शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

दमणगंगेवरील पूल कठड्यांविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:24 IST

पेठ : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांसह पेठ तालुक्यातील उम्रद ते बोंडारमाळ या दोन गावांना जोडणारा दमणगंगा नदीवरील पूल संरक्षक कठड्यांविना असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे

पेठ : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांसह पेठ तालुक्यातील उम्रद ते बोंडारमाळ या दोन गावांना जोडणारा दमणगंगा नदीवरील पूल संरक्षक कठड्यांविना असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे अनुचित घटना घडण्यापूर्वीच संबंधित विभागाने पुलाची दुरुस्ती करून दोन्ही बाजूंना मजबूत संरक्षक कठडे व जाळ्या लावण्याची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. साधारण कोणताही पूल बांधला म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे असणे गरजेचे असते. त्यामुळे पुलावरून पादचारी व वाहनधारकांना धोक्याचा अंदाज घेऊन प्रवास करणे सुकर होते. मात्र, दमणगंगा नदीवर बांधण्यात आलेला पूल सद्य:स्थितीत दोन्हीही बाजूंना संरक्षक कठडे नसल्याने धोकादायक ठरत आहे. रात्री-अपरात्री तसेच पावसाळ्यात या पुलावरून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.पावसाळ्यात पुलावरून वाहते पाणी पेठ तालुक्यातील बोंडारमाळ हे सर्वाधिक दुर्गम गाव. दमणगंगा नदीने चारही बाजूने वेढा घातलेल्या या गावाचा पावसाळ्यात चार महिने इतर गावांशी संपर्कतुटत असे. त्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत आंबापणी ते बोंडारमाळ हा जवळपास सहा किलोमीटरचा रस्ता जंगलातून काढण्यात आला, तर दमणगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र या पुलावरील कठडे दोन वर्षातच पुराच्या पाण्याच्या वाहून गेले. त्यामुळे पूल धोकेदायक बनला आहे.दमणगंगा नदी पावसाळ्यात रौद्ररूप धारण करत असते. पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने अधिक पाऊस झाल्यास पुलावरून पावसाचे पाणी वाहते. त्यामुळे पाण्यातून मार्गक्र मण करताना प्रवाशांना पुलाच्या रुंदीचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा संभव आहे.शिवाय पाण्याचा वेग जास्त असल्याने या पुलावरून पादचारी वाहून जाण्याचे प्रकारही घडू शकतात. त्यामुळे पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक