शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कांदा निर्यातबंदीवर मंत्रिमंडळात होणार चर्चा - भुजबळ यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:04 IST

नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असून, ही निर्यातबंदी उठवावी यासाठी आपण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे तसेच बुधवारी होणाºया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतदेखील हा विषय मांडून राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने कुठलीही पूर्वसूचना न देता निर्यातबंदी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असून, ही निर्यातबंदी उठवावी यासाठी आपण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे तसेच बुधवारी होणाºया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतदेखील हा विषय मांडून राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.भुजबळ पुढे म्हणाले, कांद्याला अलीकडेच चांगला दर मिळू लागला असताना केंद्र सरकारने कुठलीही पूर्वसूचना न देता निर्यातबंदी लावली. काल रात्री याबाबत शरद पवार यांच्या कानी ही बाब घातली. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सर्वदूर पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचा चाळीतील कांदा भिजून मोठे नुकसान झाले आहे. जो कांदा बचावला त्याला बºयापैकी दर मिळू लागला होता. कोरोनामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक अडचणीत सापडला असताना त्याला कांदा विक्रीतून मोठी आशा होती; परंतु केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता निर्यातबंदी घातली. आता देशांतर्गत कांद्याचे दर कोसळतील व त्याचा फटका शेतकºयांना बसणार आहे. यासंदर्भात पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या कानी ही बाब घातली, परंतु निर्यातबंदीचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी घेतल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात शेतीसाठी मुक्त धोरण जाहीर केले असताना अचानक कांदा निर्यातबंदी लागू करण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. राज्य सरकार केंद्राकडे निर्यातबंदी शिथिल करण्याची मागणी करेन. केंद्राने बंदी मागे घ्यावी किंवा सध्याचे दर पाहता शेतकºयांना तीन हजार रुपये इतके अनुदान द्यावे. महाराष्ट्रात ७५ टक्के कांदा उत्पादक आहे व नाशिक जिल्ह्यातील ८० टक्के कांदा निर्यात होतो हे सरकारने लक्षात घ्यावे.- दादा भुसे, कृषिमंत्री येत्या दोन दिवसात शरदपवार संबंधित मंत्र्यांची भेट घेतील; परंतु निर्यातबंदी उठवावी यासाठी राज्य सरकारदेखील केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेल, त्यासाठी बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपण हा विषय मांडणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.खासदारांचे केंद्राला साकडेकेंद्र सरकारने ही निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी खासदार डॉ.भारती पवार व खा. डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.दिल्लीत दोघा खासदारांनी गोयल यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात बहुसंख्य शेतकरी कांदा उत्पादक असून, येथील शेतकºयांची त्यावर अवलंबून असलेल्या व्यापारी वर्गाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कांद्यावर अवलंबून आहे.सध्या भरपूर प्रमाणावर कांदा शेतकºयांकडे पडून आहे. व्यापारी वर्गाने खरेदी केलेला कांदा हा निर्यातीसाठी सीमेवर अडकून पडला आहे. त्यासाठी सीमा खुली करावी. कांद्याच्या किमती खूप वाढल्या नसून अजूनही सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात असल्याने तातडीने निर्यातबंदी उठवणे गरजेचे आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांसोबत बैठकआधीच लॉकडाऊनच्या संकटकाळातून शेतकरीवर्ग, व्यापारीवर्ग, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असताना ही अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल व त्यांचे मोठे नुकसान होईल. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कांद्यावरची निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी लवकरच या संदर्भात वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन विचार-विनिमय करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारonionकांदा