शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

गोदापात्रातील पानवेलीमुळे चांदोरी-सायखेडा पुलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 18:31 IST

दुर्लक्ष : पानवेली हटविण्याची मागणी

ठळक मुद्दे पाण्याचा प्रवाह हा रसायनमिश्रित असल्याने पाण्याला फेस येऊन दुर्गंधी येत आहे

चांदोरी : येथील गोदापात्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पात्रातील वाढत्या पानवेलीमुळे चांदोरी-सायखेडा पुलाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, पात्रात रसायनमिश्रित पाणी येत असल्याने जलचरांनाही धोका उत्पन्न झाला आहे.उन्हाळ्यात राज्यातील जवळपास सर्वच नद्यानी तळ गाठला होता. चांदोरी परिसरातून जाणारे गोदापात्रही कोरडे पडले होते. मात्र. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्या-नाल्यांना पाणी वाढले आहे. गोदावरी पात्रातही पाण्याची पातळी वाढत चालली आहे. मात्र, सदर पाण्याचा प्रवाह हा रसायनमिश्रित असल्याने पाण्याला फेस येऊन दुर्गंधी येत आहे. त्यामुळे पात्रातील जलचरांना धोका उत्पन्न झाला आहे. याचबरोबर गोदावरी पात्रात चांदोरी-सायखेडा पुलाला अडकून असलेल्या पानवेली पाण्याला दूषित करत आहेत. पात्रात मोठ्या प्रमाणावर पानवेली वाढल्या असून पाण्याचा प्रवाह वाढल्यास त्याला अडथळा येऊन पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पात्रातील पानवेली काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पानवेलीचा अडथळा निर्माण झाल्याने पाणी आसपासच्या शेतात घुसून नुकसान होत आहे. पानवेली काढण्यासंबंधी जलसंपदा विभागाला वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.अस्तित्व धोक्यातमराठवाडा, अहमदनगर व नाशिकची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीपात्रात वाढत्या पाणवेली व वाढते प्रदूषण या मुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रदुषणामुळे नागरिकांचेही आरोग्याला धोका आहे. सदर पानवेली तातडीने हटवणे गरजेचे आहे.- सागर गडाख, अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन समिती

टॅग्स :Nashikनाशिक