शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी निवडणुकांवर बहिष्कार ; रामतीर ग्रामस्थांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:32 IST

सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बागलाण तालुक्यातील रामतीर गावाने विशेष ग्रामसभा आयोजित करून जोपर्यंत गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जात नाही तोपर्यंत आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसह विधानसभा व लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बागलाण तालुक्यातील रामतीर गावाने विशेष ग्रामसभा आयोजित करून जोपर्यंत गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जात नाही तोपर्यंत आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसह विधानसभा व लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रामतीर गाव दुष्काळाचा सामना करत असून जेथे माणसांना प्यायला पाणी नाही तेथे जनावरे व शेतीची अवस्था काय असेल असा सवाल उपस्थित करत विशेष ग्रामसभेत जोपर्यंत गावासाठी कायमस्वरूपी पाण्याची शाश्वत व्यवस्था केली जाणार नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान करायचे नाही असा निर्णय ग्रामसभेत (ठराव क्र मांक ३) घेण्यात आला आहे.निवडणुका आल्या की पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन द्यायचे आणि निवडणूक संपली की पाच वर्षे गावाकडे ढुंकुनही पाहायचे नाही असे राजकारण सुरु असल्याचा आरोप करत आता राजकारण्यांना वठणीवर आणण्यासाठी कोणत्याही निवडणुकीत सहभाग न घेण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. हरणबारी उजवा कालवा हे केवळ स्वप्न दाखविले जात असून या कालव्याचा प्रश्न सुटला असता तर रामतीरचा पाणीप्रश्न कधीच सुटला असता यावर देखील ग्रामसभेत चर्चा करण्यात आली.आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यासाठी बाळासाहेब बळीराम आहिरे यांनी सूचना मांडली, या सूचनेला केवळ निंबा अहिरे यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक