शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

केवळ ओबीसी नको सर्व जातींच्या आधारावर जनगणना करावी : आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:24 IST

नाशिक : केवळ ओबीसींची जनगणना न करता सर्व जातींच्या आधारावर जनगणना होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देश्री काळाराम मंदिर सत्याग्रह स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी रामदास आठवले नाशिक येथे आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केवळ ओबीसींची जनगणना न करता सर्व जातींच्या आधारावर जनगणना होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.श्री काळाराम मंदिर सत्याग्रह स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी रामदास आठवले नाशिक येथे आले होते. यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. २०११ नंतर अनेक बौद्धांनी आपल्या जातीच्या दाखल्यांवर बौद्ध असा उल्लेख केला आहे. पण जातीचा उल्लेख केला जात नसल्याने त्यांना सर्वसाधारण गटात धरले जात असून, असे लोक मागासवर्गीयांच्या सवलतींपासून वंचित राहात आहेत.याबाबत आपण लवकरच सुधारणा विधेयक आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा समतेचा सत्याग्रह असून आज देशभरात परिवर्तन होत आहे. देशभरात एक लाखाहून अधिक आंतरजातीय विवाह होत आहेत. ही चांगली बाब आहे मात्र अजूनही मागासवर्गीयांवर अत्याचाराच्या घटना सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. शासनकर्ती जमात बना, असे डॉ. बाबासाहेबांनी सांगितले होते, पण रिपाइं एकट्याने सत्तेवर येणे शक्य नाही युती केल्याशिवाय सत्ता मिळणार नाही. त्यामुळे रिपाइंने भाजपशी युती केली आहे. त्यामुळे काही विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अफवा पसरवत आहेत, मात्र पंतप्रधान मोदी हे संविधानाचा आदर करतात. संविधान हा माझ्यासाठी धर्मग्रंथ असल्याचे मोदी म्हणतात, असे आठवलेम्हणाले.केंद्र सरकारने आणलेल्या सीएए कायद्याचे समर्थन करून या कायद्याला आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. या कायद्यावरून कॉँग्रेसला केंद्र सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली. मुस्लिमांना त्यापासून कोणताही धोका नसून जर त्यांचे नुकसान होणार असेल तर आपण मुस्लिमांच्या बाजूने उभे राहू, असेही त्यांनी सांगितले. दिल्लीत झालेल्या दंगलीमागे कॉँग्रेस आणि आपचा हात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. देशभरात एक कोटी सभासदांचे लक्ष्यकेंद्रीय निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) या पक्षाला मान्यता दिली असून, येत्या सहा महिन्यांत पक्षसदस्य नोंदणी करून पक्षांतर्गत निवडणुका घेऊन ते सर्व दस्तऐवज निवडणूक आयोगाला सादर करावयाचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्ष सदस्य नोंदणी करून संघटनात्मक निवडणुका घ्याव्यात. देशभरात किमान एक कोटी आणि महाराष्टÑात किमान ६० ते ७० लाख पक्ष सभासद नोंदणीचे उद्दिष्ट असून, कार्यकर्त्यांनी त्यासाठी कामाला लागावे अशा सूचना पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केल्या.

टॅग्स :kalaram templeकाळाराम मंदीरRamdas Athawaleरामदास आठवले