शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

कळवणला किसान सभेचा विजयी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:39 IST

तालुक्यातील धरणात असलेल्या पाण्याचा हक्क तालुक्यासाठी नगण्य राहिल्याने नार-पार-दमणगंगा -पिंजाळ या पश्चिमवाहिन्या नद्यांचे पाणी अडवून गिरणा व गोदावरी खोऱ्यात वळवून एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ न देता संपूर्ण पाणी कळवण व उर्वरित पाणी इतर तालुक्यांना दिले जाईल. तसेच शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव व जुने कर्ज असलेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत शासनाशी आपला लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन आमदार जे. पी. गावित यांनी केले.

कळवण : तालुक्यातील धरणात असलेल्या पाण्याचा हक्क तालुक्यासाठी नगण्य राहिल्याने नार-पार-दमणगंगा -पिंजाळ या पश्चिमवाहिन्या नद्यांचे पाणी अडवून गिरणा व गोदावरी खोऱ्यात वळवून एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ न देता संपूर्ण पाणी कळवण व उर्वरित पाणी इतर तालुक्यांना दिले जाईल. तसेच शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव व जुने कर्ज असलेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत शासनाशी आपला लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन आमदार जे. पी. गावित यांनी केले.  कळवण येथील कै. का. ज. पाटील चौकात महाराष्ट्र किसान सभा व कळवण तालुक्याच्या वतीने विजयी मिरवणूक व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते शांताराम जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून शेकापचे आमदार भाई जयंत पाटील, सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सीटू संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, सुरगाणा पंचायत समितीचे इंद्रजित गावित, काँग्रेसचे शैलेश पवार, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सावळीराम पवार, तालुका सेक्रेटरी हेमंत पाटील आदी उपस्थित होते.  यावेळी आमदार गावित यांनी, संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळाने योजनेसाठी लागणारे वयाचे दाखले प्राथमिक आरोग्य केंद्रातील एमबीबीएस वैद्यकीय अधिकाºयांना अधिकार देण्याचे शासनाने मान्य केले आहे. याबरोबरच मुंबई येथे मंजूर झालेल्या मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली.आमदार भाई जयंत पाटील म्हणाले, नाशिक ते मुंबई पायी लॉग मार्च काढून यशस्वी करणे खरोखरच अशक्य बाब होती. या ऐतिहासिक मोर्चात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याने मी धन्य झालो. आगामी काळातही मला केव्हाही हाक मारा मी तुमच्या मदतीसाठी तयार राहील, असे आश्वासन पाटील यांनी दिले. हेमंत पाटील यांनी प्रस्तावित केले़ दरम्यान सोमवारी दुपारी १ वाजता मानूर येथील पोस्ट बेसिक आश्रमशाळेपासून विजयी मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत पावरी, डफ, ढोल-ताशांच्या गजरात थिरकत आदिवासी शेतकरीबांधवांनी आनंद साजरा केला.मिरवणूक व्यापारी पेठेतून सभास्थानी दुपारी २ वाजता पोहचले. मिरवणुक दरम्यान एक रु ग्णवाहिका नाशिकच्या दिशेने जात असताना नागरिकांनी रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करून दिली. विजयी सभा जवळपास सहा तास सुरु होती. सभेठिकाणी बसण्यास जागा कमी पडल्याने शेतकºयांनी कळवणच्या मेनरोडवर रणरणत्या उन्हात ठिय्या मांडून सभा ऐकली. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च