शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

विचार बदला, जीवन बदलेल ! : सूरजभाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:44 IST

मनुष्याच्या जीवनात ताणतणाव वाढत असले तरी आजचा दिवस खूपच चांगला गेला, असा विचार करून रात्री निद्रा करा आणि सकाळी उठतानाही हसत मुखाने उठा, विचार बदलला तर जीवनही बदलेल, असे विचार माउंट अबू येथील ब्रह्मकुमार सूरजभाई यांनी व्यक्त केले.

नाशिक : मनुष्याच्या जीवनात ताणतणाव वाढत असले तरी आजचा दिवस खूपच चांगला गेला, असा विचार करून रात्री निद्रा करा आणि सकाळी उठतानाही हसत मुखाने उठा, विचार बदलला तर जीवनही बदलेल, असे विचार माउंट अबू येथील ब्रह्मकुमार सूरजभाई यांनी व्यक्त केले.  पंचवटीतील यशवंतराव महाराज पटांगणावर नाशिक वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. या व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि.२५) स्व. माणेकलाल भटेवरा स्मृती व्याख्यानाअंतर्गत सूरजभाई यांनी ‘जीवन : शंका समाधान’ या विषयावर गुंफले. मीनल साठ्ये यांनी त्यांची मुलाखत घेतली. गेल्या चाळीस वर्षात देशाने खूप प्रगती केली तसेच खूप संपत्ती निर्माण केली. शिक्षणाच्या सोयी केल्या, डॉक्टरही घडविले. परंतु रोग बरे होण्याऐवजी वाढतच गेले याचे कारण म्हणजे माणसांमध्ये सकारात्मक बदल होण्याऐवजी नकारात्मक भावना वाढीस लागली आहे. यात चूक म्हणजे आपण आपल्या आचार आणि विचारांपेक्षा इंग्रजांच्या जीवनशैलीला आत्मसात केले आहे. असे सांगून सूरजभाई यांनी आपण स्वत:ला बदलले पाहिजे. आणि स्वत:ला बदलणे कठीण नाही. दिवसभरातील घटनांचा सकारात्मक विचार करून निद्रा घेतली आणि त्याच ऊर्जेने सकाळी हसतमुखाने दिवसाची सुरुवात केली, तर विचारांबरोबरच जीवनदेखील बदलले जाते. मानव हा मूलत: बुद्धिमान प्राणी आहे. त्यामुळे जीवन हे सुखासाठी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वासंती दीदी तसेच पुष्पा दीदी आदी उपस्थित होत्या.आजचे व्याख्यान ,  विषय : अणु ऊर्जेचा विध्वंसक महाभ्रम आणि जैतापूर प्रकल्प. , वक्ते : राजेंद्र फातर्णेकर.

टॅग्स :Nashikनाशिक