शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर  शहरात बससेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:32 IST

देशभर रोज वाढत चाललेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१०) सकाळपासून शहर बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

नाशिक : देशभर रोज वाढत चाललेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१०) सकाळपासून शहर बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.  सकाळपासून दुपारी साडेचारपर्यंत बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना रिक्षाने तसेच पायी प्रवास करून इच्छितस्थळी जावे लागले. बससेवा विस्कळीत झाल्याने एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  सोमवारी (दि.१०) सकाळी काही आंदोलनकर्त्यांनी पुणे येथील पीएमटीच्या एसटी बसेसच्या काचा फोडून नुकसान केल्याने नाशिक आगारातील एसटीचे नुकसान होऊ नये यासाठी बससेवा थांबवण्यात आली होती. सर्व आगारांमधून ३३४० बसेस दिवसभरात धावतात.  सकाळपासूनच शहरातील बससेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांची तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. परिसरातील अनेक ठिकाणच्या बसथांब्यांवर प्रवाशांनी गर्दी केली होती, मात्र बससेवा बंद असल्याचे समजतात त्यांनी खासगी वाहनांनी पुढचा प्रवास केला. पहाटे ५.३० पासून ७ वाजेपर्यंत नाशिकमधून बाहेरगावच्या काही मोजक्या बस धावल्या. पण सकाळी ८ नंतर पुण्या-मुंबईत आंदोलकांनी सुरू केलेल्या दगडफेकीनंतर व पुण्यात पीएमपीची बस जाळण्याची घटना घडल्यानंतर बसचे नुकसान होऊ नये यासाठी नाशिक आगारातील सर्व बसेस बंद करण्यात आल्या.रिक्षाचालकांची चंगळशहरातील एसटी बससेवा विस्कळीत झाली होती. प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करावा लागला. रिक्षाचालकांनी बस बंदचा पुरेपूर फायदा घेत रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करून नियमांची उघडपणे पायमल्ली केली असल्याचे चित्र शहरभर दिसून आले. त्र्यंबक-नाशिक बस बंद, प्रवाशांचे हालसध्या चातुर्मासानिमित्त त्र्यंबकेश्वरी भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. त्यातच सोमवारी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून बसचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नाशिकहून त्र्यंबकला जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यांना टॅक्सी, व्हॅनचा पर्याय स्वीकारावा लागला. टॅक्सीचालकांनी जादा दर आकारल्याने खिशाला झळही बसली. साडेतीननंतर बससेवा सुरळीतएसटी महामंडळाच्या नाशिक विभागातील १३ डेपोमधून मध्यरात्रीपासून दुपारी २ वाजेपर्यंत दिवसभरात नियमित होणाºया ३३४० पैकी केवळ १२२५ बसफेºया होऊ शकल्या. त्यात पहाटे तुरळक प्रमाणात शहरात बस धावल्या तर ग्रामीण भागात काही ठिकाणी त्या व्यवस्थित प्रवास करू शकल्या. २११५ बसफेºया झाल्याच नाहीत. यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला. बसेसचे मात्र कुठे नुकसान झाले नाही. दुपारी साडेतीननंतर राज्यभरातील बसेस नाशिकहून सोडण्यास प्रारंभ झाला. साडेचार वाजेपासून शहर बससेवा सुरळीत सुरू झाली. 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदcongressकाँग्रेस