शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मध्य नाशिक : पारंपरिक आडाख्यांपेक्षा सुशिक्षित मतदानच निर्णायकमतदारांना गृहीत धरणे पडले महागात

By admin | Updated: October 30, 2014 00:11 IST

मध्य नाशिक : पारंपरिक आडाख्यांपेक्षा सुशिक्षित मतदानच निर्णायकमतदारांना गृहीत धरणे पडले महागात

नाशिक : सारेच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित असल्याने आपली ताकद आजमावण्याची साऱ्याच उमेदवारांना संधी देणाऱ्या मध्य नाशिक मतदारसंघात सारेच पारंपरिक आडाखे चुकवले आणि अर्थकारणाच्या जोरावर विशिष्ट मतांची बेगमी करणाऱ्या उमेदवारांना धडा शिकवतानाच, मतदारांना कोणी गृहीत धरू शकत नाही, हेही या मतदारांनी सिद्ध केले. मध्य नाशिक मतदारसंघात मतदारांचीच दोन भागांत विभागणी करून आपल्या विजयाचे गणित मांडण्याचा प्रयत्न या निवडणुकीतील बहुसंख्य उमेदवारांनी केला होता. त्याआधारे विशिष्ट मतांकडेच लक्ष केंद्रित केले होते; परंतु या मतदारसंघात उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची केंद्रनिहाय आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर उच्चभ्रू मतदार हा निर्णायक ठरू शकत नाही असे आजवर मानणाऱ्या उमेदवारांना या मतदारांनी निर्णय फिरवण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिलेच; परंतु जी मते आपल्या ताकदीने कुठेही फिरवू शकतो अशा मुखंडांनादेखील मतदारांनी तोंडघशी पाडले. राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून ज्या मतदारांनी पाच वर्षांपूर्वी मनसेला साथ दिली, त्याच मतदारांनी मनसेचे प्रभाव क्षेत्र असलेल्या सर्वच भागांत या पक्षाला नाकारले. अव्वल क्रमांक दूरच; परंतु दुसऱ्या क्रमाकांसाठीही गिते यांना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या उमेदवारांनी झुंजवले यातच सारे आले. ज्या भागात भाजपाला साथ मिळणारच नाही असे समजले जात होते, तेथेही भाजपाला मतदान झाल्याने मतदारांचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. पक्षांतर्गत राजी- नाराजी, बलस्थाने या उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात हे खरे असले, तरी या सर्वांपलीकडे निवडणुकीत कोणता निकाल द्यायचा हे मतदारच ठरवित असतो आणि तेच स्पष्ट करणारा हा निकाल ठरला आहे. (प्रतिनिधी)