शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वैचारिक क्रांतीसाठी ब्राह्मण संघटन आवश्यक

By admin | Updated: October 24, 2016 00:05 IST

विद्याभिनव शंकर भारती : अखिल भारतीय ब्राह्मण वकील राज्य अधिवेशनात प्रतिपादन

नाशिक : भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ व पवित्र असून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र या चारही वर्णाच्या प्रगती व मार्गदर्शनासाठी ब्राह्मण संघटन आवश्यक आहे़ यासाठी ब्राह्मण वकिलांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन शृंगेरीमठ गुरुपीठ कुडलीचे प़पू़ विद्याभिनव शंकर भारती यांनी केले़ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेश आयोजित वकिलांच्या राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते़ प़पू़ भारती पुढे म्हणाले की, पूर्वी गुरुकुलामध्ये संस्कार केले जात; मात्र सद्यस्थितीत इंग्रजी शिक्षणामुळे लोभ व प्रतिष्ठा वाढीस लागली असून, भारतीय संस्कृतीबद्दल अनादर निर्माण झाला आहे़ ब्राह्मण वकिलांनी न्यासासाठी आलेल्यास लवकरात लवकर न्याय कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत़ वकिलांनी कायदा निर्मितीपासून तर अंमलबजावणीपर्यंतचे सर्वच ज्ञान आहे़ त्यामुळे त्यांनी आपल्या या बुद्धिमत्तेचा उपयोग न्यायासाठी, समाजासाठी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले़ 

समाजाला नीती देण्याचे काम आता वकिलांकडेप्रथम सत्रात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी, डॉ़ मो़ स़ गोसावी यांनी वकिलांचे एकत्रीकरण, वकिलांच्या समस्या व भविष्यकाळातील आव्हाने, वकिली पेशातील करिअर व संधी, ब्राह्मण समाजाच्या वकिलांकडून असणाऱ्या अपेक्षा, न्यायसंस्थेत अधिकाधिक तरुण कसे जातील, याबाबत मार्गदर्शन केले़ जोशी यांनी पूर्वी समाजाला नीतीचे धडे हा धर्म देत होता़; मात्र ही व्यवस्था नष्ट झाल्याने हे काम वकिलांकडे आल्याचे सांगितले़ द्वितीय सत्रात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ़ महेश करंदीकर यांनी २५ टक्के वकिलांना तणाव असून आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये वकिलांचा चौथा क्रमांक आहे़ वकिली व्यवसायातील ३६ टक्के वकिलांचा घटस्फोट होतो़ त्यामुळे तणाव हा मेंदूची पर्यायाने निर्णयशक्ती क्षीण करतो़ त्यामुळे नेहमी चांगला विचार, कामाचे योग्य नियोजन, किमान पाच मिनिटे मेडिटेशन करण्याचा सल्ला करंदीकर यांनी दिला़