे.

अग्नीवीर भरती प्रक्रियेत भारत सरकारकडून बदल करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर येत्या १५मार्च मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. लिपिक जनरल ड्यूटी पदासाठी १०वी उत्तीर्ण तर ट्रेडसमन पदासाठी आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अग्निवीर तांत्रिक, लिपिक, जनरल ड्युटी व ट्रेडसमन या पदांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, धुळे व नंदूरबार या जिल्ह्यांच्या उमेदवारांची भरती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी कळविले आहे. यापुर्वी अगोदर शारिरिक चाचणी होऊन लेखी परीक्षा द्यावयाची होती; मात्र आता अगोदर उमेदवारांना लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले जात आहे. परिक्षेनंतर उमेदवारांचा मैदानात शारिरिक चाचणीमध्ये कस लागणार आहे.

जिल्ह्यातील उमेदवारांना संधीभारतीय भूदलात चांगल्या नोकरी बजावण्याची संधी अग्नीवीर म्हणून जिल्ह्यातील युवकांकडे आहे. आठवी, दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थीदेखील वरील पदांकरिता भरती केली जात आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील युवकांना संधी आहे. कारण महाराष्ट्रातील काही ठराविक जिल्ह्यातील युवकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने उइच्छुकांनी ऑनलाइन अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

असा आहे भरतीचा टप्पाअग्निवीर भरती पद्धतीत बदल केल्यानुसार पहिल्या टप्प्यात संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यानंतर भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होईल. यामध्ये लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवकांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे कापले यांनी यांनी सांगितले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिक