शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

चांदवडला व्यावसायिकांवर मंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:27 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्वच व्यवसाय बंद होते. काही दिवसांपूर्वी लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता मिळाली असली तरी बाजारपेठेत मंदीचे सावट दिसून येत आहे. यामुळे सर्वच व्यावसायिक हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देकोरोना परिणाम : लग्नसराईलाही ब्रेक ; वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले

चांदवड :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्वच व्यवसाय बंद होते. काही दिवसांपूर्वी लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता मिळाली असली तरी बाजारपेठेत मंदीचे सावट दिसून येत आहे. यामुळे सर्वच व्यावसायिक हैराण झाले आहेत.लॉकडाउनमुळे सर्वत्र उद्योगव्यवसाय मोडीत निघतील असे बोलले जात आहे. चांदवडमधील बाजारपेठ काहीअंशी उघडली असली तरी गिºहाईकच येत नसल्याची प्रतिक्रिया व्यापारी बोलून दाखवित आहेत. त्यामुळे सर्वच व्यापारी, उद्योग व्यावसायिक आर्थिक कोेंडीत सापडले आहो. कोरोनामुळे अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. लॉकडाउन उठल्यानंतरही पुढे उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे शहरातील सर्वच व्यवसाय धोक्यात आले असून, तालुक्याची अर्र्थव्यवस्था कोलमडली आहे. दररोज नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.आज उघडेल, उद्या उघडेल या भरवशावर दररोज नवनवीन माहिती येत असल्याने सर्वच व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. शहरातील सलून, लॉण्ड्री, भांडीची दुकाने, कापड, रेडिमेड, सायकल दुकाने, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, ज्वेलर्स, हॉटेल व्यावसायिक, टपरीधारक, चहावाले, टॅक्सी, रिक्षा, टेम्पो चालक असे अनेक व्यवसाय बंद होते.हातावर पोट असलेल्यांना लॉकडाउनच्या दुसºया-तिसºया टप्प्यात दैनंदिन खर्च भागवणेही जिकिरीचे झाले होते. अनेक व्यावसायिकांना कामगार व नोकरांना घरी बसून का होईना, पगार द्यावा लागला.लॉकडाउनमुळे लग्नसराई गेली. त्यामुळे लग्नसराईवर अवलंबून असलेल्या घटकाचे नुकसान झाले. फोटोग्राफर,बॅण्डपथकातील वादक यांना उपासमारीची वेळ आली आहे. आठवड्याच्या बाजारावर अनेक जण आपला चरित्रार्थ चालवितात मात्र तोच बंद असल्याने तो कधी सुरु होईल अशी चिंता अनेक बाजारकरु व्यापाऱ्यांना लागली आहे. चांदवड शहरातील टॅक्सी, रिक्षा व्यवसाय बंदच आहे. त्यामुळे पुढील काळात पोटपाणी कसे भागणार का असा प्रश्न टॅक्सी, रिक्षाचालकांना सतावत आहे. अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांनी भाजीपाला, फळेविक्रीचा नव्याने व्यवसाय सुरु केला.प्रशासनाच्या वतीने एका जागी बसून माल विक्री करता येत नाही तर घरपोहच व्यवसाय करुन तो किती यशस्वी झाला, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. माल पडून राहणे, भाजीपाला पडणे, अशा अडचणी असल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांंिगतले. एकंदरीत सर्वच व्यापारी हवालदिल झाले असून, कोरोना लवकरात लवकर संपो सर्व काही सुरळीत होवो अशी अपेक्षा व्यापारीवर्गाने बोलून दाखविली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय