शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
6
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
7
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
8
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
9
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
10
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
11
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
12
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
13
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
14
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
15
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
16
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
17
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
18
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
19
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
20
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी

चणकापूर धरण उशाशी

By admin | Updated: May 15, 2016 00:32 IST

आरक्षण : पाण्यावर इतरांचाच अधिकार अधिक

 शेखर महाले कनाशीचणकापूर आणि पुनंद प्रकल्पातून मालेगाव आणि सटाणा शहरासाठी पाणी आरक्षित केले जाते. जळगावकरही पाण्यावर हक्क सांगू लागले आहेत, चणकापूर धरण उराशी असूनसुद्धा त्यावर इतरांचा अधिकार आहे. कळवण, बागलाण, देवळा व मालेगाव तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. १४ जानेवारीला पाण्याचे पहिले आवर्तन दिले जाते. त्यानंतर शिल्लक पाणीसाठ्यानुसार आवर्तन दिले जाते. चणकापूर धरणातील मोठा साठा मालेगावसाठी आरक्षित असतो. झालेला पाऊस आणि आरक्षित पाणी या व्यतिरिक्त जे पाणी शिल्लक राहू शकते त्याचा अंदाज करून पाणी आवर्तन दिले जाते. कळवण, बागलाण, देवळा आण िमालेगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजना या पाण्यावर अवलंबून असून, चणकापूरमधील पाणीसाठा कमी झाल्यास अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून पाणी घेऊन पाणी सोडले जाते, तत्कालीन परिस्थितीनुसार चणकापूरचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. आज पाण्याची मागणी वाढली आहे, सर्वच क्षेत्रात वाढ झाल्याने शासनाने गिरणा नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांच्या दुरुस्तीबरोबर बंधारे बांधले तर भविष्यातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. पूर्वी भरपूर पाऊस पडायचा. गिरणा, बेहडी, पुनंद नदी वाहायची. काळ लोटला, लोकसंख्या वाढली, गरजेनुसार पाणी योजना झाल्या. नवीन धरणे व प्रकल्प झाले, पर्जन्यमान कमी झालेआहे.