शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

देशमाने परिसरातील पुलांचे कथडे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:11 IST

देशमाने शिवारातील नाशिक -औरंगाबाद मार्गावरील गोई नदी, खडकी नाला व २८ क्र . वितरिका वरील पुलावरील लोखंडी कथडे वाहनांच्या धडकेने कमकुवत झाले आहे. तर वितरीका क्र .२५ वरील कथडे वाहनांच्या धडकेने पूर्णत: नेस्तनाबूत झाली आहे. नाशिक - औरंगाबाद महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. यात अवजड वाहनांची संख्या मोठया प्रमाणावर असते.

देशमाने : शिवारातील नाशिक -औरंगाबाद मार्गावरील गोई नदी, खडकी नाला व २८ क्र . वितरिका वरील पुलावरील लोखंडी कथडे वाहनांच्या धडकेने कमकुवत झाले आहे. तर वितरीका क्र .२५ वरील कथडे वाहनांच्या धडकेने पूर्णत: नेस्तनाबूत झाली आहे. नाशिक - औरंगाबाद महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. यात अवजड वाहनांची संख्या मोठया प्रमाणावर असते. महामार्ग चौपदरीकरणात सर्व पुलांची उंची वाढवत त्यावर लोखंडी कथडे बसवण्यात आले आहे. मात्र वेळोवेळी झालेल्या वाहन अपघातात या कथड्याची दुरु स्तीच करण्यात न आल्याने भविष्यात ही पुलें वाहतुकीस धोकादायक ठरू शकतात. अवजड वाहणा बरोबरच प्रवासी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात असल्याने अपघातात प्रवाशांच्या जीवाला धोका वाढू शकतो. दरम्यान, या मार्गावरील नाशिकहून येवल्याकडे जाताना वितरीका क्र . २५ वरील पुलाचे कथडे वाहनांच्या धडकेने पूर्णत: नाहिशे झाले आहे. सुमारे तीन वर्षाहून अधिक काळ उलटूनही या कथड्याची दुरु स्ती न केल्याने या ठिकाणी अपघात झाल्यास मोठी जीवित व वित्त हानी होऊ शकते. सभोवताल वाढलेली झाडे, झुडपे यामुळे तर याठिकाणी तर पुलाचे अस्तित्व देखील कळत नाही.विशेष बाब म्हणजे याच मार्गावरून बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्?यांचा कायम राबता आहे. सदर बाब लक्षात येऊन देखील त्यांचा या समस्ये कडे कानाडोळा करत आहे.-----------------मन्याड नदीवरील पुलाला लागेना मूहूर्तनांदगाव तालुक्यातील मन्याड नदीचा ऐल तीर आणि पैल तीर जोडणाऱ्या पुलाचे काम अद्याप मार्गी लागले नसल्याने जनतेत नाराजी आहे. रस्ता तयार आहे पण पूल नाही. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा सहा कोटी रु पयाचा निधी खर्च होऊन सुद्धा पावसाळ्यात रस्ता वाहतुकीसाठी निरुपयोगी ठरल्याचे उदाहरण साकोरे चांदोरे रस्त्यावर दिसून येत आहे. साकोरे चांदोरे रस्त्याचे आंतरजिल्हा महत्व आहे. नस्तनपूर लाखो शनीभक्तांचे श्रध्दास्थान आहे. सदर रस्ता या सर्व गावांना जोडणारा आहे. साकोरे येथून चांदोरे या गावी जाण्यासाठी साकोरे..नांदगाव..चांदोरे असे १८ किमी जावे लागते. मात्र या रस्त्यावरून गेले तर ७ किमी अंतर आहे. दोन वर्षांपासून रस्ता तयार असला तरी मन्याड नदीवरील पूलाला मुहूर्त काही लागत नाही. त्यामुळे हा रस्ता पुलाअभावी पावसाळ्यात निरु पयोगी ठरला आहे.--------------------कादवा नदीवरील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेतलखमापूर येथील कादवा नदीवरील पुलाची संरक्षक कठड्यांअभावी दुरवस्था झाली असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. लखमापूर व म्हेळुसके या दोन गावांना जोडणाºया या पुलावरून कादवा म्हाळुंगी, ओझे, उबराळे, निळवंडीपाडे, करजंवण व परिसरातील नागरिक दररोज ये-जा करतात. पुलाला संरक्षक कठडे नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन जावे लागते. पावसाळ्यात तसेच करजंवण धरणातून पाणी सोडण्यात येते त्यावेळी पुलावरून पाणी वाहते. पुलावरील रस्त्याला जागोजागी खड्डे पडलेले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्यामुळे वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघत घडतात. पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात नेहमी पाण्याखाली असतो. त्यामुळे संरक्षक खांब पुराच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांना दांडी मारावी लागते. तालुक्याच्या गावी जाण्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे. पुलाच्या दुरवस्थेमुळे भाजीपाला बाजारपेठेत नेण्यासाठी विलंब होतो. पर्यायाने शेतमाल कवडीमोल दराने विकवा लागतो. संबंधित विभागाने पुलाची त्वरित दुरुस्ती करावी तसेच उंची वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक