शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

गावठाण पुनर्विकासाचे आव्हान

By admin | Updated: November 15, 2016 02:11 IST

भद्रकाली, सराफबाजार : पूररेषा, काजीगढीचा प्रश्न प्रलंबितच

 धनंजय वाखारे नाशिकगोदाघाटालगत वसलेले मूळचे नाशिक म्हणून नव्या रचनेतील प्रभाग क्रमांक १३ ची ओळख आहे. पाच वेळा महापौरपदासह विविध सत्तापदे प्राप्त होऊनही या प्रभागातील गावठाण परिसर विकासाची कात टाकू शकलेला नाही. आता नाशिकचा ‘स्मार्ट सिटी’ अभियानात समावेश झाल्याने याच प्रभागातील जुने नाशिक परिसरात गावठाण पुनर्विकासाची योजना राबविण्याचे मोठे आव्हान येऊ घातलेल्या लोकप्रतिनिधींपुढे असणार आहे. प्रभागातील गोदावरी नदीचे प्रदूषण, पूररेषा बाधितांचे भवितव्य, काजीगढीची संरक्षक भिंत आदि प्रश्न अद्यापही मार्गी लागू शकलेले नाहीत.नवीन प्रभाग रचनेत सध्याचा प्रभाग क्रमांक १३, २५, २७ आणि २९ यांचा काही भाग मिळून प्रभाग क्रमांक १३ ची निर्मिती करण्यात आली आहे. प्रभागाची व्याप्ती रविवार पेठेतील हेमलता टॉकीजपासून ते कालिकेच्या अलीकडील गडकरी चौकापर्यंत असल्याने प्रभागातील लढत लक्षवेधी आणि चुरशीची ठरणार आहे. प्रभागात मोठ्या प्रमाणावर जुन्या नाशिकमधील गावठाणाचा समावेश असल्याने इच्छुक उमेदवारांची कसोटी लागणार आहे. चार प्रभागातील काही भाग एकत्र केला असला तरी परिसरात गेल्या पाच पंचवार्षिक काळात सेना-भाजपा आणि कॉँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. २०१२ च्या निवडणुकीत राज ठाकरे लाटेवर स्वार होत मनसेनेही परिसरात मुसंडी मारली. मात्र, आता होऊ घातलेल्या निवडणुकीत अनेक आजी-माजी मातब्बर लोकप्रतिनिधी आमने-सामने येण्याची शक्यता असल्याने प्रभाग १३ ची निवडणूक ही संपूर्ण शहराच्या दृष्टीने सर्वाधिक चर्चेत राहणार आहे. अतिशय संवेदनशील म्हणूनही या प्रभागाकडे पाहिले जात असल्याने निवडणूक शाखेचीही कसोटी लागणार आहे. प्रभागात गावठाणाचा भाग मोठ्या प्रमाणावर असल्याने रचनात्मक प्रकल्प काही उभे राहू शकलेले नाहीत. परंतु, मूलभूत सोयी-सुविधांची ओरड मात्र कायम आहे. प्रभागात अस्वच्छता तर पाचवीला पुजलेली आहे. त्यातून नागरिकांची काही सुटका होऊ शकलेली नाही. जागोजागी कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता यामुळे नेहमीच आरोग्याचा प्रश्न भेडसावत असतो. गोदावरीनदीकाठच्या रहिवाशांचा पूररेषेबाबतचा धोका अद्यापही संपलेला नाही. काजीगढीच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न मार्गी लागू शकलेला नाही. वाहनतळ ही मोठी समस्या कायम आहे. आता स्मार्ट सिटीअंतर्गत गावठाण पुनर्विकासाचे आव्हान आहे.नवीन प्रभाग १३ च्या परिसरातून आतापर्यंत कॉँग्रेसचे शांतारामबापू वावरे, पंडितराव खैरे, वत्सला खैरे, शाहू खैरे, भाजपाचे बंडोपंत जोशी, सतीश शुक्ल, विजय साने, प्रशांत आव्हाड, अशोक गोसावी, शिवसेनेचे विनायक पांडे, हरिभाऊ लोणारी, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, संजय चव्हाण, रंजना पवार, विनायक खैरे, सुमनताई बागले, मनसेचे अ‍ॅड. यतिन वाघ, मीनाताई चौधरी, सुरेखा भोसले, माधुरी जाधव यांनी महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. १९९२ मध्ये महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आली त्यावेळी पहिली तीन वर्षे याच भागाला महापौरपदाचा बहुमान लाभला. शांतारामबापू वावरे हे सलग दोनदा महापौर झाले. त्यानंतर पंडितराव खैरे यांनी महापौरपद भूषविले. चौथ्या पंचवार्षिक काळात सेनेचे विनायक पांडे यांनी महापौरपदाची धुरा सांभाळली. तर चालू पंचवार्षिक काळात पहिली अडीच वर्षे मनसेचे अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. याशिवाय, स्थायी समितीचे सभापतिपदी शाहू खैरे, विजय साने यांचीही कामगिरी लक्षवेधी राहिली. रविवार कारंजा, सराफ बाजार, मेनरोड, भद्रकाली परिसरात सेना-भाजपाचे वर्चस्व राहिले तर गावठाणात कॉँग्रेस-रा.कॉँचा प्रभाव राहत आला आहे.