शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पिके करपू लागली

By admin | Updated: August 30, 2015 23:32 IST

खरीप धोक्यात : तीव्र पाणीटंचाई; पाऊस होत नसल्याने बळीराजा हवालदिल

पावसाअभावी पिके करपू लागलीखरीप धोक्यात : तीव्र पाणीटंचाई; पाऊस होत नसल्याने बळीराजा हवालदिलनाशिक : सिन्नर तालुक्यातील निमगाव-सिन्नर, बारागावपिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडी, के.पा.नगर या गावांसह पूर्व भागात पावसाअभावी खरिपाची पिके जळून जात असल्याचे चित्र आहे. सलग पाचव्या वर्षी पावसाने वक्रदृष्टी केल्याने खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. शेतीच्या पाण्यापेक्षाही शेतकऱ्यांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पशुधन वाचविणेही अवघड होऊन बसले आहे. सलग दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, खरिपाच्या पेरण्यांचा खर्च मातीत गेल्याने बळीराजावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. परिसरात सध्या बाजरी, मका, सोयाबीन, उडीद, मूग आदिंसह कडधान्यासारख्या जिरायती पिकांची लागवड केली आहे. मात्र या पिकांना संजीवनी देण्याइतपतही पाऊस नसल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना खरिपात केवळ खाण्यापुरते उत्पादन मिळत होते. यावर्षी वरुणराजाने पुन्हा वक्रदृष्टी केल्याने शेतकऱ्यांनाही विकत धान्य घेण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी बॅँका, पतसंस्था किंवा नातेवाइकां कडून हातउसने पैसे घेऊन खरिपाच्या पेरण्या केल्या. मोलामहागाचे बी-बियाणे, खते विकत घेतली; मात्र मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात झालेल्या पावसानंतर सुमारे दोन-अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बाजरी, मका, सोयाबीन यांच्यासह कडधान्याची उतरून पडलेली पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. काही भागातील पिके दाणे भरण्याच्या स्थितीत आहेत; मात्र पाण्याअभावी त्यांचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निमगाव-सिन्नर, बारागावपिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडी, के.पा.नगर या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तलाव, बंधारे कोरडेठाक आहेत. त्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य आहे. विहिरींना पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बारागावपिंप्री व परिसरातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. (लोकमत चमू)सिन्नर तालुक्यात सरासरीपेक्षा केवळ ३६ टक्के पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून केलेल्या खरिपाच्या पेरण्या वाया गेल्यानंतर आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे उर्वरित महिनाभराच्या पावसाच्या कालावधीत मोठे पाऊस होऊन बंधारे, तलाव भरले जावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.बारागावपिंप्री परिसरात सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात टॅँकरद्वारे दिवसाआड प्लॅस्टिकचा दोनशे लिटरचा फक्त एक ड्रम भरून पाणी मिळते. पिण्याच्या पाण्याबरोबर रोजच्या वापरासाठीच्या पाण्याचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न पडतो. टॅँकरच्या फेऱ्या वाढवून देण्याची गरज आहे.- प्रमोद वानरे, ग्रामस्थ, बारागावपिंप्रीनायगाव : सिन्नर तालुक्यातील निमगाव-सिन्नर, केपानगर, बारागावपिंंप्री व सुळेवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. टॅँकरच्या फेऱ्या सुरळीत करण्याची मागणी निमगावचे सरपंच बाळासाहेब सानप यांनी केली आहे.

पूर्व भागात गेल्या सुमारे पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती आहे. यंदाही वरुणराजाने पाठ फिरविल्याने शेतीसह ग्रामस्थांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याचीही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परिसरातील नाले व विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. परिणामी ग्रामस्थांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.