शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

‘सायबर गुन्हेगारांपासून खबरदारी आवश्यक’

By admin | Updated: November 14, 2016 01:26 IST

‘सायबर गुन्हेगारांपासून खबरदारी आवश्यक’

नाशिक : बँकेतून बोलतोय, तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक केले आहे, ते पुन्हा सुरू करण्यासाठी एटीएम नंबर व पिनकोड सांगा, अशा विविध क्लृप्त्या वापरून सायबर गुन्हेगार नागरिकांनी कष्टाने कमावलेली संपत्तीची काही सेकंदात लूट करतात़ त्यामुळे अशा भामट्यांपासून बचाव करण्यासाठी आता नागरिकांनाच जागरूक व्हावे लागणार आहे़ याचे प्रमुख कारण म्हणजे देशाची वाटचाल ही डिजिटलकडे होत चालली असून, येत्या दोन वर्षांत डिजिटलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे प्रतिपादन सायबर तज्ज्ञ विकास नाईक यांनी शनिवारी (दि़१२) एचआरडी सेंटर येथे केले़ रोटरी क्लब आॅफ नाशिक वेस्ट, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे विधी महाविद्यालय व आविष्कार या संस्थांमार्फत विधी साक्षरता उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी ‘सायबर गुन्हे व उपाययोजना’ या विषयावर सायबर तज्ज्ञ विकास नाईक व अ‍ॅड़ नागनाथ गोरवाडकर यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी आयोजित व्याख्यानात नाईक बोलत होते़ नाईक यांनी सांगितले की, बहुतांशी नागरिकांकडे स्मार्ट फोन आहेत, याद्वारे इंटरनेटचा वापर करून अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केले जातात़ यावेळी सावधानता न बाळगल्यास आपली गोपनीय माहिती लिक होऊ शकते़ मोबाइल तंत्रज्ञानाच्या फायद्यांबरोबरच तोटेही असून हॅकर माहिती मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. या उपक्रमाद्वारे दर पंधरा दिवसांनी कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सांगितले़ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल रोटेरियन दादासाहेब देशमुख उपस्थित होते़ प्रास्ताविक अ‍ॅड़ इंद्रायणी पटणी यांनी केले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्वरी बालाजीवाले यांनी तर आभार प्राध्यापक चारुशिला खैरनार यांनी मानले़ (प्रतिनिधी)