शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
4
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
5
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
6
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
7
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
8
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
9
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
10
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
11
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
12
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
13
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
14
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
15
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
16
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
17
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
18
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
19
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
20
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

बिबट्याने हल्ला करून बोकड केले फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 5:50 PM

औंदाणे : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या बोकडावर बिबट्याने हल्ला करून बोकड फस्त केले. येथील भागातील शेतात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतात सिंगल फेज योजना राबवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देबागलाण : तरसाळी येथे रात्रीच्या सुमारास घडली घटना

औंदाणे : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या बोकडावर बिबट्याने हल्ला करून बोकड फस्त केले. येथील भागातील शेतात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतात सिंगल फेज योजना राबवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.येथील उद्धव रौंदळ यांच्या गोठ्यात बांधलेल्या बोकडावर रात्री बिबट्याने हल्ला करु न तो फस्त केला. सकाळी रौदळ यांना हा प्रकार लक्षात आला बांधलेल्या ठिकाणी रक्त व बिबट्याचे ठसे आढळले.बोकडा ओढत हत्ती नदीच्या काठावर शेतात फडश्या पाडल्याचे लक्षात आले. त्याची वनविभागला माहिती मिळताच वनरक्षक गौतम पवार, गुलाब ठाकरे घटनास्ळी दाखल झाले व पंचनामा केला.येथील भागात रात्रीच्या वेळेस अंधार असल्याने रात्री बिबट्या पशुधनाचा फडशा पाडत आहे. शेतांमध्ये सिंगलफेज योजना राबवावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. यामुळे पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुभतीजनावरे ही मोठ्या प्रमाणात आहेत. पण अचानक बिबट्याच्या वावर असल्याने पशुधन वेठीवर आले आहे. सायंकाळी बिबट्याच्या धाकाने सातच्या आत घरात जावे लागत आहे. तरी वन विभागाने अश्या श्वापदांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गावात व शेतात दररोज रात्री वीज गायब होत असल्याने सकाळी वीज येते. ह्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याचा रस्त्याने व गांवातही मुक्त संचार वाढला आहे. फोनही विजेअभावी चार्जी गं होत नसल्याने ग्रामस्थामधे संताप व्यक्त केला जात आहे.परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे रात्र ही जागुन काढावी लागत आहे. मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे सौरक्षण करत आहेत. यावर खबरदारीचे उपाययोजना म्हणून वनविभागाने लक्ष घालवे आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरतील शेतकºयांनी केले आहे.चौकट....मागील एक ते दिड महिन्यापुर्वी तरसाळी येथे विहिरीत बिबट्या पडला होता. वन विभागाने तो बाहेर काढताच पसार झाला. वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाºया येथील गावांजवळील कपाळे डोंगर व तरसाळी. मुंजवाड, औंदाणे गावाला लागुन हत्ती नदी आहे. येथे बिबट्याचा तीन-चार वर्षापासुन वावर आहे. पिकांचा आसरा, मुबलक गुरांची संख्या अशी कारणे आहेत.चौकट -येथील परिसरात शेतात वास्तव्यास राहणाºया शेतकºयांना वीज वेळेवर मिळत नाही. रात्री वीज गायब होत असल्याने बिबट्या परिसरात व शेतांमध्ये मुक्त फिरत आहे. यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. यामुळे शेतामध्ये सिंगल फेज योजना राबवावी, तसेच वन विभाग व वीज वितरण कंपनीने लक्ष घालावे.- प्रभाकर रौंदळ, उपसभापती सटाणा बाजार समिती, तरसाळी. 

टॅग्स :Farmerशेतकरीleopardबिबट्या