शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
6
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
7
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
8
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
9
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
10
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
11
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
12
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
13
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
14
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
15
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
16
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
17
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
18
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
19
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
20
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

देशमाने परिसरातील पुलांचे कथडे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:11 IST

देशमाने शिवारातील नाशिक -औरंगाबाद मार्गावरील गोई नदी, खडकी नाला व २८ क्र . वितरिका वरील पुलावरील लोखंडी कथडे वाहनांच्या धडकेने कमकुवत झाले आहे. तर वितरीका क्र .२५ वरील कथडे वाहनांच्या धडकेने पूर्णत: नेस्तनाबूत झाली आहे. नाशिक - औरंगाबाद महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. यात अवजड वाहनांची संख्या मोठया प्रमाणावर असते.

देशमाने : शिवारातील नाशिक -औरंगाबाद मार्गावरील गोई नदी, खडकी नाला व २८ क्र . वितरिका वरील पुलावरील लोखंडी कथडे वाहनांच्या धडकेने कमकुवत झाले आहे. तर वितरीका क्र .२५ वरील कथडे वाहनांच्या धडकेने पूर्णत: नेस्तनाबूत झाली आहे. नाशिक - औरंगाबाद महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. यात अवजड वाहनांची संख्या मोठया प्रमाणावर असते. महामार्ग चौपदरीकरणात सर्व पुलांची उंची वाढवत त्यावर लोखंडी कथडे बसवण्यात आले आहे. मात्र वेळोवेळी झालेल्या वाहन अपघातात या कथड्याची दुरु स्तीच करण्यात न आल्याने भविष्यात ही पुलें वाहतुकीस धोकादायक ठरू शकतात. अवजड वाहणा बरोबरच प्रवासी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात असल्याने अपघातात प्रवाशांच्या जीवाला धोका वाढू शकतो. दरम्यान, या मार्गावरील नाशिकहून येवल्याकडे जाताना वितरीका क्र . २५ वरील पुलाचे कथडे वाहनांच्या धडकेने पूर्णत: नाहिशे झाले आहे. सुमारे तीन वर्षाहून अधिक काळ उलटूनही या कथड्याची दुरु स्ती न केल्याने या ठिकाणी अपघात झाल्यास मोठी जीवित व वित्त हानी होऊ शकते. सभोवताल वाढलेली झाडे, झुडपे यामुळे तर याठिकाणी तर पुलाचे अस्तित्व देखील कळत नाही.विशेष बाब म्हणजे याच मार्गावरून बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्?यांचा कायम राबता आहे. सदर बाब लक्षात येऊन देखील त्यांचा या समस्ये कडे कानाडोळा करत आहे.-----------------मन्याड नदीवरील पुलाला लागेना मूहूर्तनांदगाव तालुक्यातील मन्याड नदीचा ऐल तीर आणि पैल तीर जोडणाऱ्या पुलाचे काम अद्याप मार्गी लागले नसल्याने जनतेत नाराजी आहे. रस्ता तयार आहे पण पूल नाही. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा सहा कोटी रु पयाचा निधी खर्च होऊन सुद्धा पावसाळ्यात रस्ता वाहतुकीसाठी निरुपयोगी ठरल्याचे उदाहरण साकोरे चांदोरे रस्त्यावर दिसून येत आहे. साकोरे चांदोरे रस्त्याचे आंतरजिल्हा महत्व आहे. नस्तनपूर लाखो शनीभक्तांचे श्रध्दास्थान आहे. सदर रस्ता या सर्व गावांना जोडणारा आहे. साकोरे येथून चांदोरे या गावी जाण्यासाठी साकोरे..नांदगाव..चांदोरे असे १८ किमी जावे लागते. मात्र या रस्त्यावरून गेले तर ७ किमी अंतर आहे. दोन वर्षांपासून रस्ता तयार असला तरी मन्याड नदीवरील पूलाला मुहूर्त काही लागत नाही. त्यामुळे हा रस्ता पुलाअभावी पावसाळ्यात निरु पयोगी ठरला आहे.--------------------कादवा नदीवरील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेतलखमापूर येथील कादवा नदीवरील पुलाची संरक्षक कठड्यांअभावी दुरवस्था झाली असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. लखमापूर व म्हेळुसके या दोन गावांना जोडणाºया या पुलावरून कादवा म्हाळुंगी, ओझे, उबराळे, निळवंडीपाडे, करजंवण व परिसरातील नागरिक दररोज ये-जा करतात. पुलाला संरक्षक कठडे नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन जावे लागते. पावसाळ्यात तसेच करजंवण धरणातून पाणी सोडण्यात येते त्यावेळी पुलावरून पाणी वाहते. पुलावरील रस्त्याला जागोजागी खड्डे पडलेले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्यामुळे वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघत घडतात. पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात नेहमी पाण्याखाली असतो. त्यामुळे संरक्षक खांब पुराच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांना दांडी मारावी लागते. तालुक्याच्या गावी जाण्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे. पुलाच्या दुरवस्थेमुळे भाजीपाला बाजारपेठेत नेण्यासाठी विलंब होतो. पर्यायाने शेतमाल कवडीमोल दराने विकवा लागतो. संबंधित विभागाने पुलाची त्वरित दुरुस्ती करावी तसेच उंची वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक