शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

बसेस रिकाम्या; वाहनतळ सुनेसुने

By admin | Updated: August 29, 2015 22:51 IST

नियोजन कोलमडले : एस.टी.ने फोडले पोलिसांवर खापर

नाशिक : सिंहस्थात येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीसाठी तीन हजार बसेस सज्ज ठेवण्यात आल्या असल्या तरी केवळ पोलिसांच्या नाकाबंदीमुळेच शहरात बसेस सुरू ठेवणे महामंडळाला शक्य झाले नसल्याचा आरोप महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या नियोजनामुळे महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण झालेच शिवाय प्रवाशांची गैरसोय झाली ती वेगळीच, असे आता महामंडळाकडूनच बोलले जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात उत्पन्नाची पर्वणी साधण्याचे नियोजन राज्य परिवहन महामंडळाने केले होते. त्यासाठी राज्यातील विविध डेपोंमधील सुमारे १२००, तर राज्यातील इतर भागांतून सुमारे १८०० बसेस मागविण्यात आल्या होत्या. अंतर्गत वाहनतळापासून शहरात आणि वाहनतळापासून बाहेरची वाहतूक करण्याचे नियोजन महामंडळाने केले होते. सिंहस्थ काळात महामंडळाला सुमारे ५०० ते ७०० कोटींचे उत्पन्न मिळेल, असे नियोजन करण्यात आल्याचेदेखील महामंडळाने जाहीर केले होते; परंतु प्रत्यक्षात पहिल्या शाहीस्नानाप्रसंगी शहरात कुठेही परिवहन महामंडळाची बस दिसली नाही. सर्व बसेस या अंतर्गत वाहनतळ आणि त्र्यंबकेश्वर येथे बसेस रवाना करण्यात आल्या. ठक्कर आणि मेळा बसस्थानकावर निर्मनुष्य झाले होते. शहरात कुठेही बस दिसत नसल्याने राज्यभरातून आलेल्या भाविकांची गैरसोय झाली. नाशिकरोड रेल्वेस्थानकनजीकच असलेल्या बसस्थानकात भाविकांची प्रचंड गर्दी होती. परंतु त्र्यंबक तसेच पंचवटीत जाण्यासाठी एकही बस नसल्याने त्यांना पायपीट करावी लागली, तर काहींना रिक्षाचालकांनी अवाच्या सवा भाडे आकारून लुटले. विशेष म्हणजे महामंडळाने त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी आणि परतीसाठी महामंडळाने शंभर रुपयांच्या विशेष पासची व्यवस्था केली होती; परंतु प्रत्यक्षात शाहीस्नानाच्या दिवशी भाविकांना शहरात बसची वाट पाहावी लागली. भाविकांना बसच उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना त्र्यंबकेश्वर गाठणे कठीण झाले. ज्यांना बाह्य वाहनतळे माहीत होते त्यांनी कसेबसे वाहनतळ गाठले. मात्र शहरात परिवहन महामंडळाकडून प्रवाशांची निराशा झाली. त्यामुळे महामंडळाच्या बसेस कमी प्रवासी घेऊनच धावत होत्या. (प्रतिनिधी)