शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

विंचूर शहरावर आता सीसीटीव्हीची नजर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:48 IST

विंचूर : नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील विंचूर येथील महामार्गासह तीनपाटी भागावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे तीनपाटी भागासह विंचूर शहरातील प्रवेशाचे प्रमुख मार्ग पोलिसांच्या नजरेत राहणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

ठळक मुद्देविंचूरचा गेल्या काही वर्षांपासून नावलोकिक वाढला

विंचूर : नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील विंचूर येथील महामार्गासह तीनपाटी भागावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे तीनपाटी भागासह विंचूर शहरातील प्रवेशाचे प्रमुख मार्ग पोलिसांच्या नजरेत राहणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.औद्योगिक वसाहत, उपबाजार समिती आणि पंचक्रोशीतील सर्व गावांचे केंद्रस्थान म्हणून विंचूरचा गेल्या काही वर्षांपासून नावलोकिक वाढला, तशी येथील वाहतूक आणि नागरिकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील नाशिक, येवला, लासलगावला जोडणाऱ्या तीनपाटी भागात प्रवाशांसह परिसरातील नागरिकांची कायम गर्दी असते. विंचूरला शिक्षणासाठी येणाऱ्या तसेच बाहेरगावी महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनी यांचीही येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज होती. लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.आयपी कॅमेरेतीनपाटी भागात चार मेगापिक्सल नाईटव्हिजनचे आयपी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षितता निर्माण होणार आहे. परिसरातील छोटी मोठी गुन्हेगारी पाहता सीसीटीव्हीची गरज वाढली आहे. बसवल्या जाणा-या सीसीटीव्ही कॅमे-यांमुळे गुन्हेगारी रोखण्यासोबतच गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार आहे.गुन्हेगारीवर लक्षनाशिक औरंगाबाद महामार्गावरील संपूर्ण तीनपाटी परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत येणार आहे.कॅमेरे सर्व दिशेस कव्हर करत असल्याने कोणताही परिसर याच्या नजरेतुन सुटत नाही. विंचूरच्या प्रवेशद्वारावरच नजर असल्याने गावात बाहेरुन आलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयितांवर लक्ष ठेवता येणार आहे. येथे कनिष्ठ महाविद्यालय असल्याने शाळा परिसर व तीनपाटी भागात विद्यार्थीनींची वर्दळ असते. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातुन सीसीटीव्ही कॅमे-याची गरज होती.विंचूर महामार्गावरील असल्याने येथे सीसीटीव्हीची गरज होती. पोलीस प्रशासन व जनतेच्या सहकार्यातुन अजुन कॅमेरे बसविण्यात येतील. त्यामुळे बाहेरुन येणा-या गुन्हेगारांवर नजर ठेवता येऊ शकेल.- राहुल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक,लासलगाववाढती लोकसंख्या आणि उपबाजार समितीमुळे येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. विंचूरच्या प्रवेशद्वारावरच कॅमेरे असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातुन गावहिताचा उपक्रम आहे.-जी.टी.खैरनार,ग्रामविकास अधिकारी

टॅग्स :Policeपोलिसcctvसीसीटीव्ही