शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कामचुकार बीएलओंवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:25 IST

निवडणुकीचे काम प्रथम प्राधान्यांवर करणे अपेक्षित असतानाही कारणे दाखवित मतदार पडताळणीची कामे करण्यास टाळटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील साडेपाचशे बीएलओवर निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अपेक्षित कामगिरी नसल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे. संबंधितांवर प्रसंगी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.

ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्याचे आदेश : मतदार पडताळणी कामांकडे दुर्लक्ष

नाशिक : निवडणुकीचे काम प्रथम प्राधान्यांवर करणे अपेक्षित असतानाही कारणे दाखवित मतदार पडताळणीची कामे करण्यास टाळटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील साडेपाचशे बीएलओवर निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अपेक्षित कामगिरी नसल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे. संबंधितांवर प्रसंगी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.मतदारांची पडताळणी करण्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आखून दिलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यात २० डिसेंबरपर्यंत ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे उद्दिष्ट असल्याने त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडून नियोजन करण्यात आले होते. असे असतानाही बीएलओंकडून काम करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्याच्या मोहिमेला सुरुवात होताच पहिल्या काही दिवसांत बीएलओंकडून असमर्थता दर्शविली जात आहे. जिल्ह्यात मतदार पडताळणीचे काम सुरू आहे. दि. २० डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्णातील १५ मतदारसंघांतील ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, अतिशय संथगतीने हे काम सुरू होते. दिलेल्या डेडलाइनमध्ये ८९ हजार मतदारांची पडताळणी झाली. त्यामुळे या मोहिमेला येत्या दि. २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दि. २० डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्णातील १५ मतदारसंघांतील ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, निर्धारित मुदतीत अपेक्षित काम नसतानाही केवळ ८९ हजार मतदारांची पडताळणी झाली आहे. शुक्र वार (दि.१०)पर्यंत ४५ लाख ६१ हजारांपैकी अवघ्या ४ लाख २० हजार ६७१ मतदारांचीच पडताळणी झाली असून, एकूण १५ पैकी नऊ विधानसभा मतदारसंघातील पडताळणीचे काम असमाधानकारक असल्याचे समोर आले आहे.उरले केवळ ४० दिवसमतदार पडताळणीचे काम मुदतीत पूर्ण होऊ शकले नसल्याने आता या कामाला दि. २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता केवळ ४१ दिवस उरले असून, या दिवसात ४१ लाख मतदारांच्या पडताळणीचे आव्हान बीएलओंसमोर असणार आहे. ज्या मतदारसंघात कामांची अपेक्षित गती नाही तेथे अधिक लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जाणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग