शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला किसान सभेचा विजयी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:39 IST

तालुक्यातील धरणात असलेल्या पाण्याचा हक्क तालुक्यासाठी नगण्य राहिल्याने नार-पार-दमणगंगा -पिंजाळ या पश्चिमवाहिन्या नद्यांचे पाणी अडवून गिरणा व गोदावरी खोऱ्यात वळवून एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ न देता संपूर्ण पाणी कळवण व उर्वरित पाणी इतर तालुक्यांना दिले जाईल. तसेच शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव व जुने कर्ज असलेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत शासनाशी आपला लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन आमदार जे. पी. गावित यांनी केले.

कळवण : तालुक्यातील धरणात असलेल्या पाण्याचा हक्क तालुक्यासाठी नगण्य राहिल्याने नार-पार-दमणगंगा -पिंजाळ या पश्चिमवाहिन्या नद्यांचे पाणी अडवून गिरणा व गोदावरी खोऱ्यात वळवून एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ न देता संपूर्ण पाणी कळवण व उर्वरित पाणी इतर तालुक्यांना दिले जाईल. तसेच शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव व जुने कर्ज असलेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत शासनाशी आपला लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन आमदार जे. पी. गावित यांनी केले.  कळवण येथील कै. का. ज. पाटील चौकात महाराष्ट्र किसान सभा व कळवण तालुक्याच्या वतीने विजयी मिरवणूक व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते शांताराम जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून शेकापचे आमदार भाई जयंत पाटील, सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सीटू संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, सुरगाणा पंचायत समितीचे इंद्रजित गावित, काँग्रेसचे शैलेश पवार, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सावळीराम पवार, तालुका सेक्रेटरी हेमंत पाटील आदी उपस्थित होते.  यावेळी आमदार गावित यांनी, संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळाने योजनेसाठी लागणारे वयाचे दाखले प्राथमिक आरोग्य केंद्रातील एमबीबीएस वैद्यकीय अधिकाºयांना अधिकार देण्याचे शासनाने मान्य केले आहे. याबरोबरच मुंबई येथे मंजूर झालेल्या मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली.आमदार भाई जयंत पाटील म्हणाले, नाशिक ते मुंबई पायी लॉग मार्च काढून यशस्वी करणे खरोखरच अशक्य बाब होती. या ऐतिहासिक मोर्चात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याने मी धन्य झालो. आगामी काळातही मला केव्हाही हाक मारा मी तुमच्या मदतीसाठी तयार राहील, असे आश्वासन पाटील यांनी दिले. हेमंत पाटील यांनी प्रस्तावित केले़ दरम्यान सोमवारी दुपारी १ वाजता मानूर येथील पोस्ट बेसिक आश्रमशाळेपासून विजयी मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत पावरी, डफ, ढोल-ताशांच्या गजरात थिरकत आदिवासी शेतकरीबांधवांनी आनंद साजरा केला.मिरवणूक व्यापारी पेठेतून सभास्थानी दुपारी २ वाजता पोहचले. मिरवणुक दरम्यान एक रु ग्णवाहिका नाशिकच्या दिशेने जात असताना नागरिकांनी रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करून दिली. विजयी सभा जवळपास सहा तास सुरु होती. सभेठिकाणी बसण्यास जागा कमी पडल्याने शेतकºयांनी कळवणच्या मेनरोडवर रणरणत्या उन्हात ठिय्या मांडून सभा ऐकली. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च