शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा दुप्पट कांदा खरेदी करणार- नानासाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 13:23 IST

लासलगाव (शेखर देसाई) : नाफेडकडून लासलगावी नुकत्याच सुरू झालेल्या कांदा खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद आणि भाववाढीवर होणारा परिणाम याबाबत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्याशी साधलेला थेट संवाद.

लासलगाव (शेखर देसाई) : नाफेडकडून लासलगावी नुकत्याच सुरू झालेल्या कांदा खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद आणि भाववाढीवर होणारा परिणाम याबाबत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्याशी साधलेला थेट संवाद.नाफेडने सुरू केलेल्या केंद्रामुळे शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार?लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत नाफेडने खरेदीविक्री संघामार्फत दि.१५ एप्रिलला कांदा खरेदी सुरू केली. दि. १६ एप्रिलला येथील बाजारपेठेत कांद्याला १०५१ रूपये भाव मिळाला होता. कांद्याला दि. १८ एप्रिल रोजी ११०१ रूपये भाव झाला. एकाच दिवसात २४५९६ क्विंटलची आवक झाली. त्यामुळे १ लाख २३ हजार रूपये कांदा उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ झालीे.बाजारभावात कायसुधारणा अपेक्षित आहे?भावासाठी भरीव तरतूद केल्याने निदान कांद्याचे बाजारभाव तरी सुधारतील. कांदा उत्पादकांना ही बाब दिलासा देणारी आहे. मागील वर्षी कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गाला मिळणाºया दरातून उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाले होते. केद्र सरकारच्या किंमत स्थिराकरण कोषातून यावर्षीही कांदा खरेदीबाबत केंद्र सरकारच्या सकारात्मक निर्णयामुळे कांदा घसरणीला ब्रेक लागणार आहे.यावर्षी किती कांदा खरेदीकरणार, काही उद्दिष्ठ?गेल्या तीन वर्षांपासून शासन कांदा खरेदी करीत आहे. तर यावर्षी नाफेड मागील वर्षाच्या दुप्पट कांदा खरेदी करणार आहे. कांदा खरेदी प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे. मागील वर्षी नाफेडच्या कांदा खरेदीनंतर भावात तीस टक्के वाढ झाली होती.महाराष्ट्रातून ४५ हजार मेट्रिक टन तर गुजरातमधून पाच हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याने उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. कांदा साठवण्यासाठी गुदामे घेण्याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळाशी करारप्रक्रि या पूर्ण करण्यात आली आहे.उत्पादनात घट होण्याचा अंदाजगेल्या वर्षीप्रमाणेच २०१३-१४ ते २०१७-१८ या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा देशात कांद्याचे उत्पादन अधिक होण्याचा केंद्रीय कृषी मंत्रालयाचा अंदाज आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे आगर असलेल्या महाराष्ट्र, गुजरातसह झारखंड, जम्मू-काश्मीर, मिझोराम, त्रिपुरा, केरळमध्ये कांद्याचे उत्पादन व राज्याच्या उत्पादनातील हिश्श्यात अंदाजात घट दर्शविण्यात आली आहे. महाराष्ट्रात २०१७-१८ मध्ये ८८ लाख ५४ हजार टन कांद्याचे उत्पादन झाले होते. पहिल्या अंदाजानुसार यंदा ८४ लाख ७४ हजार टनाचे उत्पादन अपेक्षित असून, उत्पादनातील हिस्सा आठ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.देशात कांद्याची समस्या निर्माण होऊ नये वा खूप भाव वाढल्यास स्वस्त दरात कांदा मिळावा यासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून ही खरेदी करण्यात येते. नाफेड यावर्षी सर्वात मोठी खरेदी करणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक