शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

बसेस रिकाम्या; वाहनतळ सुनेसुने

By admin | Updated: August 29, 2015 22:51 IST

नियोजन कोलमडले : एस.टी.ने फोडले पोलिसांवर खापर

नाशिक : सिंहस्थात येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीसाठी तीन हजार बसेस सज्ज ठेवण्यात आल्या असल्या तरी केवळ पोलिसांच्या नाकाबंदीमुळेच शहरात बसेस सुरू ठेवणे महामंडळाला शक्य झाले नसल्याचा आरोप महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या नियोजनामुळे महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण झालेच शिवाय प्रवाशांची गैरसोय झाली ती वेगळीच, असे आता महामंडळाकडूनच बोलले जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात उत्पन्नाची पर्वणी साधण्याचे नियोजन राज्य परिवहन महामंडळाने केले होते. त्यासाठी राज्यातील विविध डेपोंमधील सुमारे १२००, तर राज्यातील इतर भागांतून सुमारे १८०० बसेस मागविण्यात आल्या होत्या. अंतर्गत वाहनतळापासून शहरात आणि वाहनतळापासून बाहेरची वाहतूक करण्याचे नियोजन महामंडळाने केले होते. सिंहस्थ काळात महामंडळाला सुमारे ५०० ते ७०० कोटींचे उत्पन्न मिळेल, असे नियोजन करण्यात आल्याचेदेखील महामंडळाने जाहीर केले होते; परंतु प्रत्यक्षात पहिल्या शाहीस्नानाप्रसंगी शहरात कुठेही परिवहन महामंडळाची बस दिसली नाही. सर्व बसेस या अंतर्गत वाहनतळ आणि त्र्यंबकेश्वर येथे बसेस रवाना करण्यात आल्या. ठक्कर आणि मेळा बसस्थानकावर निर्मनुष्य झाले होते. शहरात कुठेही बस दिसत नसल्याने राज्यभरातून आलेल्या भाविकांची गैरसोय झाली. नाशिकरोड रेल्वेस्थानकनजीकच असलेल्या बसस्थानकात भाविकांची प्रचंड गर्दी होती. परंतु त्र्यंबक तसेच पंचवटीत जाण्यासाठी एकही बस नसल्याने त्यांना पायपीट करावी लागली, तर काहींना रिक्षाचालकांनी अवाच्या सवा भाडे आकारून लुटले. विशेष म्हणजे महामंडळाने त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी आणि परतीसाठी महामंडळाने शंभर रुपयांच्या विशेष पासची व्यवस्था केली होती; परंतु प्रत्यक्षात शाहीस्नानाच्या दिवशी भाविकांना शहरात बसची वाट पाहावी लागली. भाविकांना बसच उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना त्र्यंबकेश्वर गाठणे कठीण झाले. ज्यांना बाह्य वाहनतळे माहीत होते त्यांनी कसेबसे वाहनतळ गाठले. मात्र शहरात परिवहन महामंडळाकडून प्रवाशांची निराशा झाली. त्यामुळे महामंडळाच्या बसेस कमी प्रवासी घेऊनच धावत होत्या. (प्रतिनिधी)