शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

निफाड तालक्यात साडेतीन एकरावरील ऊस जळून खाक, शॉटसर्कीटने लागली आग लागून लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 16:03 IST

नाशिक : निफाड तालुक्यातील चेहडी खुर्द शिवारातील शेतकरी बाळासाहेब एकनाथ गामणे यांच्या शेतातील साडेतीन एकर क्षेत्रावरील उभ्या ऊसाचे पीक जळून खाक झाले आहे. शेतात महावितरणच्या असलेल्या डीपीवर शॉटसर्कीट झाल्याने ही आग लागली. सदर जळालेल्या पीकांचे नुकसानाची पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चेहडी खुर्द शिवारात गामणे ...

ठळक मुद्देचेहडी खुर्द शिवारात साडेतीन एकर ऊस जळून खाकमहावितरणच्या डीपीवर शॉटसर्कीट झाल्याने ही आगपीकाचे पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी

नाशिक : निफाड तालुक्यातील चेहडी खुर्द शिवारातील शेतकरी बाळासाहेब एकनाथ गामणे यांच्या शेतातील साडेतीन एकर क्षेत्रावरील उभ्या ऊसाचे पीक जळून खाक झाले आहे. शेतात महावितरणच्या असलेल्या डीपीवर शॉटसर्कीट झाल्याने ही आग लागली. सदर जळालेल्या पीकांचे नुकसानाची पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चेहडी खुर्द शिवारात गामणे यांचे शेती असून, यातील साडेतीन एकर क्षेत्रावर ऊस लागवड होती. सदर ऊस पीकाची तोडणीसाठी रितक्षा होती. मात्र रविवारी (दि.१७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतातील डीपीवर शॉटसर्कीट झाली, यात संपूर्ण ऊस पीक जळून खाक झाला. ऊसाला लाग लागल्याचे कळताच, आजू-बाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आगीचे स्वरूप भयान असल्याने सर्व पीक काही क्षणात खाक होऊन गेले. यापूर्वीही सन २००८ मध्ये शेतात असलेल्या डीपीमध्ये शॉटसक्रीट होऊन पीक जळल्याची घटना घडली होती. त्यामुळे डीपी बदलाची मागणी महावितरण यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, महावितरणकडून याकडे दुर्लक्ष झाले. या घटनेनंतर गावचे सरपंच किरण सानप, माजी सरपंच दशरथ रूमणे यांसह ग्रामपंचायत सदस्यांनी पाहणी केली. सोमवारी (दि.१८) सकाळी जिल्हा परिषदेचे सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी जळालेल्या क्षेत्राची पाहणी करून, त्यांनी तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. पीक जळाल्याने लाखो रूपयांची हानी झाली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांस मदत द्यावी अशी मागणी परिसकरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

महावितरणचे दुर्लक्षआग लागू ऊस जळालेल्या शेतातील डीपी दुरूस्तीबाबब ग्रामपंचायतीतर्फे महावितरणकडे तक्रार करण्यात आली होती. त्यासाठी ग्रामपंचायतींने दोनदा पत्रव्यवहार देखील केलेला आहे. मात्र,महावितरणने दुर्लक्ष केले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे पीकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चेहडी खुर्द ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.