शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
7
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
8
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
9
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
10
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
11
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
12
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
13
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
14
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
15
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
16
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
17
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
18
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
19
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
20
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!

‘जलयुक्त’चे निकष बदला

By admin | Updated: July 14, 2016 01:57 IST

आमदार आक्रमक : नियोजनच्या बैठकीत भडिमार

 नाशिक : जलयुक्त शिवार योजनेत निवडलेल्या गावांमध्येच स्वयंसेवी संस्थांना कामे करण्याची करण्यात आलेली सक्ती, परिणामी खुंटलेला लोकसहभाग व टंचाईग्रस्त गावांवर झालेला अन्याय लक्षात घेता जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यासाठी ठरविण्यात आलेल्या निकषांमध्ये बदल करा, अशी आग्रही मागणी जिल्ह्णातील आमदारांनी जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत केली. नियोजन भवन येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्णातील सर्वच विषय व प्रश्नांचा ऊहापोह करण्यात आला. आमदार डॉ. राहुल अहेर यांनी जिल्ह्णात जलयुक्त शिवार योजनेची कामे चांगली झाली असली तरी, डिसेंबरमध्ये निवडण्यात आलेल्या गावांमध्येच कामे करा, असा आग्रह जिल्हाधिकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्थांकडे धरला. परिणामी ज्या गावांची निवड झालेली नाही, अशा गावांमध्ये लोकसहभाग तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जलयुक्तची कामे होऊ शकलेली नाहीत, असे सांगितले. आमदार अनिल कदम यांनीही, जलयुक्तची कामे करण्यासाठी ५० टक्क्यापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्येच घेण्याची सक्ती दूर करून ज्या ज्या गावांची पाण्याची पातळी खालावली आहे त्या गावांमध्ये जलयुक्तची कामे घेण्यात यावी, अशी मागणी केली. आमदार जयंत जाधव यांनी जलयुक्तच्या कामांसाठी शासनाकडे आणखी निधीची मागणी करावी, अशी सूचना केली. आमदार फरांदे यांनी जिल्हा रुग्णालयातील बंद पडलेल्या सीटी स्कॅनचा विषय त्याचबरोबर शहरात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या तसेच गोदावरीच्या वाहून गेलेल्या भिंतींची दुरुस्ती करण्याची मागणी केली. तर राजाभाऊ वाजे यांनी दुष्काळी परिस्थितीत एकही तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या नसल्याबद्दल खंतव्यक्त करून बायोमॅट्रिक शिधापत्रिका तत्काळ लागू करावी, गोरगरिबांना केरोसिन मिळावे, अशी मागणी केली. जे. पी. गावित यांनी सुरगाण्यात पाऊस सुरू झाल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे सांगितले. त्यावर येत्या दोन-तीन दिवसांत कामे सुरू करण्यात येणार असल्याचे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)