शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

अशुद्ध पाणीपुरवठ्याने चांदोरीकर बेजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:28 IST

निफाड तालुक्यातील मुख्य गाव असलेल्या चांदोरीला गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेल्या १० दिवसांपासून गाव विकासाकरिता अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत.

ठळक मुद्देपरिसरात दुर्गंधी : रुग्णांच्या संख्येत वाढ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नाशिक : निफाड तालुक्यातील मुख्य गाव असलेल्या चांदोरीला गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेल्या १० दिवसांपासून गाव विकासाकरिता अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत.चांदोरी गावालगत असलेल्या गोदावरी नदीनजीक ग्रामपालिकेची विहीर असून, त्यातून पाणी उपसा करून नवीन बांधलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथून नवीन बांधलेल्या पाण्याच्या टाकीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र या जलशुद्धीकरण केंद्रासह परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, डासांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात तारकुंपण तसेच विजेची सुविधा नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी वर्गासाठी असलेल्या पडीत घरांचा वापर परिसरात असलेले काही लोक शौचालय म्हणून वापर करत असल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे.पुरेशा प्रमाणात सुरक्षा नसल्याने तरळीरामांचे आश्रयस्थान निर्माण झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्रानजीक असलेल्या पाणीपुरवठ्याच्या पाइपमधून पाणीगळती होत असल्याने परिसरात चिखल झाला आहे. त्यामुळे डुक्करांचा वावर वाढला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वीच सदर जलकुंभाचे काम केले असून, त्यास संरक्षक कठडे नाही, तसेच जलकुंभावर जाण्यासाठी जिन्याच्या पायºया मोडकळीस आल्या आहेत. ग्रामपालिका प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून ग्रामस्थांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.डेंग्यू रु ग्णसंख्येत वाढचांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डेंग्यूचे प्रमाण कमी असल्याचे दावे करत असले तरी गावाच्या विविध भागांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. रेकॉर्डवर नोंदवल्या जात असलेल्या आकडेवारीपेक्षा डेंग्यूचा फैलाव जास्त असल्याचे प्रॅक्टिस करणाºया डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याशिवाय मलेरियासह तापाच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ दिसू लागली आहे. त्यामुळे गावामध्ये चिंतेचे वातावरण असून, सरकारी दवाखान्यासह खासगी दवाखान्यांमध्येही रुग्णांची रीघ लागली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणWaterपाणी