शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

वैचारिक क्रांतीसाठी ब्राह्मण संघटन आवश्यक

By admin | Updated: October 24, 2016 00:05 IST

विद्याभिनव शंकर भारती : अखिल भारतीय ब्राह्मण वकील राज्य अधिवेशनात प्रतिपादन

नाशिक : भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ व पवित्र असून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र या चारही वर्णाच्या प्रगती व मार्गदर्शनासाठी ब्राह्मण संघटन आवश्यक आहे़ यासाठी ब्राह्मण वकिलांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन शृंगेरीमठ गुरुपीठ कुडलीचे प़पू़ विद्याभिनव शंकर भारती यांनी केले़ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेश आयोजित वकिलांच्या राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते़ प़पू़ भारती पुढे म्हणाले की, पूर्वी गुरुकुलामध्ये संस्कार केले जात; मात्र सद्यस्थितीत इंग्रजी शिक्षणामुळे लोभ व प्रतिष्ठा वाढीस लागली असून, भारतीय संस्कृतीबद्दल अनादर निर्माण झाला आहे़ ब्राह्मण वकिलांनी न्यासासाठी आलेल्यास लवकरात लवकर न्याय कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत़ वकिलांनी कायदा निर्मितीपासून तर अंमलबजावणीपर्यंतचे सर्वच ज्ञान आहे़ त्यामुळे त्यांनी आपल्या या बुद्धिमत्तेचा उपयोग न्यायासाठी, समाजासाठी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले़ 

समाजाला नीती देण्याचे काम आता वकिलांकडेप्रथम सत्रात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी, डॉ़ मो़ स़ गोसावी यांनी वकिलांचे एकत्रीकरण, वकिलांच्या समस्या व भविष्यकाळातील आव्हाने, वकिली पेशातील करिअर व संधी, ब्राह्मण समाजाच्या वकिलांकडून असणाऱ्या अपेक्षा, न्यायसंस्थेत अधिकाधिक तरुण कसे जातील, याबाबत मार्गदर्शन केले़ जोशी यांनी पूर्वी समाजाला नीतीचे धडे हा धर्म देत होता़; मात्र ही व्यवस्था नष्ट झाल्याने हे काम वकिलांकडे आल्याचे सांगितले़ द्वितीय सत्रात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ़ महेश करंदीकर यांनी २५ टक्के वकिलांना तणाव असून आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये वकिलांचा चौथा क्रमांक आहे़ वकिली व्यवसायातील ३६ टक्के वकिलांचा घटस्फोट होतो़ त्यामुळे तणाव हा मेंदूची पर्यायाने निर्णयशक्ती क्षीण करतो़ त्यामुळे नेहमी चांगला विचार, कामाचे योग्य नियोजन, किमान पाच मिनिटे मेडिटेशन करण्याचा सल्ला करंदीकर यांनी दिला़