शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

दुप्पट योजनेसाठी केंद्र , राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:42 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्तरीत्या उपक्रम हाती घेतला असून, त्यासाठी महाराष्ट्रातील पाचही कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, विद्यापीठनिहाय तज्ज्ञ शास्त्रज्ञ व प्रयोगशील शेतकरी यांची तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली  आहे़

नाशिक : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्तरीत्या उपक्रम हाती घेतला असून, त्यासाठी महाराष्ट्रातील पाचही कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, विद्यापीठनिहाय तज्ज्ञ शास्त्रज्ञ व प्रयोगशील शेतकरी यांची तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली  आहे़  समितीतील प्रत्येक विद्यापीठातर्फे तयार केलेला अहवाल हा शासनास सादर केला जाणार आहे़ या सर्व अहवालांवर पुणे येथील यशदामध्ये होणाºया तज्ज्ञांची बैठकीत चर्चा होऊन त्यातून महाराष्ट्र पातळीवरील नियोजनाचा अहवाल केंद्रास पाठविला जाणार आहे़ देशातील सर्व राज्यांच्या अहवालाचे एकत्रीकरण करून केंद्रीय पातळीवर या प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे़  शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ‘शेतकरी उत्पन्न दुप्पट’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, या प्रकल्पाच्या अहवालासाठीचे प्राथमिक काम विद्यापीठ पातळीवर सुरू केले आहे़ या प्रकल्पाचे नियोजन करण्यासाठी पुणे येथील कृषी महाविद्यालयात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ के. पी़ विश्वनाथा व पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमप यांच्या उपस्थितीत चारही विद्यापीठांचे कुलगुरु व तज्ज्ञांची बैठक झाली़ त्यामध्ये प्रत्येक कृषी विद्यापीठनिहाय तज्ज्ञ शास्त्रज्ञ, प्रयोगशील शेतकरी यांची तज्ज्ञ समितीही नेमण्यात आली आहे़ शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसंबंधी ही समिती अहवाल तयार करणार असून, तो शासनास सादर केला जाणार आहे़  महाराष्ट्रातील पाचही विद्यापीठांनी तयार केलेले अहवाल शासनाकडे आल्यानंतर या अहवालांवर पुण्यातील यशदा येथे तज्ज्ञांच्या बैठकीत चर्चा होऊन महाराष्ट्र पातळीवर अंतिम नियोजन केले जाईल व हा अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला जाईल़ केंद्राकडे देशातील सर्व राज्यांचे अहवाल आल्यानंतर केंद्रीय पातळीवर या प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणीसाठी कृती कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे़  लोकसभा वा काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी हा प्रकल्प केंद्राकडून लागू केला जाणार असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे़प्रकल्पातून महाराष्ट्राला सुमारे ७५ हजार कोटीमहाराष्ट्रातील पाचही विद्यापीठांना सप्टेंबरपूर्वी आपापले अहवाल तयार करावयाचे असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या अहवालावर पुण्यातील यशदामध्ये चर्चा होणार आहे़  या बैठकीला कृषिमंत्री, कृषी राज्यमंत्री, कृषी आयुक्त, पशुसंवर्धनमंत्री, पशुसंवर्धन आयुक्त उपस्थित राहणार असून, हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाणार आहे़ या प्रकल्पासाठी महाराष्ट्राला सुमारे ७५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत़

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी