शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

...तर येणाऱ्या निवडणुकीवर गावाचा बहिष्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:40 IST

येथील औष्णिक वीज केंद्राला लागलेले ग्रहण सोडण्यासाठी एकलहरे औष्णिक वीज केंद्र प्रकल्प बचाव संघर्ष समितीने आग्रही भूमिका घेत, येत्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या आत यावर तोडगा काढला नाही तर शासन व प्रशासन दोघांनीही जनतेचा रोष पत्करावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

एकलहरे : येथील औष्णिक वीज केंद्राला लागलेले ग्रहण सोडण्यासाठी एकलहरे औष्णिक वीज केंद्र प्रकल्प बचाव संघर्ष समितीने आग्रही भूमिका घेत, येत्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या आत यावर तोडगा काढला नाही तर शासन व प्रशासन दोघांनीही जनतेचा रोष पत्करावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकलहरे येथील १४० मेगावॉटचे दोन संच बंद केले त्याबदल्यात ६६० मेगावॉटचा संच मंजूर केला. मात्र आजवर शासन व प्रशासनाच्या वतीने तांत्रिक मुद्दे उपस्थित करून या बदली संचाला वाटाण्याच्या अक्षदा वाहिल्या. ६६० संचांसाठी लागणारी जमीन, पाणी, कोळसा वाहतूक यंत्रणा, मनुष्यबळ सर्वसोई उपलब्धता असूनही आजपर्यंत उभारणीचे काम सुरू झाले नाही.मिळालेल्या माहितीवरून औष्णिक वीज केंद्राच्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू असून, येथे अनेक प्रजातींचे लागवड केलेली झाडे नाहीसे करून भौगोलिक वातावरण सौर ऊर्जा प्रकल्पाला अनुकूल नसतानाही सौर ऊर्जाचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.  एकलहरे औष्णिक प्रकल्पासाठी शासनाने जिल्हाधिकाºयांमार्फत शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या, परंतु १९६४ शेतकºयांचे पुनर्वसन केले नाही. नोकरी व सवलती देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे ज्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांच्या तीन पिढ्या बरबाद झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.शिवाय कुठलीही पूर्वसूचना न देता शेतकरी, कष्टकरी, कामगार रास्ता रोको, उपोषण, घेराव अशा प्रकारची आंदोलने करतील, असा इशारा एकलहरे प्रकल्प बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष शंकरराव धनवटे, विनायक हारक, अनिल जगताप, सुनील जाधव, पंढरीनाथ कांबळे, लकी ढोकणे, रामदास फणसे, अतुल धनवटे, शेखर अहेर, सागर जाधव आदींनी दिला आहे.एकलहरे वीज केंद्राच्या पंचक्रोशीतील ८ ते १० गावांना या वीज केंद्रामुळे रोजगार मिळत आहे. हे वीज केंद्रच बंद झाले तर त्यावर अवलंबून असलेल्या १५ ते २० हजार लोकांचा रोजगार बुडणार आहे. त्यामुळे बेकारी निर्माण होऊन अनागोंदी माजेल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा देण्यात आला आहे, जर ६६० मेगावॉटचा प्रकल्प सुरू केला नाही तर येत्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक