शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पेपर तपासणीचा दुप्पट बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:51 IST

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी व बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

नाशिक : राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी व बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, हे काम करणाऱ्या शिक्षकांवर यावर्षी शिक्षण मंडळाकडून कार्यभार वाढविण्यात आला असून, हे वाढीव काम शिक्षकांना दिलेल्या निर्धारित वेळेतच पूर्ण करावे लागणार असल्याने शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी पेपर तपासणीच्या कामावर टाकलेल्या बहिष्कारामुळे प्रारंभी बारावीच्या पेपर तपासणीचे काम उशिरा सुरू झाले असून, या शिक्षकांसमोर वेळेत काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे. त्यातच नियमित निवृत्त होणारे शिक्षक व रखडलेली शिक्षक भरतीप्रक्रिया यामुळे तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांची कमतरता जाणवत असल्याने उपलब्ध शिक्षकांवर पेपर तपासण्याचा कार्यभार वाढविण्यात आला आहे. तर दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांचे पेपर तपासण्याचे काम सुरू असले तरी दरवर्षाच्या तुलनेत यावर्षी तपासण्यासाठी मिळालेल्या पेपरची संख्या जवळपास दीडपट ते दुप्पट असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.शिवाय शिक्षण मंडळाने शिक्षकांना तीनशे ते चारशे पेपर तपासण्याचे काम १० ते १२ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना के ल्याने शिक्षकांवरील कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे संतप्त शिक्षकांकडून काम उरकण्याच्या घाईत विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास करून दिलेल्या परीक्षेच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता एका शिक्षकाने वर्तवली आहे.पेपर तपासण्याचे काम जबाबदारीचे असल्याने अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ज्येष्ठ शिक्षकांची निवृत्ती आणि विविध जबाबदाऱ्यांमुळे तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांवर काही प्रमाणात पेपर तपासणीचा कार्यभार वाढण्याची शक्यता आहे. यात विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच जबाबदार शिक्षकांकडे ही कामगिरी सोपविण्यात आली आहे.- के. बी. पाटील, विभागीय अध्यक्ष,  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक

टॅग्स :examपरीक्षाNashikनाशिक