शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

आठ लाखांच्या थकबाकीमुळे पिंपळगावच्या बीएसएनएलचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 13:17 IST

पिंपळगाव बसवंत - गेल्या कित्येक दिवसांपासून पिंपळगाव शहरातील मोबाईल नेटवर्करची बत्ती गुल्ल झाल्याने आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधत आहे.तो ...

पिंपळगाव बसवंत - गेल्या कित्येक दिवसांपासून पिंपळगाव शहरातील मोबाईल नेटवर्करची बत्ती गुल्ल झाल्याने आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधत आहे.तो नंबर अस्तित्वातच नाही. अशा उत्तराने पिंपळगावचे नागरिक परेशान झाले आहे. फोन केला की नॉट रिचेबल सारख्या उत्तराने पिंपळगावकर हैराण झाले आहे.याबद्दल चौकशी केली असता बीएसएनएल कंपनीने महावितरण विभागाचे बिलच भरले नसल्याने या टॉवरची वीज खंडित केली असल्याचा प्रकार उघडीस आल्याने बीएसएनएल कंपनीच्या नेटवर्कवर अवलंबून असलेल्या ग्राहकांना नेटवर्कच अस्तित्वात नसल्याचा धक्काच बसला आहे.महावितरणकडून पिंपळगाव बसवंत येथील आठ बीएसएनएल टी.डी टॉवरचा वीजपुरवठा बंद करण्यात आला असून यामुळे या टॉवरवरून सुरू असलेली नेटवर्क सेवादेखील ठप्प झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरणकडून थकीत वीजबील ग्राहकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये सरकारी विभागांचादेखील समावेश आहे. पिंपळगावमधील बीएसएनएलच्या टी.डी टॉवरला आठ वीजमीटर होते .त्यांचे तब्बल ७ लाख ८३ हजार एवढे वीज बिल भरण्यात आलेले नाही. त्यामुळे महावितरणकडून टॉवरसाठी लावण्यात आलेले वीजमीटरच बंद करण्यात आले आहेत.याबाबत बीएसएनएलला संपर्क केला असता बीएसएनएलच्या कार्यालयीन कामकाजाचा निधी दिल्ली आणि मुंबई कार्यालयातून होते. निधी येताच आम्ही वीजबिल भरणार आहोत. दोन्ही सेवा सरकारी आहेत. आम्ही महावितरणशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. महावितरण विभागाकडून सिंगल फेज वीज जोडणी मिळाल्यास परिसरातील इंटरनेट सेवा सुरळीत करता येईल, असे सांगितले जात आहे.--बीएसएनएलकडून आठ वीजमीटरचे मिळून ७ लाख ८३ हजार रु पये एवढे वीजबिल थकीत आहे. ही थकबाकी २०१८ ते १९ या कालावधीतील आहे. त्यामुळे महावितरणकडून कारवाई करण्यात आली आहे. थकीत वीजबिल भरल्यास वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.- गायत्री गावित, सहाय्यक अकाऊंट , महावितरण विभाग.....................................बीएसएनएल वीज पुरवठा बंद केल्यामुळे तसेच महावितरण विभागाचे त्या संबंधित ट्रॉवरचे वीज बिल थकले असल्याने त्या परिसरातील नेटवर्क बंद आहे. आम्ही या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्र ार केली असून नेटवर्क लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत.-वर्षा भंगाळे, बीएसएनएल अधिकारी.............................जर ग्राहकांकडून मोबाईलचे बिल वेळेवर भरले जातात मग त्यांना योग्य नेटवर्कची सेवा का पुरवली जात नाही. ‘रेंज न मिळणे व सतत नेटवर्क ‘इमर्जन्सी कॉल्स ओन्ली’ अशा मोडवर जाणे. इंटरनेट स्पीड नसणे किंवा मध्येच इंटरनेट बंद होणे, हा सुद्धा पिंपळगाव मध्ये नेटवर्कचा सर्वात मोठा त्रास गेल्या कित्येक दिवसापासून आहे.-राजा बुब, त्रस्त नागरिक, पिंपळगाव बसवंत 

टॅग्स :Nashikनाशिक