शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

लग्नसोहळ्यांवरील सरसकट बंदीला व्यावसायिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:16 IST

सायखेडा : लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. कोरोनामुळे या सोहळ्यांच्या आनंदावर विरजण पडले. अनेकजणांचे रोजगार हिरावून घेतले. आता कुठे पुन्हा एकदा घडी बसत असताना लग्नसोहळ्यांवर निर्बंध आणले जात आहेत. लग्नसोहळ्यांवर सरसकट बंदी न आणता कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत ते सुरू ठेवण्याची मागणी लग्नसोहळ्यांसंबंधी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा वाढता संसर्ग : नियम पाळण्याची दिली ग्वाही

सायखेडा : लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. कोरोनामुळे या सोहळ्यांच्या आनंदावर विरजण पडले. अनेकजणांचे रोजगार हिरावून घेतले. आता कुठे पुन्हा एकदा घडी बसत असताना लग्नसोहळ्यांवर निर्बंध आणले जात आहेत. लग्नसोहळ्यांवर सरसकट बंदी न आणता कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत ते सुरू ठेवण्याची मागणी लग्नसोहळ्यांसंबंधी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी केली आहे.लग्न सोहळा हा जीवनातील महत्त्वाचा संस्कार आहे. या संस्कारात माणूस कोणतीही तडजोड करीत नाही. आयुष्यात लग्न एकदाच होते, त्यामुळे ते धुमधडाक्यात व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.अलीकडे लग्न हे घरासमोर न करता लॉन्स किंवा मंगल कार्यालयात पार पाडले जातात. त्याठिकाणी सर्व सोयी एकाच ठिकाणी मिळतात. लॉन्स, वाद्य, भोजन सुविधा, मिरवणुकीसाठी आवश्यक असणारा घोडा, मंत्रघोष करणारा पुजारी, हार गुच्छ, छायाचित्रकार, आर्केस्ट्रा हे सर्व एकाच छताखाली मिळत असल्यामुळे मंगल कार्यालय अथवा लॉन्सला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.एका लग्नावर जवळपास दहा व्यवसाय अवलंबून असतात. शिवाय लॉन्स-कार्यालय मालकाला विविध प्रकारचे सरकारी कर भरावे लागतात. ग्रामपंचायत लॉन्स चालू आहे किंवा बंद हे न पहाता वार्षिक व्यावसायिक कराची आकारणी करते. आता पुन्हा कोरोना संकट आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा गर्दी टाळण्यासाठी लग्न अवघ्या पन्नास माणसांच्या उपस्थितीत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.शासन आदेशानुसार सामाजिक अंतर आणि आणि मास्क लावून नियमांचे पालन करीत लग्न सोहळे सुरू ठेवावेत अशी मागणी व्यावसायिकांकडून होऊ लागली आहे.एका लॉन्सवर किमान ५० बेरोजगार तरुण आणि २० व्यावसायिक अवलंबून असतात. त्यांचे कुटुंब यावर अवलंबून असते. कोरोना जरी वाढत असला तरी सामाजिक अंतर आणि इतर नियमांचे पालन करणाऱ्या लॉन्सला शासनाने परवानगी द्यावी. छोट्या व्यावसायिकावर उपासमारीची वेळ येणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा त्यावर अवलंबून असणारे जवळपास ४० व्यवसाय बंद पडतील.- शांताराम शिंदे, लॉन्सचालक

टॅग्स :Governmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या