शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

केशरी कार्डधारकांनाही मिळणार अन्नसुरक्षेचा लाभ

By admin | Updated: November 15, 2016 02:21 IST

शासनाचा निर्णय : २५ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी निश्चित

नाशिक : अन्नसुरक्षेचा लाभ देताना भेदभाव झाल्याचा सार्वत्रिक होणारा आरोप पाहता केंद्र सरकारने अत्यल्प उत्पन्न गट असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाही अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असून, अंत्योदय योजनेची व्याप्तीही वाढविण्यात आली आहे. येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी निश्चित करून डिसेंबरपासून प्रत्यक्ष स्वस्त दरात धान्याचे वाटप केले जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाने नाशिक शहरातील एक लाख २१ हजार नागरिकांना नव्याने अन्नसुरक्षा योजनेत सामावून घेतले जाणार असून, अंत्योदय योजनेतही सुमारे दोन हजार नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. केंद्रातील आघाडी सरकारच्या काळात अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती, त्यात ग्रामीण भागातील ४६ टक्के तर शहरी भागातील २८ टक्के जनतेचा अधिकाधिक समावेश करण्यात आला. मात्र यातील लाभार्थी ठरविताना वार्षिक उत्पन्न जरी विचारात घेतले गेले असले तरी, त्यात मोठ्या प्रमाणावर भेदभाव झाला होता. एकाच ठिकाणी व सारखेच उत्पन्न असतानाही एकाला या योजनेचा लाभ मिळाला व दुसऱ्याला डावलण्यात आल्याने यासंदर्भात नेहमीच तक्रारी केल्या जात होत्या. राजकीय पक्ष, झोपडपट्टीवासीयांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. या सर्व गोष्टींची दखल घेत शासनाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देणाऱ्यांच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. त्यासाठी वार्षिक उत्पन्न ५९ हजाराच्या आत असलेल्या कुटुंबीयांना त्यात सामावून घेण्यात येणार असून, अंत्योदय योजनेतही अधिक कुटुंबाना संधी मिळणार आहे. सध्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्यात सहभागी करून घेतले जाईल. शासनाने यासाठी मुदत निश्चित केली असून, २५ नोव्हेंबरपर्यंत लाभेच्छुक निश्चित केले जातील. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून याद्या मागविण्यात आल्या आहेत. त्या याद्या तपासून नंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील व अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी शहरातील रेशन दुकानदारांची शनिवारी धान्य वितरण अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन लाभेच्छुकांच्या याद्या सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)