शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

मक्यासह बाजरीच्या कणसांना शेतातच फुटले कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 14:23 IST

उमराणे : गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उमराणेसह परिसरातील खरीप हंगामातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या मका, बाजरी पिकांच्या कणसांना शेतातच कोंब फुटू लागल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.

उमराणे : गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उमराणेसह परिसरातील खरीप हंगामातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या मका, बाजरी पिकांच्या कणसांना शेतातच कोंब फुटू लागल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करु न नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकविम्याची रक्कम मिळवुन द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या तीन आठवड्यापूर्वी परतीच्या पावसाने झोडपल्यानंतर उंबºयावर आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ही झळ सोसून अस्मानी संकटातून वाचलेल्या पिकांची सोंगणी व कापणी सुरु असतानाच गेल्या सहा दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतात कापुन पडलेल्या बाजरी व मका पिकांच्या चाºयाची नासाडी तर झालीच परंतु लष्करी अळींच्या तावडीतून थोड्याफार प्रमाणात वाचलेल्या कणसांनाही पावसामुळे शेतातच कोंभ फुटू लागल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे.पावसामुळे शेतातील कामे खोळंबल्याने शेतकऱ्यांना लवकर पाऊस उघण्याची प्रतिक्षा आहे. दरम्यान चालू वर्षी जवळपास सर्वच शेतकर्यांनी पिकविमा काढला असुन खिरपाच्या सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने तात्काळ महसुल विभागामार्फत पंचनामे करु न नुकसानभरपाई म्हणून विमारक्कम जाहीर करावी अशी मागणी बाधीत शेतकर्यांकडुन जोर धरू लागली आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तीव्र दुष्काळाची झळ सोसल्यानंतर चालुवर्षी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कंबर कसलेल्या शेतकर्यांना सुरु वातीपासूनच अस्मानी सुलतानी संकटांना सामोरे जावे लागले असुन सुरु वातीला पावसाचे उशिरा आगमन, त्यानंतर मका व बाजरी पिंकावर लष्करी अळींचा प्रादुर्भाव, त्यानंतर परतीचा पाऊस व पुन्हा गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.परिणामी पिकांपासुन मिळणारे उत्पन्न तर दूरच परंतु उत्पादनासाठी केलेला खर्चही या अस्मानी सुलतानी संकटामुळे वसुल होणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक