शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

‘जलयुक्त’चे निकष बदला

By admin | Updated: July 14, 2016 01:57 IST

आमदार आक्रमक : नियोजनच्या बैठकीत भडिमार

 नाशिक : जलयुक्त शिवार योजनेत निवडलेल्या गावांमध्येच स्वयंसेवी संस्थांना कामे करण्याची करण्यात आलेली सक्ती, परिणामी खुंटलेला लोकसहभाग व टंचाईग्रस्त गावांवर झालेला अन्याय लक्षात घेता जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यासाठी ठरविण्यात आलेल्या निकषांमध्ये बदल करा, अशी आग्रही मागणी जिल्ह्णातील आमदारांनी जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत केली. नियोजन भवन येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्णातील सर्वच विषय व प्रश्नांचा ऊहापोह करण्यात आला. आमदार डॉ. राहुल अहेर यांनी जिल्ह्णात जलयुक्त शिवार योजनेची कामे चांगली झाली असली तरी, डिसेंबरमध्ये निवडण्यात आलेल्या गावांमध्येच कामे करा, असा आग्रह जिल्हाधिकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्थांकडे धरला. परिणामी ज्या गावांची निवड झालेली नाही, अशा गावांमध्ये लोकसहभाग तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जलयुक्तची कामे होऊ शकलेली नाहीत, असे सांगितले. आमदार अनिल कदम यांनीही, जलयुक्तची कामे करण्यासाठी ५० टक्क्यापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्येच घेण्याची सक्ती दूर करून ज्या ज्या गावांची पाण्याची पातळी खालावली आहे त्या गावांमध्ये जलयुक्तची कामे घेण्यात यावी, अशी मागणी केली. आमदार जयंत जाधव यांनी जलयुक्तच्या कामांसाठी शासनाकडे आणखी निधीची मागणी करावी, अशी सूचना केली. आमदार फरांदे यांनी जिल्हा रुग्णालयातील बंद पडलेल्या सीटी स्कॅनचा विषय त्याचबरोबर शहरात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या तसेच गोदावरीच्या वाहून गेलेल्या भिंतींची दुरुस्ती करण्याची मागणी केली. तर राजाभाऊ वाजे यांनी दुष्काळी परिस्थितीत एकही तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या नसल्याबद्दल खंतव्यक्त करून बायोमॅट्रिक शिधापत्रिका तत्काळ लागू करावी, गोरगरिबांना केरोसिन मिळावे, अशी मागणी केली. जे. पी. गावित यांनी सुरगाण्यात पाऊस सुरू झाल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे सांगितले. त्यावर येत्या दोन-तीन दिवसांत कामे सुरू करण्यात येणार असल्याचे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)