शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

फुटपाथवर कार, खड्ड्यात गेल्या मोटारसायकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:34 IST

शहरातील सर्वात मध्यवर्ती मार्ग स्मार्ट करण्यासाठी सुरू असलेले काम सुरूच आहे. एका भागातील काम पूर्ण झाले आणि दुसऱ्या बाजूने खोदकाम सुरू असल्याने एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असली तरी हा रस्ता म्हणजे शिक्षा ठरला आहे.

आॅन दी  स्पॉट

नाशिक : शहरातील सर्वात मध्यवर्ती मार्ग स्मार्ट करण्यासाठी सुरू असलेले काम सुरूच आहे. एका भागातील काम पूर्ण झाले आणि दुसऱ्या बाजूने खोदकाम सुरू असल्याने एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असली तरी हा रस्ता म्हणजे शिक्षा ठरला आहे. मुळातच अरुंद रस्ता त्यातच फुटपाथ आणि त्यावर कार असा विचित्र प्रकार असून, सायकल ट्रॅकचा मोटारसायकल ट्रॅक झाला आहे. त्यामुळे हा स्मार्ट रस्ता नेमका कधी पूर्ण होणार आणि नागरिकांचा छळ कधी थांबणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.गावठाण भागाला जोडणारा महत्त्वाचा रहदारीचा रस्ता म्हणून नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या रस्त्याची निवड केली. हा पथदर्शी प्रकल्प असून, अवघा १.१ किलोमीटरचा रस्ता निवडण्यात आला आहे. परंतु हा एक किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या ठेकेदाराला वर्षभराचा कालावधी लागला असून, अजूनही केवळ अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा रस्ताच भागश: खुला केला आहे. त्यावर इतकी प्रचंड वर्दळ वाढली आहे की, जीव मुठीत धरूच चालावे लागते. मुळातच या मार्गावर तीन प्रमुख शाळा आहेत. त्या मेहेर ते त्र्यंबक नाका परिसरात आहेत. त्यांना गेल्या वर्षभरापासून खड्ड्यातून प्रवास करावा लागला. पावसाळ्यात तर प्रचंड हाल झाले. आता हा रस्ता सुरू झाला असला तरी समोरील बाजूचा रस्ता खोदून एकतर्फी वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याने शाळेतील मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.आधी रस्ता, मग सायकल ट्रॅक तसेच पादचारी मार्ग त्यावर स्मार्ट बस थांबे असे अनेक प्रकारचे स्वप्न दाखवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अरुंद रस्ता आणि त्यावर मोटारींचे, मोटारसायकलींचे अतिक्रमण आहे. मुलांना पादचारी मार्गावरून जाणेही कठीण झाले आहे. त्यातच एखादी बस या मार्गावरून आली की पूर्ण रस्ताच बंद होऊन जातो. या भागात शासकीय कामासाठी येणाºया नागरिकांना तर खड्ड्यातूनच न्यायालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जावे-यावे लागत आहे. कोणी स्थानिक नागरिकाने दुचाकी आणली की सीबीएसजवळील खड्ड्यात ती उभी करून मगच चालावे लागते.स्मार्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यामुळे वाढणारा वेग मात्र महापालिकेच्या या स्मार्ट रोडचा अर्थाअर्थी स्मार्ट या शब्दाशी संबंध नसून सरधोपट रस्त्यासाठी नागरिकांचा छळ करावा लागत आहे. हा रस्ता कधी पूर्ण करणार हे महापालिका किंवा स्मार्ट कंपनी अद्याप जाहीर करण्यास तयार नसल्याने नागरिकांचे हाल कधी संपणार हे मात्र स्पष्ट होत नाही.सायकल नव्हे मोटारसायकल ट्रॅककंपनीने मुख्य रस्त्याच्या कडेला सायकल ट्रॅकची आखणी केली आहे. त्यातून सायकली तर जात नाही, परंतु बहुतांशी ठिकाणी मोटारसायकली उभ्या करण्यासाठी वापर होतो. विशेषत: अशोकस्तंभ ते मेहेर परिसरात दुकाने आणि कार्यालयांत जाण्यासाठी कंपनीने वाहनतळांची कोणतीही सोय केली नसून त्यामुळे रस्त्यावरच दुचाकी उभ्या कराव्या लागणार आहेत.अशोकस्तंभावर गोंधळअशोकस्तंभावरील वाहतूक बेट हटविण्यात आले असून, आता गंगापूररोड, मेहेरकडून जाणाºया वाहतुकीची तर घारपुरे घाटाकडून येणाºया वाहनांची गर्दी असते. वकीलवाडीकडून येणाºया वाहनांना हॉटेल मराठा दरबारकडून येण्यासाठी किंवा वकीलवाडीत जाण्यासाठी असलेला मार्ग बंद केला आहे. त्यामुळे बहुतांशी वाहनचालक हे मल्हारखाण येथून रविवार पेठेतून राँगसाईडने अशोकस्तंभाकडे येत असल्याने तेथे गोंधळ उडतो.जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्धारावर कोंडीजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून नागरिक, कर्मचारी मेहेरकडे दुभाजकाकडून जाऊ-येऊ शकतात. या पंक्चरच्या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. विशेषत: सकाळ-सायंकाळ मोटारी रस्ता ओलांडत असताना मेहेरकडील बाजूदेखील ठप्प होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी