शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

यंदा दुप्पट कांदा खरेदी करणार- नानासाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 13:23 IST

लासलगाव (शेखर देसाई) : नाफेडकडून लासलगावी नुकत्याच सुरू झालेल्या कांदा खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद आणि भाववाढीवर होणारा परिणाम याबाबत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्याशी साधलेला थेट संवाद.

लासलगाव (शेखर देसाई) : नाफेडकडून लासलगावी नुकत्याच सुरू झालेल्या कांदा खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद आणि भाववाढीवर होणारा परिणाम याबाबत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्याशी साधलेला थेट संवाद.नाफेडने सुरू केलेल्या केंद्रामुळे शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार?लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत नाफेडने खरेदीविक्री संघामार्फत दि.१५ एप्रिलला कांदा खरेदी सुरू केली. दि. १६ एप्रिलला येथील बाजारपेठेत कांद्याला १०५१ रूपये भाव मिळाला होता. कांद्याला दि. १८ एप्रिल रोजी ११०१ रूपये भाव झाला. एकाच दिवसात २४५९६ क्विंटलची आवक झाली. त्यामुळे १ लाख २३ हजार रूपये कांदा उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ झालीे.बाजारभावात कायसुधारणा अपेक्षित आहे?भावासाठी भरीव तरतूद केल्याने निदान कांद्याचे बाजारभाव तरी सुधारतील. कांदा उत्पादकांना ही बाब दिलासा देणारी आहे. मागील वर्षी कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गाला मिळणाºया दरातून उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाले होते. केद्र सरकारच्या किंमत स्थिराकरण कोषातून यावर्षीही कांदा खरेदीबाबत केंद्र सरकारच्या सकारात्मक निर्णयामुळे कांदा घसरणीला ब्रेक लागणार आहे.यावर्षी किती कांदा खरेदीकरणार, काही उद्दिष्ठ?गेल्या तीन वर्षांपासून शासन कांदा खरेदी करीत आहे. तर यावर्षी नाफेड मागील वर्षाच्या दुप्पट कांदा खरेदी करणार आहे. कांदा खरेदी प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे. मागील वर्षी नाफेडच्या कांदा खरेदीनंतर भावात तीस टक्के वाढ झाली होती.महाराष्ट्रातून ४५ हजार मेट्रिक टन तर गुजरातमधून पाच हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याने उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. कांदा साठवण्यासाठी गुदामे घेण्याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळाशी करारप्रक्रि या पूर्ण करण्यात आली आहे.उत्पादनात घट होण्याचा अंदाजगेल्या वर्षीप्रमाणेच २०१३-१४ ते २०१७-१८ या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा देशात कांद्याचे उत्पादन अधिक होण्याचा केंद्रीय कृषी मंत्रालयाचा अंदाज आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे आगर असलेल्या महाराष्ट्र, गुजरातसह झारखंड, जम्मू-काश्मीर, मिझोराम, त्रिपुरा, केरळमध्ये कांद्याचे उत्पादन व राज्याच्या उत्पादनातील हिश्श्यात अंदाजात घट दर्शविण्यात आली आहे. महाराष्ट्रात २०१७-१८ मध्ये ८८ लाख ५४ हजार टन कांद्याचे उत्पादन झाले होते. पहिल्या अंदाजानुसार यंदा ८४ लाख ७४ हजार टनाचे उत्पादन अपेक्षित असून, उत्पादनातील हिस्सा आठ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.देशात कांद्याची समस्या निर्माण होऊ नये वा खूप भाव वाढल्यास स्वस्त दरात कांदा मिळावा यासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून ही खरेदी करण्यात येते. नाफेड यावर्षी सर्वात मोठी खरेदी करणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक