शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

केंद्रीय कृषी समिती तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर; ६ ते ९ फेब्रुवारीला नाशिक, पुणे, बीड जिल्ह्यात पाहणी

By दिनेश पाठक | Updated: February 2, 2024 21:56 IST

कांदा पिकाचा घेणार आढावा

नाशिक : केंद्रीय कृषी समिती ६ व ७ फेब्रुवारी असे दोन दिवस नाशिक तर दि. ८ व ९ राेजी पुणे व बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. ऑक्टाेंबरच्या अखेरीस व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात  झालेल्या अवकाळी  पावसानंतर  केंद्रीय  समिती  तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर येत आहे. कांद्याचे पडलेले भाव, सध्याचा पाण्याचा सोर्स याचा आढावा समिती घेईल. भारत सरकारच्या कृषी विभागाचे उपसंचालक  पंकजकुमार यांच्या मार्गदर्शनाखालील चार सदस्यीय समिती कृषी आढावा घेईल.

दरम्यान, ७ नोव्हेंबर २०२३ ला केंद्रीय कृषी समिती नुकसानीच्या पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आली हाेती. त्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही समितीने नाशिक, जळगाव, पुणे व अन्य नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता. या दोन दाैऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी फार काही पडले असेही नाही. किंवा पिक विमा भरपाईचा लाभही परिपूर्ण मिळाला  नाही.  त्यातच  शेतकऱ्यांनी समितीसमोर रोष व्यक्त करून देखील कांदा निर्यातबंदी हटविली गेली नाही. त्यामुळे समितीच्या तिसऱ्या दाैऱ्यात काय हाती पडणार? की समिती आपला सोपस्कार पूर्ण करणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. कांदा उत्पादकांचे समितीसमोर आव्हान

केंद्रीय अर्थसंकल्पात कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे हाेईल किंवा हमी भाव मिळेल, अशी आशा कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होती. परंतू तसे न झाल्याने कांदा उत्पादकांनी पुन्हा आंदोलनाचा  इशारा दिला  आहे ृाअशातच केंद्रीय समिती परत एकदा दोन दिवस नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने समितीला संतप्त शेतकऱ्यांचा रोष सहन करावा लागू शकतो. त्यातून समिती काय तोडगा काढणार? हे पाहणे देखील महत्वाचे ठरेल. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने ३२ हजार ८३२ हेक्टरवर नुकसान झाले होते. तर १० हजार ४०० हेक्टरवर फक्त कांदा पिकाला झळ बसली होती.