शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

चणकापूर, अर्जुनसागर (पुनंद) धरणांतून विसर्ग

By admin | Updated: August 5, 2016 00:34 IST

कळवण : तालुक्यातील नद्यांना आला पूर, सतर्कतेचा इशारा दिल्याने यंत्रणा तळ ठोकून

 कळवण : तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने हजारो क्यूसेसने पूरपाणी गिरणा व पुनंद नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिल्याने पाटबंधारे विभागाची यंत्रणा २४ तास धरण लाभक्षेत्रात व धरणावर तळ ठोकून आहे. कमी अधिक प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना या पूरपाण्याचा फटका बसला आहे .चणकापूर लाभक्षेत्रात आज रात्री सकाळपासून ४५ मिमी पाऊस पडल्याची नोंद असून आतापर्यंत ६६१ मिमी. पाऊस चणकापूर धरणक्षेत्रात झाला असून मागील वर्षी ५५० मिमी. पाऊस पडल्याची नोंद आहे. यंदाच्या वर्षी १११ मिमी. पाऊस अधिक झाला असून आज सकाळी ९२३५ क्यूसेसने पूरपाणी गिरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात आले. आज चणकापूर धरणात पाण्याचा साठा १६५६ दशलक्ष घनफूट झाला आहे, तर अर्जुनसागर ( पुनंद ) धरणक्षेत्रात ६७ मिमी. पाऊस काल रात्री, सकाळपर्यंत पडल्याची नोंद असून आतापर्यंत धरण क्षेत्रात ८३७ मिमी पाऊस पडला असून मागील वर्षी ३५० मिमी. पाऊस पडला होता. यंदाच्या वर्षी ४८७ मिमी. पाऊस अधिक झाला असल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. अर्जुनसागर (पुनंद) धरणातून आज सकाळी ४७३८ क्यूसेसने पूरपाणी पुनंद नदीपात्रात विसर्ग करण्यात आले असून आज ५४ टक्के पाणीसाठा धरणात आहे. गेल्या महिन्याभरापासून चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून हजारो क्यूसेसने पूरपाणी विसर्ग करण्यात येत आहे.चणकापूर, गोसरणे, अभोणा, पाळे बुद्रुक, पाळे खुर्द, बेज, नाकोडे, कळवण, एकलहरे, बगडू, पिळकोस, सुपले दिगर, काठरे दिगर, सुळे, पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक, देसराणे, नाळीद, मोकभणगी, खेडगाव, ककाणे या नदीकाठावरील गावांना गिरणा व पुनंद नदीपात्रातील पूरपाण्याचा फटका बसला असून शेती व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तांबडी नदीला आलेल्या पुरामुळे शृंगारवाडी येथील आदिवासी शेतकरी मोतीराम पवार यांच्या शेतीचे व कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची तक्रार कळवण पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव यांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या शेतात पूरपाणी घुसल्याने शेतांचे व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील धनोली, भेगू, ओतूर, नांदुरी, गोबापूर आदिंसह लघु पाटबंधारे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले असून नदीपात्रात पाणी विसर्ग होत असल्याने तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आल्याने साकोरा येथील नदी नाल्यावरील सिमेंट बंधारा वाहून गेल्याची तक्र ार ग्रामस्थांनी केली आहे. गिरणा, पुनंद, बेहडा, तांबडी नद्यांना आलेला पूर पाहण्यासाठी कळवण, अभोणा, मानूर, जुनी बेज, एकलहरे, गांगवण, बिजोरे, भादवण, दळवट, मोकभणगी, पिळकोस गावातील नागरिकांनी नदीपात्रालगत एकच गर्दी केली होती. चणकापूर प्रकल्पातून, चणकापूर उजव्या कालव्यातून हजारो क्यूसेसने पाणी विसर्ग करण्यात आले असून तालुक्यातील पाझर तलाव, सिमेंट बंधारे १०० टक्के भरले आहेत. येत्या २ ते ३ दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून धरणातून हजारो क्यूसेस पूरपाणी सोडण्यात वाढ केली जाणार असल्याने गिरणा व पुनंद नदीला पूर येणार असल्याने नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.कळवण तालुक्यातील छोटी व मोठी लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरली असल्याने भविष्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून शेकडो पाझर तलाव व सिमेंट बंधारे पावसामुळे तुडुंब भरल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ झाली असून लघु पाटबंधारे प्रकल्प, तलाव व बंधारे तालुक्यातील शेतकरी बांधवांना वरदान ठरली आहेत. (वार्ताहर)