शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नांदूरमधमेश्वर येथील अभयारण्याची ठरणार सीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:57 IST

नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची सीमा अद्याप निश्चित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ज्या भागात अभयारण्य क्षेत्र अस्तित्वात नाही, तो भागदेखील अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. यामुळे सातत्याने स्थानिक रहिवासी व वन-वन्यजीव विभागात संभ्रम निर्माण होत आहे.

ठळक मुद्देवन्यजीव विभागाचे पाऊल : नव्याने सीमांकनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर

नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची सीमा अद्याप निश्चित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ज्या भागात अभयारण्य क्षेत्र अस्तित्वात नाही, तो भागदेखील अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. यामुळे सातत्याने स्थानिक रहिवासी व वन-वन्यजीव विभागात संभ्रम निर्माण होत आहे.या पार्श्वभूमीवर नाशिक वन्यजीव विभागाने पाऊल उचलले असून, नव्याने सीमांकन करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. याबाबतचा आराखडा व प्रस्ताव राज्य वन्यजीव महामंडळाला सादर करण्यात आला आहे.जिल्ह्णातील निफाड तालुक्यामध्ये गोदावरी-कादवा नदीच्या संगमावार नांदूरमधमेश्वर बंधारा इंग्रजकाळात बांधला गेला. या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरला पाणथळ जागा विकसित झाली. पाणथळ जागेतील नैसर्गिक जैवविविधतेने हा परिसर समृद्ध झाला.नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार झाला असून, सीमांकनाचा मुख्य मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे अभयारण्याची सीमा निश्चित होईल, जेणेकरून संरक्षण व संवर्धनासाठी निर्माण होणाºया अडचणींवर मात करणे वन्यजीव विभागाला शक्य होणार आहे. सीमांकन निश्चित झाल्यानंतर नैसर्गिक अधिवास विकसित करून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे.स्थानिक गावकºयांमधील संभ्रम दूर होऊन लोकसहभागातून अभयारण्याच्या विकासासाठी येणारे अडथळे दूर करता येईल, असा विश्वासही उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी व्यक्त केला आहे.सीमांकनाचा तोटा स्थानिक नागरिकांसह अभयारण्याला संवर्धनाच्या बाबतीतही आहे. भविष्यात या अभयारण्याच्या संरक्षणासाठी सीमानिश्चिती करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने वन्यजीव विभागाने आराखडा तयार केला असून, मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितीत असलेल्या राज्य वन्यजीव मंडळाकडे सोपविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.