शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

दमणगंगेवरील पूल कठड्यांविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:24 IST

पेठ : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांसह पेठ तालुक्यातील उम्रद ते बोंडारमाळ या दोन गावांना जोडणारा दमणगंगा नदीवरील पूल संरक्षक कठड्यांविना असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे

पेठ : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांसह पेठ तालुक्यातील उम्रद ते बोंडारमाळ या दोन गावांना जोडणारा दमणगंगा नदीवरील पूल संरक्षक कठड्यांविना असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे अनुचित घटना घडण्यापूर्वीच संबंधित विभागाने पुलाची दुरुस्ती करून दोन्ही बाजूंना मजबूत संरक्षक कठडे व जाळ्या लावण्याची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. साधारण कोणताही पूल बांधला म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे असणे गरजेचे असते. त्यामुळे पुलावरून पादचारी व वाहनधारकांना धोक्याचा अंदाज घेऊन प्रवास करणे सुकर होते. मात्र, दमणगंगा नदीवर बांधण्यात आलेला पूल सद्य:स्थितीत दोन्हीही बाजूंना संरक्षक कठडे नसल्याने धोकादायक ठरत आहे. रात्री-अपरात्री तसेच पावसाळ्यात या पुलावरून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.पावसाळ्यात पुलावरून वाहते पाणी पेठ तालुक्यातील बोंडारमाळ हे सर्वाधिक दुर्गम गाव. दमणगंगा नदीने चारही बाजूने वेढा घातलेल्या या गावाचा पावसाळ्यात चार महिने इतर गावांशी संपर्कतुटत असे. त्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत आंबापणी ते बोंडारमाळ हा जवळपास सहा किलोमीटरचा रस्ता जंगलातून काढण्यात आला, तर दमणगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र या पुलावरील कठडे दोन वर्षातच पुराच्या पाण्याच्या वाहून गेले. त्यामुळे पूल धोकेदायक बनला आहे.दमणगंगा नदी पावसाळ्यात रौद्ररूप धारण करत असते. पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने अधिक पाऊस झाल्यास पुलावरून पावसाचे पाणी वाहते. त्यामुळे पाण्यातून मार्गक्र मण करताना प्रवाशांना पुलाच्या रुंदीचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा संभव आहे.शिवाय पाण्याचा वेग जास्त असल्याने या पुलावरून पादचारी वाहून जाण्याचे प्रकारही घडू शकतात. त्यामुळे पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक