शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

काँग्रेसपुढे सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST

अतुल शेवाळे, मालेगाव : महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसचे कायमच वर्चस्व दिसून आले आहे. महापालिका स्थापनेला २० वर्षे उलटली आहेत. या ...

अतुल शेवाळे, मालेगाव : महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसचे कायमच वर्चस्व दिसून आले आहे. महापालिका स्थापनेला २० वर्षे उलटली आहेत. या दोन दशकांच्या कार्यकाळात कॉंग्रेसने तीन वेळा महापाैरपद पटकावत महापालिकेची सत्ता हस्तगत केली आहे. आगामी निवडणुकीत कॉंग्रेसपुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. जनता दल, महागठबंधन आघाडी, एमआयएम आदी पक्षांनी काँग्रेसचा वारू रोखण्यासाठी व्यूहरचना सुरू केल्या आहेत.

महापालिकेची स्थापना १७ डिसेंबर २००१ रोजी झाली. पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत जनता दलाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत माजी मंत्री, दिवंगत नेते निहाल अहमद यांची मालेगावच्या पहिल्या महापौरपदी वर्णी लागली. कॉंग्रेस व जनता दलामध्ये विधानसभेच्या निवडणुकीपासूनच चुरस दिसून आली. महापालिकेची सत्ताही जनता दलाकडे गेल्यामुळे कॉंग्रेसचा झालेला पराभव जिव्हारी लागला. यानंतरच्या महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने करिष्मा दाखवत जनता दलाकडून महापालिकेची सत्ता हिसकावून घेतली. महापालिकेच्या महापौरपदी माजी आमदार आसीफ शेख यांची वर्णी लागली. त्यानंतर धर्मगुरू तथा विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा करिष्मा चालला. तिसरा महाजचे नजमुद्दीन शेख गुलशेर यांची महापौरपदी वर्णी लागली. दरम्यानच्या काळात मालेगाव शहर बॉम्बस्फोटाने हादरले. या बॉम्बस्फोटानंतर शहरात जखमींवर उपचार करण्यासाठी सुसज्ज रुग्णालय नसल्याची बाब समोर आली. शासन अनुदानातून तत्कालीन कॉंग्रेस शासनाने मालेगावी जिल्हा दर्जाचे सामान्य रुग्णालय उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. तसेच महापालिकेनेही कालीकुट्टी भागात जमीन उपलब्ध करून दिली. येथूनच कॉंग्रेसच्या राजकारणाला बळ मिळाले. जनतेनेही कॉंग्रेसला खंबीरपणे साथ दिली. महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या व पहिल्या महिला महापौर म्हणून श्रीमती ताहेरा शेख यांची वर्णी लागली. या घडामोडीनंतर कॉंग्रेसचा वारू चौफेर उधळला. महापालिकेची नवीन इमारत व महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कॉंग्रेसने शासनस्तरावरून प्रयत्न करून विकासकामे मार्गी लावली. परिणामी, महापालिकेच्या सत्तास्थानी कॉंग्रेसचे वर्चस्व कायम दिसून आले.

इन्फो

आरोप-प्रत्यारोप सुरू

२०१७ च्या निवडणुकीत जनतेने कॉंग्रेसचे तब्बल २७ नगरसेवक निवडून दिले, तर विरोधी पक्षाच्या महागठबंधनचे २६ नगरसेवक निवडून दिले. महापौरपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे २७, शिवसेनेचे १२ व छुपा पाठिंबा दिलेल्या भाजप ९, एमआयएम ७ अशा ५५ नगरसेवकांच्या संख्याबळावर कॉंग्रेसचे रशीद शेख व सेनेचे सखाराम घोडके पहिल्या टर्ममध्ये महापौर व उपमहापौरपदी विराजमान झाले. तर, शेवटच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात कॉंग्रेसच्याच ताहेरा शेख व सेनेचे निलेश आहेर यांनी महापौर व उपमहापौरपद भूषविले. महापालिकेच्या राजकारणात कॉंग्रेसचा कायम दबदबा राहिला आहे. आगामी निवडणुकीत कॉंग्रेसपुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. जनता दल, महागठबंधन आघाडी, एमआयएम आदी पक्षांनी कॉंग्रेसचा वारू रोखण्यासाठी व्यूहरचना सुरू केल्या आहेत. तर, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पूर्व भागात सभा, जलसांमधून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.