शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार बीएलओंवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:25 IST

निवडणुकीचे काम प्रथम प्राधान्यांवर करणे अपेक्षित असतानाही कारणे दाखवित मतदार पडताळणीची कामे करण्यास टाळटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील साडेपाचशे बीएलओवर निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अपेक्षित कामगिरी नसल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे. संबंधितांवर प्रसंगी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.

ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्याचे आदेश : मतदार पडताळणी कामांकडे दुर्लक्ष

नाशिक : निवडणुकीचे काम प्रथम प्राधान्यांवर करणे अपेक्षित असतानाही कारणे दाखवित मतदार पडताळणीची कामे करण्यास टाळटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील साडेपाचशे बीएलओवर निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अपेक्षित कामगिरी नसल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे. संबंधितांवर प्रसंगी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.मतदारांची पडताळणी करण्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आखून दिलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यात २० डिसेंबरपर्यंत ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे उद्दिष्ट असल्याने त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडून नियोजन करण्यात आले होते. असे असतानाही बीएलओंकडून काम करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्याच्या मोहिमेला सुरुवात होताच पहिल्या काही दिवसांत बीएलओंकडून असमर्थता दर्शविली जात आहे. जिल्ह्यात मतदार पडताळणीचे काम सुरू आहे. दि. २० डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्णातील १५ मतदारसंघांतील ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, अतिशय संथगतीने हे काम सुरू होते. दिलेल्या डेडलाइनमध्ये ८९ हजार मतदारांची पडताळणी झाली. त्यामुळे या मोहिमेला येत्या दि. २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दि. २० डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्णातील १५ मतदारसंघांतील ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, निर्धारित मुदतीत अपेक्षित काम नसतानाही केवळ ८९ हजार मतदारांची पडताळणी झाली आहे. शुक्र वार (दि.१०)पर्यंत ४५ लाख ६१ हजारांपैकी अवघ्या ४ लाख २० हजार ६७१ मतदारांचीच पडताळणी झाली असून, एकूण १५ पैकी नऊ विधानसभा मतदारसंघातील पडताळणीचे काम असमाधानकारक असल्याचे समोर आले आहे.उरले केवळ ४० दिवसमतदार पडताळणीचे काम मुदतीत पूर्ण होऊ शकले नसल्याने आता या कामाला दि. २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता केवळ ४१ दिवस उरले असून, या दिवसात ४१ लाख मतदारांच्या पडताळणीचे आव्हान बीएलओंसमोर असणार आहे. ज्या मतदारसंघात कामांची अपेक्षित गती नाही तेथे अधिक लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जाणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग