शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

८४ दिवसांच्या निर्बंधांचा लसीकरणाच्या वेगाला खोडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST

नाशिक : जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सुमारे ३१ टक्के नागरिकांचा पहिला डोस, तर अवघ्या १२ टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला ...

नाशिक : जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सुमारे ३१ टक्के नागरिकांचा पहिला डोस, तर अवघ्या १२ टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. शासनाकडून बहुतांश केंद्रांवर पहिला आणि दुसरा डोस मुबलक प्रमाणात असूनही ते घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांचे दररोजचे प्रमाण निम्म्याहून कमी असून, त्यामागे ८४ दिवसांचे निर्बंध तसेच कोरोनाचे घटलेले प्रमाण लसीकरणाच्या थंड प्रतिसादाला कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. ज्या डोससाठी नागरिक पहाटे ३ पासून रांगेत उभे राहून दुपारी डोस मिळत होते, तेच डोस आता सहजपणे किंवा फारतर अवघ्या एक-दोन नंबरमागे मिळू लागले आहेत. सर्व केंद्रांवर दिसणाऱ्या रांगांचे चित्र आता जवळपास संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. एखाद्या सेंटरवर रांग असली तरी ती ५ ते ७ नागरिकांपेक्षा अधिक नसते. त्यामुळे लसीकरणासाठी गेल्यानंतर फार तर अर्ध्या तासात लसीकरण पूर्ण होत असल्याचे दिलासादायक चित्र नागरिक अनुभवत आहेत. मात्र, जिल्ह्यात कमी प्रमाणात लस उपलब्ध असतानाही जिथे ६० हजारांवर लसीकरण सुरू होते, तिथे आता लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनही जिल्ह्यात हे प्रमाण ४५ ते ५० हजारांच्या आसपास राहत आहे. सध्याच्या थंड प्रतिसादामागे पहिला डोस घेतलेल्यांचे वाढते प्रमाण तसेच दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांच्या कालावधीचे निर्बंध कारणीभूत ठरत आहे.

इन्फो

दिवसाला १ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट

पालकमंत्र्यांनी गुरुवारीच घेतलेल्या आढावा बैठकीत लसीकरणाचा वेग वाढविण्याचे आवाहन करतानाच दिवसाला १ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्या तुलनेत सध्या होत असलेले लसीकरण जवळपास निम्मेच असल्याने लसीकरणाला दुप्पट वेग दिल्यास अपेक्षित परिणाम साधता येणार आहे.

इन्फो

जिल्ह्यात दुसरा डोस १२ टक्के, शहरात १७ टक्के

जिल्ह्याच्या तुलनेत शहरातील नागरिकांचे लसीकरण अधिक प्रमाणात असले, तरी ते फार अधिकदेखील नसल्याचे लसीकरणाच्या टक्केवारीतून दिसून येत आहे. जिल्ह्यातील पहिल्या डोसची टक्केवारी ३१ असून शहरातील पहिल्या डोसचे प्रमाण ३७ टक्क्यांवर आहे, तर जिल्ह्यात दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण अवघे १२ टक्के असताना शहरात दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण १७ टक्के आहे.

कोट

पुढील आठवड्यात वाढेल प्रमाण

गौरी-गणपती तसेच दुसऱ्या डोसमधील अंतराच्या निर्बंधांमुळे सध्या लसीकरणाचे प्रमाण काही प्रमाणात कमी आहे. मात्र, लसींचा पुरेसा साठा असून, पुढील आठवड्यापासून लसीकरणाचे प्रमाण वाढू शकणार आहे.

- डॉ. अजिता साळुंखे, मनपा लसीकरण अधिकारी