शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

जिल्ह्याला क्षयरोग उच्चाटनामुळे ब्राँझ पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:54 IST

नाशिक : जगात क्षयरोग (टीबी) झपाट्याने वाढत असून भारताचा क्रमांक अव्वल आहे. जगाच्या तुलनेत २४ टक्के भारतात असून महाराष्ट्रात १० टक्के अशी आकडेवारी तज्ञांच्या वतीने वर्तविले जाते. तरी सुद्धा नाशिक आरोग्य विभागाने क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी कंबर कसली असल्याने त्यांच्याच कार्याची पावती म्हणून नाशिक जिल्ह्याला चांगल्या कार्याबद्दल ब्राँझ पदक प्रदान करण्यात आले असून ही नाशिक जिल्ह्याकरिता अभिमानास्पद बाब आहे.

ठळक मुद्देनाशिक आरोग्य शिरपेचात मानाचा तुरा : दिल्ली येथे सोहळा संपन्न

नाशिक : जगात क्षयरोग (टीबी) झपाट्याने वाढत असून भारताचा क्रमांक अव्वल आहे. जगाच्या तुलनेत २४ टक्के भारतात असून महाराष्ट्रात १० टक्के अशी आकडेवारी तज्ञांच्या वतीने वर्तविले जाते. तरी सुद्धा नाशिक आरोग्य विभागाने क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी कंबर कसली असल्याने त्यांच्याच कार्याची पावती म्हणून नाशिक जिल्ह्याला चांगल्या कार्याबद्दल ब्राँझ पदक प्रदान करण्यात आले असून ही नाशिक जिल्ह्याकरिता अभिमानास्पद बाब आहे.दिल्ली येथे क्षयरोग दिनाच्या निमित्ताने बुधवारी (दि.२४) केंद्रीय आरोग्यमंत्रीडॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत क्षयरोग अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख व डॉ. योगेश चित्ते यांना ब्राँझ पदक देऊन सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र आरोग्य विभाग क्षयरोग निर्मूलनाचे कार्य मोठ्या प्रमाणात करत असून नाशिक जिल्ह्यातील क्षयरोग निर्मूलनाचे कार्य उल्लेखनीय आहे. नाशिक जिल्हा क्षयरोग निर्मूलनाच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांच्याच कार्याची पावती म्हणून नाशिक जिल्ह्याला ब्राँझपदक प्राप्त झाले आहे.भारतातून ६२८ जिल्ह्यामधून ७० जिल्हेनामांकनासाठी पात्र झाले होते. त्यातील २९ जिल्ह्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या जिल्ह्यामधूनजागतिक आरोग्य यंत्रनेच्या टीमने नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १० हजार घरांघरांत जाऊन तब्बल ४१ हजार लोकांचे आरोग्य तपासणी करून यांच्या कार्याची पावती केंद्रीय आरोग्य विभागाकडे आपला प्रस्ताव सादर करण्यात येत असतो. याबरोबरच ५ वर्षांच्या कार्याची दखल यामधून घेतल्या जाते. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील आरोग्य क्षयरोग विभागाने मोठी मजल मारली असून २०२५ पर्यंत जिल्ह्यातून क्षयरोग समूळ नष्ट होईल हे नक्की.या कार्याला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रत्ना रावखंडे, क्षयरोग अधिकारी डॉ एम बी देशमुख, जिल्हा क्षयरोग केंद्राचे प्रमुख डॉ योगेश चित्ते यांचा सहभाग आहे.

 

 

टॅग्स :GovernmentसरकारHealthआरोग्य