शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

केशरी कार्डधारकांनाही मिळणार अन्नसुरक्षेचा लाभ

By admin | Updated: November 15, 2016 02:21 IST

शासनाचा निर्णय : २५ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी निश्चित

नाशिक : अन्नसुरक्षेचा लाभ देताना भेदभाव झाल्याचा सार्वत्रिक होणारा आरोप पाहता केंद्र सरकारने अत्यल्प उत्पन्न गट असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाही अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असून, अंत्योदय योजनेची व्याप्तीही वाढविण्यात आली आहे. येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी निश्चित करून डिसेंबरपासून प्रत्यक्ष स्वस्त दरात धान्याचे वाटप केले जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाने नाशिक शहरातील एक लाख २१ हजार नागरिकांना नव्याने अन्नसुरक्षा योजनेत सामावून घेतले जाणार असून, अंत्योदय योजनेतही सुमारे दोन हजार नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. केंद्रातील आघाडी सरकारच्या काळात अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती, त्यात ग्रामीण भागातील ४६ टक्के तर शहरी भागातील २८ टक्के जनतेचा अधिकाधिक समावेश करण्यात आला. मात्र यातील लाभार्थी ठरविताना वार्षिक उत्पन्न जरी विचारात घेतले गेले असले तरी, त्यात मोठ्या प्रमाणावर भेदभाव झाला होता. एकाच ठिकाणी व सारखेच उत्पन्न असतानाही एकाला या योजनेचा लाभ मिळाला व दुसऱ्याला डावलण्यात आल्याने यासंदर्भात नेहमीच तक्रारी केल्या जात होत्या. राजकीय पक्ष, झोपडपट्टीवासीयांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. या सर्व गोष्टींची दखल घेत शासनाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देणाऱ्यांच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. त्यासाठी वार्षिक उत्पन्न ५९ हजाराच्या आत असलेल्या कुटुंबीयांना त्यात सामावून घेण्यात येणार असून, अंत्योदय योजनेतही अधिक कुटुंबाना संधी मिळणार आहे. सध्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्यात सहभागी करून घेतले जाईल. शासनाने यासाठी मुदत निश्चित केली असून, २५ नोव्हेंबरपर्यंत लाभेच्छुक निश्चित केले जातील. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून याद्या मागविण्यात आल्या आहेत. त्या याद्या तपासून नंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील व अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी शहरातील रेशन दुकानदारांची शनिवारी धान्य वितरण अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन लाभेच्छुकांच्या याद्या सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)