शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

कारली, वांगी, ढोबळी ५० रुपये किलो; सर्वसामान्य ग्राहकांना बसतोय फटका

By संदीप भालेराव | Updated: July 24, 2023 14:57 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई व मुंबई उपनगरात फळभाज्या माल रवाना केला जातो.

नाशिक : बाजार समितीत टोमॅटो, वांगी, कारली, ढोबळी मिरची तसेच भोपळा यासह इतर फळभाज्या विक्रीला दाखल होत असल्या तरी त्या खरेदीसाठी मात्र ग्राहकांना हात गाडीवर दाम दुप्पट पैसे मोजावे लागत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना फळभाज्या खरेदीसाठी खिशाचा विचार करावा लागत आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती विक्रीसाठी येणाऱ्या टोमॅटो मालाचे दर शंभर रुपये किलोपर्यंत असून आता कारले, वांगी, ढोबळी मिरची तसेच काकडी मालाला प्रति किलो ५० रुपयेपर्यंत बाजारभाव मिळत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई व मुंबई उपनगरात फळभाज्या माल रवाना केला जातो. महागलेला सर्वच फळभाज्या माल नाशिकहून मुंबईला पाठविला तरी त्या मालाचे पैसे होतील याची हमी नसल्याने बाजार समितील काही व्यापाऱ्यांनी कमी प्रमाणात माल खरेदी करणे सुरू केले असल्याचे व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या वांगी ४५० रुपये प्रति (१५ किलो जाळी), भोपळा (१८ नग) ६०० रुपये, कारले (१५ किलो जाळी) ४५० रुपये तर ढोबळी मिरची (१२ किलो) ८०० रुपये दर मिळत आहे. टोमॅटो दर टिकून असून बाजार समितीत टोमॅटोच्या २० किलो प्रति जाळीला १,८०० ते २,००० रुपये बाजारभाव टिकून आहे. सर्वसामान्य ग्राहकांना रस्त्यावर हातगाडीवर भाजीपाला घेण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागतात. हातगाडीवर कोणत्याही फळभाज्या खरेदीसाठी ग्राहकांना पावशेर भाजीसाठी किमान २० रुपये मोजावे लागतात.