शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

पाण्यासाठी निवडणुकांवर बहिष्कार ; रामतीर ग्रामस्थांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:32 IST

सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बागलाण तालुक्यातील रामतीर गावाने विशेष ग्रामसभा आयोजित करून जोपर्यंत गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जात नाही तोपर्यंत आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसह विधानसभा व लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बागलाण तालुक्यातील रामतीर गावाने विशेष ग्रामसभा आयोजित करून जोपर्यंत गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जात नाही तोपर्यंत आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसह विधानसभा व लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रामतीर गाव दुष्काळाचा सामना करत असून जेथे माणसांना प्यायला पाणी नाही तेथे जनावरे व शेतीची अवस्था काय असेल असा सवाल उपस्थित करत विशेष ग्रामसभेत जोपर्यंत गावासाठी कायमस्वरूपी पाण्याची शाश्वत व्यवस्था केली जाणार नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान करायचे नाही असा निर्णय ग्रामसभेत (ठराव क्र मांक ३) घेण्यात आला आहे.निवडणुका आल्या की पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन द्यायचे आणि निवडणूक संपली की पाच वर्षे गावाकडे ढुंकुनही पाहायचे नाही असे राजकारण सुरु असल्याचा आरोप करत आता राजकारण्यांना वठणीवर आणण्यासाठी कोणत्याही निवडणुकीत सहभाग न घेण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. हरणबारी उजवा कालवा हे केवळ स्वप्न दाखविले जात असून या कालव्याचा प्रश्न सुटला असता तर रामतीरचा पाणीप्रश्न कधीच सुटला असता यावर देखील ग्रामसभेत चर्चा करण्यात आली.आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यासाठी बाळासाहेब बळीराम आहिरे यांनी सूचना मांडली, या सूचनेला केवळ निंबा अहिरे यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक