शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

विचार बदला, जीवन बदलेल ! : सूरजभाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:44 IST

मनुष्याच्या जीवनात ताणतणाव वाढत असले तरी आजचा दिवस खूपच चांगला गेला, असा विचार करून रात्री निद्रा करा आणि सकाळी उठतानाही हसत मुखाने उठा, विचार बदलला तर जीवनही बदलेल, असे विचार माउंट अबू येथील ब्रह्मकुमार सूरजभाई यांनी व्यक्त केले.

नाशिक : मनुष्याच्या जीवनात ताणतणाव वाढत असले तरी आजचा दिवस खूपच चांगला गेला, असा विचार करून रात्री निद्रा करा आणि सकाळी उठतानाही हसत मुखाने उठा, विचार बदलला तर जीवनही बदलेल, असे विचार माउंट अबू येथील ब्रह्मकुमार सूरजभाई यांनी व्यक्त केले.  पंचवटीतील यशवंतराव महाराज पटांगणावर नाशिक वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. या व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि.२५) स्व. माणेकलाल भटेवरा स्मृती व्याख्यानाअंतर्गत सूरजभाई यांनी ‘जीवन : शंका समाधान’ या विषयावर गुंफले. मीनल साठ्ये यांनी त्यांची मुलाखत घेतली. गेल्या चाळीस वर्षात देशाने खूप प्रगती केली तसेच खूप संपत्ती निर्माण केली. शिक्षणाच्या सोयी केल्या, डॉक्टरही घडविले. परंतु रोग बरे होण्याऐवजी वाढतच गेले याचे कारण म्हणजे माणसांमध्ये सकारात्मक बदल होण्याऐवजी नकारात्मक भावना वाढीस लागली आहे. यात चूक म्हणजे आपण आपल्या आचार आणि विचारांपेक्षा इंग्रजांच्या जीवनशैलीला आत्मसात केले आहे. असे सांगून सूरजभाई यांनी आपण स्वत:ला बदलले पाहिजे. आणि स्वत:ला बदलणे कठीण नाही. दिवसभरातील घटनांचा सकारात्मक विचार करून निद्रा घेतली आणि त्याच ऊर्जेने सकाळी हसतमुखाने दिवसाची सुरुवात केली, तर विचारांबरोबरच जीवनदेखील बदलले जाते. मानव हा मूलत: बुद्धिमान प्राणी आहे. त्यामुळे जीवन हे सुखासाठी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वासंती दीदी तसेच पुष्पा दीदी आदी उपस्थित होत्या.आजचे व्याख्यान ,  विषय : अणु ऊर्जेचा विध्वंसक महाभ्रम आणि जैतापूर प्रकल्प. , वक्ते : राजेंद्र फातर्णेकर.

टॅग्स :Nashikनाशिक