शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला व्यावसायिकांवर मंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:27 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्वच व्यवसाय बंद होते. काही दिवसांपूर्वी लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता मिळाली असली तरी बाजारपेठेत मंदीचे सावट दिसून येत आहे. यामुळे सर्वच व्यावसायिक हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देकोरोना परिणाम : लग्नसराईलाही ब्रेक ; वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले

चांदवड :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्वच व्यवसाय बंद होते. काही दिवसांपूर्वी लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता मिळाली असली तरी बाजारपेठेत मंदीचे सावट दिसून येत आहे. यामुळे सर्वच व्यावसायिक हैराण झाले आहेत.लॉकडाउनमुळे सर्वत्र उद्योगव्यवसाय मोडीत निघतील असे बोलले जात आहे. चांदवडमधील बाजारपेठ काहीअंशी उघडली असली तरी गिºहाईकच येत नसल्याची प्रतिक्रिया व्यापारी बोलून दाखवित आहेत. त्यामुळे सर्वच व्यापारी, उद्योग व्यावसायिक आर्थिक कोेंडीत सापडले आहो. कोरोनामुळे अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. लॉकडाउन उठल्यानंतरही पुढे उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे शहरातील सर्वच व्यवसाय धोक्यात आले असून, तालुक्याची अर्र्थव्यवस्था कोलमडली आहे. दररोज नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.आज उघडेल, उद्या उघडेल या भरवशावर दररोज नवनवीन माहिती येत असल्याने सर्वच व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. शहरातील सलून, लॉण्ड्री, भांडीची दुकाने, कापड, रेडिमेड, सायकल दुकाने, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, ज्वेलर्स, हॉटेल व्यावसायिक, टपरीधारक, चहावाले, टॅक्सी, रिक्षा, टेम्पो चालक असे अनेक व्यवसाय बंद होते.हातावर पोट असलेल्यांना लॉकडाउनच्या दुसºया-तिसºया टप्प्यात दैनंदिन खर्च भागवणेही जिकिरीचे झाले होते. अनेक व्यावसायिकांना कामगार व नोकरांना घरी बसून का होईना, पगार द्यावा लागला.लॉकडाउनमुळे लग्नसराई गेली. त्यामुळे लग्नसराईवर अवलंबून असलेल्या घटकाचे नुकसान झाले. फोटोग्राफर,बॅण्डपथकातील वादक यांना उपासमारीची वेळ आली आहे. आठवड्याच्या बाजारावर अनेक जण आपला चरित्रार्थ चालवितात मात्र तोच बंद असल्याने तो कधी सुरु होईल अशी चिंता अनेक बाजारकरु व्यापाऱ्यांना लागली आहे. चांदवड शहरातील टॅक्सी, रिक्षा व्यवसाय बंदच आहे. त्यामुळे पुढील काळात पोटपाणी कसे भागणार का असा प्रश्न टॅक्सी, रिक्षाचालकांना सतावत आहे. अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांनी भाजीपाला, फळेविक्रीचा नव्याने व्यवसाय सुरु केला.प्रशासनाच्या वतीने एका जागी बसून माल विक्री करता येत नाही तर घरपोहच व्यवसाय करुन तो किती यशस्वी झाला, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. माल पडून राहणे, भाजीपाला पडणे, अशा अडचणी असल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांंिगतले. एकंदरीत सर्वच व्यापारी हवालदिल झाले असून, कोरोना लवकरात लवकर संपो सर्व काही सुरळीत होवो अशी अपेक्षा व्यापारीवर्गाने बोलून दाखविली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय