शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

गोदापात्रातील पानवेलीमुळे चांदोरी-सायखेडा पुलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 18:31 IST

दुर्लक्ष : पानवेली हटविण्याची मागणी

ठळक मुद्दे पाण्याचा प्रवाह हा रसायनमिश्रित असल्याने पाण्याला फेस येऊन दुर्गंधी येत आहे

चांदोरी : येथील गोदापात्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पात्रातील वाढत्या पानवेलीमुळे चांदोरी-सायखेडा पुलाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, पात्रात रसायनमिश्रित पाणी येत असल्याने जलचरांनाही धोका उत्पन्न झाला आहे.उन्हाळ्यात राज्यातील जवळपास सर्वच नद्यानी तळ गाठला होता. चांदोरी परिसरातून जाणारे गोदापात्रही कोरडे पडले होते. मात्र. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्या-नाल्यांना पाणी वाढले आहे. गोदावरी पात्रातही पाण्याची पातळी वाढत चालली आहे. मात्र, सदर पाण्याचा प्रवाह हा रसायनमिश्रित असल्याने पाण्याला फेस येऊन दुर्गंधी येत आहे. त्यामुळे पात्रातील जलचरांना धोका उत्पन्न झाला आहे. याचबरोबर गोदावरी पात्रात चांदोरी-सायखेडा पुलाला अडकून असलेल्या पानवेली पाण्याला दूषित करत आहेत. पात्रात मोठ्या प्रमाणावर पानवेली वाढल्या असून पाण्याचा प्रवाह वाढल्यास त्याला अडथळा येऊन पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पात्रातील पानवेली काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पानवेलीचा अडथळा निर्माण झाल्याने पाणी आसपासच्या शेतात घुसून नुकसान होत आहे. पानवेली काढण्यासंबंधी जलसंपदा विभागाला वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.अस्तित्व धोक्यातमराठवाडा, अहमदनगर व नाशिकची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीपात्रात वाढत्या पाणवेली व वाढते प्रदूषण या मुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रदुषणामुळे नागरिकांचेही आरोग्याला धोका आहे. सदर पानवेली तातडीने हटवणे गरजेचे आहे.- सागर गडाख, अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन समिती

टॅग्स :Nashikनाशिक