शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

निफाड तालक्यात साडेतीन एकरावरील ऊस जळून खाक, शॉटसर्कीटने लागली आग लागून लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 16:03 IST

नाशिक : निफाड तालुक्यातील चेहडी खुर्द शिवारातील शेतकरी बाळासाहेब एकनाथ गामणे यांच्या शेतातील साडेतीन एकर क्षेत्रावरील उभ्या ऊसाचे पीक जळून खाक झाले आहे. शेतात महावितरणच्या असलेल्या डीपीवर शॉटसर्कीट झाल्याने ही आग लागली. सदर जळालेल्या पीकांचे नुकसानाची पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चेहडी खुर्द शिवारात गामणे ...

ठळक मुद्देचेहडी खुर्द शिवारात साडेतीन एकर ऊस जळून खाकमहावितरणच्या डीपीवर शॉटसर्कीट झाल्याने ही आगपीकाचे पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी

नाशिक : निफाड तालुक्यातील चेहडी खुर्द शिवारातील शेतकरी बाळासाहेब एकनाथ गामणे यांच्या शेतातील साडेतीन एकर क्षेत्रावरील उभ्या ऊसाचे पीक जळून खाक झाले आहे. शेतात महावितरणच्या असलेल्या डीपीवर शॉटसर्कीट झाल्याने ही आग लागली. सदर जळालेल्या पीकांचे नुकसानाची पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चेहडी खुर्द शिवारात गामणे यांचे शेती असून, यातील साडेतीन एकर क्षेत्रावर ऊस लागवड होती. सदर ऊस पीकाची तोडणीसाठी रितक्षा होती. मात्र रविवारी (दि.१७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतातील डीपीवर शॉटसर्कीट झाली, यात संपूर्ण ऊस पीक जळून खाक झाला. ऊसाला लाग लागल्याचे कळताच, आजू-बाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आगीचे स्वरूप भयान असल्याने सर्व पीक काही क्षणात खाक होऊन गेले. यापूर्वीही सन २००८ मध्ये शेतात असलेल्या डीपीमध्ये शॉटसक्रीट होऊन पीक जळल्याची घटना घडली होती. त्यामुळे डीपी बदलाची मागणी महावितरण यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, महावितरणकडून याकडे दुर्लक्ष झाले. या घटनेनंतर गावचे सरपंच किरण सानप, माजी सरपंच दशरथ रूमणे यांसह ग्रामपंचायत सदस्यांनी पाहणी केली. सोमवारी (दि.१८) सकाळी जिल्हा परिषदेचे सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी जळालेल्या क्षेत्राची पाहणी करून, त्यांनी तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. पीक जळाल्याने लाखो रूपयांची हानी झाली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांस मदत द्यावी अशी मागणी परिसकरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

महावितरणचे दुर्लक्षआग लागू ऊस जळालेल्या शेतातील डीपी दुरूस्तीबाबब ग्रामपंचायतीतर्फे महावितरणकडे तक्रार करण्यात आली होती. त्यासाठी ग्रामपंचायतींने दोनदा पत्रव्यवहार देखील केलेला आहे. मात्र,महावितरणने दुर्लक्ष केले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे पीकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चेहडी खुर्द ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.