शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

दुप्पट योजनेसाठी केंद्र , राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:42 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्तरीत्या उपक्रम हाती घेतला असून, त्यासाठी महाराष्ट्रातील पाचही कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, विद्यापीठनिहाय तज्ज्ञ शास्त्रज्ञ व प्रयोगशील शेतकरी यांची तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली  आहे़

नाशिक : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्तरीत्या उपक्रम हाती घेतला असून, त्यासाठी महाराष्ट्रातील पाचही कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, विद्यापीठनिहाय तज्ज्ञ शास्त्रज्ञ व प्रयोगशील शेतकरी यांची तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली  आहे़  समितीतील प्रत्येक विद्यापीठातर्फे तयार केलेला अहवाल हा शासनास सादर केला जाणार आहे़ या सर्व अहवालांवर पुणे येथील यशदामध्ये होणाºया तज्ज्ञांची बैठकीत चर्चा होऊन त्यातून महाराष्ट्र पातळीवरील नियोजनाचा अहवाल केंद्रास पाठविला जाणार आहे़ देशातील सर्व राज्यांच्या अहवालाचे एकत्रीकरण करून केंद्रीय पातळीवर या प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे़  शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ‘शेतकरी उत्पन्न दुप्पट’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, या प्रकल्पाच्या अहवालासाठीचे प्राथमिक काम विद्यापीठ पातळीवर सुरू केले आहे़ या प्रकल्पाचे नियोजन करण्यासाठी पुणे येथील कृषी महाविद्यालयात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ के. पी़ विश्वनाथा व पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमप यांच्या उपस्थितीत चारही विद्यापीठांचे कुलगुरु व तज्ज्ञांची बैठक झाली़ त्यामध्ये प्रत्येक कृषी विद्यापीठनिहाय तज्ज्ञ शास्त्रज्ञ, प्रयोगशील शेतकरी यांची तज्ज्ञ समितीही नेमण्यात आली आहे़ शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसंबंधी ही समिती अहवाल तयार करणार असून, तो शासनास सादर केला जाणार आहे़  महाराष्ट्रातील पाचही विद्यापीठांनी तयार केलेले अहवाल शासनाकडे आल्यानंतर या अहवालांवर पुण्यातील यशदा येथे तज्ज्ञांच्या बैठकीत चर्चा होऊन महाराष्ट्र पातळीवर अंतिम नियोजन केले जाईल व हा अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला जाईल़ केंद्राकडे देशातील सर्व राज्यांचे अहवाल आल्यानंतर केंद्रीय पातळीवर या प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणीसाठी कृती कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे़  लोकसभा वा काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी हा प्रकल्प केंद्राकडून लागू केला जाणार असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे़प्रकल्पातून महाराष्ट्राला सुमारे ७५ हजार कोटीमहाराष्ट्रातील पाचही विद्यापीठांना सप्टेंबरपूर्वी आपापले अहवाल तयार करावयाचे असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या अहवालावर पुण्यातील यशदामध्ये चर्चा होणार आहे़  या बैठकीला कृषिमंत्री, कृषी राज्यमंत्री, कृषी आयुक्त, पशुसंवर्धनमंत्री, पशुसंवर्धन आयुक्त उपस्थित राहणार असून, हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाणार आहे़ या प्रकल्पासाठी महाराष्ट्राला सुमारे ७५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत़

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी