शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर, अर्जुनसागर (पुनंद) धरणांतून विसर्ग

By admin | Updated: August 5, 2016 00:34 IST

कळवण : तालुक्यातील नद्यांना आला पूर, सतर्कतेचा इशारा दिल्याने यंत्रणा तळ ठोकून

 कळवण : तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने हजारो क्यूसेसने पूरपाणी गिरणा व पुनंद नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिल्याने पाटबंधारे विभागाची यंत्रणा २४ तास धरण लाभक्षेत्रात व धरणावर तळ ठोकून आहे. कमी अधिक प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना या पूरपाण्याचा फटका बसला आहे .चणकापूर लाभक्षेत्रात आज रात्री सकाळपासून ४५ मिमी पाऊस पडल्याची नोंद असून आतापर्यंत ६६१ मिमी. पाऊस चणकापूर धरणक्षेत्रात झाला असून मागील वर्षी ५५० मिमी. पाऊस पडल्याची नोंद आहे. यंदाच्या वर्षी १११ मिमी. पाऊस अधिक झाला असून आज सकाळी ९२३५ क्यूसेसने पूरपाणी गिरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात आले. आज चणकापूर धरणात पाण्याचा साठा १६५६ दशलक्ष घनफूट झाला आहे, तर अर्जुनसागर ( पुनंद ) धरणक्षेत्रात ६७ मिमी. पाऊस काल रात्री, सकाळपर्यंत पडल्याची नोंद असून आतापर्यंत धरण क्षेत्रात ८३७ मिमी पाऊस पडला असून मागील वर्षी ३५० मिमी. पाऊस पडला होता. यंदाच्या वर्षी ४८७ मिमी. पाऊस अधिक झाला असल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. अर्जुनसागर (पुनंद) धरणातून आज सकाळी ४७३८ क्यूसेसने पूरपाणी पुनंद नदीपात्रात विसर्ग करण्यात आले असून आज ५४ टक्के पाणीसाठा धरणात आहे. गेल्या महिन्याभरापासून चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून हजारो क्यूसेसने पूरपाणी विसर्ग करण्यात येत आहे.चणकापूर, गोसरणे, अभोणा, पाळे बुद्रुक, पाळे खुर्द, बेज, नाकोडे, कळवण, एकलहरे, बगडू, पिळकोस, सुपले दिगर, काठरे दिगर, सुळे, पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक, देसराणे, नाळीद, मोकभणगी, खेडगाव, ककाणे या नदीकाठावरील गावांना गिरणा व पुनंद नदीपात्रातील पूरपाण्याचा फटका बसला असून शेती व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तांबडी नदीला आलेल्या पुरामुळे शृंगारवाडी येथील आदिवासी शेतकरी मोतीराम पवार यांच्या शेतीचे व कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची तक्रार कळवण पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव यांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या शेतात पूरपाणी घुसल्याने शेतांचे व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील धनोली, भेगू, ओतूर, नांदुरी, गोबापूर आदिंसह लघु पाटबंधारे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले असून नदीपात्रात पाणी विसर्ग होत असल्याने तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आल्याने साकोरा येथील नदी नाल्यावरील सिमेंट बंधारा वाहून गेल्याची तक्र ार ग्रामस्थांनी केली आहे. गिरणा, पुनंद, बेहडा, तांबडी नद्यांना आलेला पूर पाहण्यासाठी कळवण, अभोणा, मानूर, जुनी बेज, एकलहरे, गांगवण, बिजोरे, भादवण, दळवट, मोकभणगी, पिळकोस गावातील नागरिकांनी नदीपात्रालगत एकच गर्दी केली होती. चणकापूर प्रकल्पातून, चणकापूर उजव्या कालव्यातून हजारो क्यूसेसने पाणी विसर्ग करण्यात आले असून तालुक्यातील पाझर तलाव, सिमेंट बंधारे १०० टक्के भरले आहेत. येत्या २ ते ३ दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून धरणातून हजारो क्यूसेस पूरपाणी सोडण्यात वाढ केली जाणार असल्याने गिरणा व पुनंद नदीला पूर येणार असल्याने नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.कळवण तालुक्यातील छोटी व मोठी लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरली असल्याने भविष्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून शेकडो पाझर तलाव व सिमेंट बंधारे पावसामुळे तुडुंब भरल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ झाली असून लघु पाटबंधारे प्रकल्प, तलाव व बंधारे तालुक्यातील शेतकरी बांधवांना वरदान ठरली आहेत. (वार्ताहर)