शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हवामान बदलाचे शेती व्यवसायासमोर आव्हान

By admin | Updated: March 22, 2017 15:39 IST

द्राक्षाच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्यांसमोर सध्या हवामान बदलामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकविताणाच उत्पादन खर्चावरही नियंत्रण ठेण्याची गरज निर्माण झाली आहे.

नाशिक : द्राक्षाच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्यांसमोर सध्या हवामान बदलामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकविताणाच उत्पादन खर्चावरही नियंत्रण ठेण्याची गरज निर्माण झाली आहे. वायु प्रदुषणामुळे वातावरणात होणारे अनपेक्षित बदल द्राक्षांसह अन्य शेती पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास कारमीभूत ठरत असून जागतिक तपमानात सातत्याने होणारी वाढ या हवामानातील बदलाला कारणीभूत ठरत असल्याने शेतकऱ्यांसमोरही आता ग्लोबल वार्मिंगचे आव्हान उभे ठाकले आहे. बदलत्या हवामानाचा आणि जागतिक तापमानात झालेली वाढ (ग्लोबल वार्मिंग) याची चाहूल महाराष्ट्राला १९७२ च्या दुष्काळापासून लागली असून १९७२ च्या दुष्काळानंतर पावसाने मृगाच्या ७ जूनला होणारा शिडकाव व पेरणीची न चुकणारी तारीख या ठरलेल्या शेतकऱ्याच्या आनंदाच्या क्षणाला तडा जावू लागला आहे. मृगाची ७ जूनला सुरुवात म्हणजे शेतकऱ्यांतील चैतन्य, कृषी क्षेत्रातील व्यापारउदीमतेतील उत्साह, ग्रामीण स्त्रियांची बी भरण्याची लगबग व साफसफाई करण्याची मुहूर्तमेढ ठरत असे. जस-जसे कोरडवाहू क्षेत्रातील मान्सून पावसावरील अवलंबन कमी होऊ लागले तसे तसे साधारण १९८५ ते १९९५ च्या दशकात द्राक्ष बागा, डाळींब फळबाग लागवडीमध्ये वाढ झाली.