शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

...तर येणाऱ्या निवडणुकीवर गावाचा बहिष्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:40 IST

येथील औष्णिक वीज केंद्राला लागलेले ग्रहण सोडण्यासाठी एकलहरे औष्णिक वीज केंद्र प्रकल्प बचाव संघर्ष समितीने आग्रही भूमिका घेत, येत्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या आत यावर तोडगा काढला नाही तर शासन व प्रशासन दोघांनीही जनतेचा रोष पत्करावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

एकलहरे : येथील औष्णिक वीज केंद्राला लागलेले ग्रहण सोडण्यासाठी एकलहरे औष्णिक वीज केंद्र प्रकल्प बचाव संघर्ष समितीने आग्रही भूमिका घेत, येत्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या आत यावर तोडगा काढला नाही तर शासन व प्रशासन दोघांनीही जनतेचा रोष पत्करावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकलहरे येथील १४० मेगावॉटचे दोन संच बंद केले त्याबदल्यात ६६० मेगावॉटचा संच मंजूर केला. मात्र आजवर शासन व प्रशासनाच्या वतीने तांत्रिक मुद्दे उपस्थित करून या बदली संचाला वाटाण्याच्या अक्षदा वाहिल्या. ६६० संचांसाठी लागणारी जमीन, पाणी, कोळसा वाहतूक यंत्रणा, मनुष्यबळ सर्वसोई उपलब्धता असूनही आजपर्यंत उभारणीचे काम सुरू झाले नाही.मिळालेल्या माहितीवरून औष्णिक वीज केंद्राच्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू असून, येथे अनेक प्रजातींचे लागवड केलेली झाडे नाहीसे करून भौगोलिक वातावरण सौर ऊर्जा प्रकल्पाला अनुकूल नसतानाही सौर ऊर्जाचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.  एकलहरे औष्णिक प्रकल्पासाठी शासनाने जिल्हाधिकाºयांमार्फत शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या, परंतु १९६४ शेतकºयांचे पुनर्वसन केले नाही. नोकरी व सवलती देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे ज्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांच्या तीन पिढ्या बरबाद झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.शिवाय कुठलीही पूर्वसूचना न देता शेतकरी, कष्टकरी, कामगार रास्ता रोको, उपोषण, घेराव अशा प्रकारची आंदोलने करतील, असा इशारा एकलहरे प्रकल्प बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष शंकरराव धनवटे, विनायक हारक, अनिल जगताप, सुनील जाधव, पंढरीनाथ कांबळे, लकी ढोकणे, रामदास फणसे, अतुल धनवटे, शेखर अहेर, सागर जाधव आदींनी दिला आहे.एकलहरे वीज केंद्राच्या पंचक्रोशीतील ८ ते १० गावांना या वीज केंद्रामुळे रोजगार मिळत आहे. हे वीज केंद्रच बंद झाले तर त्यावर अवलंबून असलेल्या १५ ते २० हजार लोकांचा रोजगार बुडणार आहे. त्यामुळे बेकारी निर्माण होऊन अनागोंदी माजेल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा देण्यात आला आहे, जर ६६० मेगावॉटचा प्रकल्प सुरू केला नाही तर येत्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक